शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

जि. प.च्या कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले

By admin | Updated: October 15, 2015 01:00 IST

बिलांना उशीर झाल्यामुळे...

रत्नागिरी : निम्मा आॅक्टोबर महिना संपला तरी जिल्हा परिषदेच्या सुमारे ११ हजार कर्मचाऱ्यांचे सप्टेंबर महिन्याचे वेतन अद्याप झालेले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. ज्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमुळे वेतनाला विलंब होतो, त्यांच्यावर कारवाई करण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत होऊनही वेतन वेळेवर अदा झालेले नाही.गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक यांचे वेतन अवेळी अदा केले जात आहे. जिल्ह्यातील बहुतांश प्राथमिक शिक्षक परजिल्ह्यांतील आहेत. मात्र, वेळेवर वेतन होत नसल्याने त्यांची अधिक अडचण होत आहे.वेतन वेळेवर होत नसल्याने दोन महिन्यांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत याबाबत जोरदार चर्चा झाली होती. माजी उपाध्यक्ष व सदस्य राजेश मुकादम यांनी कर्मचाऱ्यांच्या बाजूने सभेत प्रश्न मांडून कर्मचाऱ्यांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेपूर्वी करण्याची मागणी केली होती. कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर न केल्यास संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यानंतरही वेतन वेळेवर होत नसल्याने कर्मचाऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. (शहर वार्ताहर)बिलांना उशीर झाल्यामुळे...जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेतील कर्मचारी यांची वेतनाची देयके एकाचवेळी जिल्हा परिषदेकडून पाठविली जातात. मात्र, पंचायत समित्यांकडून देयके वेळेवर सादर केली जात नसल्यानेच मुख्य देयक पाठविण्यास जिल्हा परिषदेकडून विलंब होत आहे, अशी माहिती पुढे आली आहे.