शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

जि. प.च्या कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले

By admin | Updated: October 15, 2015 01:00 IST

बिलांना उशीर झाल्यामुळे...

रत्नागिरी : निम्मा आॅक्टोबर महिना संपला तरी जिल्हा परिषदेच्या सुमारे ११ हजार कर्मचाऱ्यांचे सप्टेंबर महिन्याचे वेतन अद्याप झालेले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. ज्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमुळे वेतनाला विलंब होतो, त्यांच्यावर कारवाई करण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत होऊनही वेतन वेळेवर अदा झालेले नाही.गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक यांचे वेतन अवेळी अदा केले जात आहे. जिल्ह्यातील बहुतांश प्राथमिक शिक्षक परजिल्ह्यांतील आहेत. मात्र, वेळेवर वेतन होत नसल्याने त्यांची अधिक अडचण होत आहे.वेतन वेळेवर होत नसल्याने दोन महिन्यांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत याबाबत जोरदार चर्चा झाली होती. माजी उपाध्यक्ष व सदस्य राजेश मुकादम यांनी कर्मचाऱ्यांच्या बाजूने सभेत प्रश्न मांडून कर्मचाऱ्यांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेपूर्वी करण्याची मागणी केली होती. कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर न केल्यास संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यानंतरही वेतन वेळेवर होत नसल्याने कर्मचाऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. (शहर वार्ताहर)बिलांना उशीर झाल्यामुळे...जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेतील कर्मचारी यांची वेतनाची देयके एकाचवेळी जिल्हा परिषदेकडून पाठविली जातात. मात्र, पंचायत समित्यांकडून देयके वेळेवर सादर केली जात नसल्यानेच मुख्य देयक पाठविण्यास जिल्हा परिषदेकडून विलंब होत आहे, अशी माहिती पुढे आली आहे.