शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

जि. प.च्या कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले

By admin | Updated: October 15, 2015 01:00 IST

बिलांना उशीर झाल्यामुळे...

रत्नागिरी : निम्मा आॅक्टोबर महिना संपला तरी जिल्हा परिषदेच्या सुमारे ११ हजार कर्मचाऱ्यांचे सप्टेंबर महिन्याचे वेतन अद्याप झालेले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. ज्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमुळे वेतनाला विलंब होतो, त्यांच्यावर कारवाई करण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत होऊनही वेतन वेळेवर अदा झालेले नाही.गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक यांचे वेतन अवेळी अदा केले जात आहे. जिल्ह्यातील बहुतांश प्राथमिक शिक्षक परजिल्ह्यांतील आहेत. मात्र, वेळेवर वेतन होत नसल्याने त्यांची अधिक अडचण होत आहे.वेतन वेळेवर होत नसल्याने दोन महिन्यांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत याबाबत जोरदार चर्चा झाली होती. माजी उपाध्यक्ष व सदस्य राजेश मुकादम यांनी कर्मचाऱ्यांच्या बाजूने सभेत प्रश्न मांडून कर्मचाऱ्यांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेपूर्वी करण्याची मागणी केली होती. कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर न केल्यास संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यानंतरही वेतन वेळेवर होत नसल्याने कर्मचाऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. (शहर वार्ताहर)बिलांना उशीर झाल्यामुळे...जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेतील कर्मचारी यांची वेतनाची देयके एकाचवेळी जिल्हा परिषदेकडून पाठविली जातात. मात्र, पंचायत समित्यांकडून देयके वेळेवर सादर केली जात नसल्यानेच मुख्य देयक पाठविण्यास जिल्हा परिषदेकडून विलंब होत आहे, अशी माहिती पुढे आली आहे.