शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांनी अपील फेटाळले

By admin | Updated: December 26, 2016 22:00 IST

चौकुळ येथील जमीन प्रकरण : नऊजणांनी ग्रामस्थांविरोधात दाखल केले होते अपील

आंबोली : चौकुळ येथील १०५ एकर जमिनीसंदर्भात जगजीवन आत्माराम राऊळ यांच्यासह नऊजणांनी चौकुळ ग्रामस्थांविरोधात दाखल केलेले अपील जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळून लावले. सावंतवाडी उपविभागीय अधिकारी (महसूल) यांनी अपिलावर दिलेला निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी कायम केल्याने गाव नेनेच्या १०५ एकर जमिनीत जगजीवन राऊळ यांच्यासह नऊजणांचा कोणत्याही प्रकारचा हक्कसंबंध नसल्याचे सिद्ध झाल्याचे अ‍ॅड. राजाराम गावडे यांनी स्पष्ट केले.अ‍ॅड. गावडे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, मूळ चौकुळ कबुलायतदार गावकर यांच्या मालकीची चौकु ळ स. नं. ३४१-१ (नेने स.नं. ७४-०) क्षेत्र सुमारे १०५ एकर जमिनीचे आपण बक्षीसपत्राने मालक आहोत, अशी चुकीची वर्दी सन १९३१ मध्ये आत्माराम बाबूराव राऊळ यांनी चौकुळ तलाठ्यांना दिली. महसूल यंत्रणेला हाताशी धरून ही १०५ एकर जमीनच आपल्या नावे करून घेतली. त्यानंतर सोमा धोंडू गावडे यांच्यासह चौकुळच्या ८८ ग्रामस्थांनी या काल्पनिक बक्षीसपत्राविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांकडे १९९९ मध्ये केलेल्या अर्जानुसार सावंतवाडी तहसीलदारांनी पुनर्विलोकन अर्ज क्र. ८४-९८ ही केस चालविली. या केसचा २२ जानेवारी २००० रोजी निर्णय देताना या मिळकतीत आत्माराम बाबूराव राऊळ यांचा अगर त्यांच्या वारसाचा कोणत्याही प्रकारचा मालकी हक्कसंबंध नसल्याने कागदोपत्री असलेली त्यांची नावे कमी करून ही जमीन पुन्हा कबुलायतदार गावकर चौकुळ यांच्या नावे झाली. त्यातच रमाकांत राऊळ यांच्यासह नऊजणांनी या आदेशाविरुद्ध उपविभागीय अधिकारी सावंतवाडी यांच्याकडे दाखल केलेले आर. टी. एस. अपील २००० सन २००४ मध्ये नामंजूर करून चौकुळ कबुलायतदार गावकरांचा मालकी हक्क मान्य करण्यात आला. त्यानंतर या आदेशाविरुद्ध जगजीवन आत्माराम राऊळ यांच्यासह नऊजणांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात दुसरे आर. टी. एस. अपील २०१४ मध्ये केले होते. जिल्हाधिकाऱ्यांकडील अपिलात कबुलायतदार गावकर कृती समिती पदाधिकारी अ‍ॅड. राजाराम गावडे व इतर, तसेच प्रदीप भिकाजी गावडे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरण्यात आला, असेही पत्रकात म्हटले आहे. (वार्ताहर)यापूर्वीचा निर्णय कायमजिल्हाधिकाऱ्यांनी अपील फेटाळून लावत उपविभागीय अधिकारी सावंतवाडी व तहसीलदार सावंतवाडी यांचा यापूर्वीचा निर्णय कायम केला. त्यामुळे जगजीवन आत्माराम राऊळ यांच्यासह नऊजणांनी ही १०५ एकर जमीन काल्पनिक बक्षीसपत्राआधारे बळकावल्याचे निर्विवाद सिद्ध झाले. यापूर्वीही रमाकांत आत्माराम राऊळ व इतरांनी या मिळकतीला आपली नावे असल्याचा गैरफायदा घेऊन ही मिळकत लाखो रुपयांना विक्रीस काढली होती.