शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
5
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
6
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
7
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
8
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
9
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
10
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
13
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
14
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
15
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
16
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
17
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
18
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
19
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
20
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 

जिल्हाधिकाऱ्यांनी अपील फेटाळले

By admin | Updated: December 26, 2016 22:00 IST

चौकुळ येथील जमीन प्रकरण : नऊजणांनी ग्रामस्थांविरोधात दाखल केले होते अपील

आंबोली : चौकुळ येथील १०५ एकर जमिनीसंदर्भात जगजीवन आत्माराम राऊळ यांच्यासह नऊजणांनी चौकुळ ग्रामस्थांविरोधात दाखल केलेले अपील जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळून लावले. सावंतवाडी उपविभागीय अधिकारी (महसूल) यांनी अपिलावर दिलेला निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी कायम केल्याने गाव नेनेच्या १०५ एकर जमिनीत जगजीवन राऊळ यांच्यासह नऊजणांचा कोणत्याही प्रकारचा हक्कसंबंध नसल्याचे सिद्ध झाल्याचे अ‍ॅड. राजाराम गावडे यांनी स्पष्ट केले.अ‍ॅड. गावडे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, मूळ चौकुळ कबुलायतदार गावकर यांच्या मालकीची चौकु ळ स. नं. ३४१-१ (नेने स.नं. ७४-०) क्षेत्र सुमारे १०५ एकर जमिनीचे आपण बक्षीसपत्राने मालक आहोत, अशी चुकीची वर्दी सन १९३१ मध्ये आत्माराम बाबूराव राऊळ यांनी चौकुळ तलाठ्यांना दिली. महसूल यंत्रणेला हाताशी धरून ही १०५ एकर जमीनच आपल्या नावे करून घेतली. त्यानंतर सोमा धोंडू गावडे यांच्यासह चौकुळच्या ८८ ग्रामस्थांनी या काल्पनिक बक्षीसपत्राविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांकडे १९९९ मध्ये केलेल्या अर्जानुसार सावंतवाडी तहसीलदारांनी पुनर्विलोकन अर्ज क्र. ८४-९८ ही केस चालविली. या केसचा २२ जानेवारी २००० रोजी निर्णय देताना या मिळकतीत आत्माराम बाबूराव राऊळ यांचा अगर त्यांच्या वारसाचा कोणत्याही प्रकारचा मालकी हक्कसंबंध नसल्याने कागदोपत्री असलेली त्यांची नावे कमी करून ही जमीन पुन्हा कबुलायतदार गावकर चौकुळ यांच्या नावे झाली. त्यातच रमाकांत राऊळ यांच्यासह नऊजणांनी या आदेशाविरुद्ध उपविभागीय अधिकारी सावंतवाडी यांच्याकडे दाखल केलेले आर. टी. एस. अपील २००० सन २००४ मध्ये नामंजूर करून चौकुळ कबुलायतदार गावकरांचा मालकी हक्क मान्य करण्यात आला. त्यानंतर या आदेशाविरुद्ध जगजीवन आत्माराम राऊळ यांच्यासह नऊजणांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात दुसरे आर. टी. एस. अपील २०१४ मध्ये केले होते. जिल्हाधिकाऱ्यांकडील अपिलात कबुलायतदार गावकर कृती समिती पदाधिकारी अ‍ॅड. राजाराम गावडे व इतर, तसेच प्रदीप भिकाजी गावडे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरण्यात आला, असेही पत्रकात म्हटले आहे. (वार्ताहर)यापूर्वीचा निर्णय कायमजिल्हाधिकाऱ्यांनी अपील फेटाळून लावत उपविभागीय अधिकारी सावंतवाडी व तहसीलदार सावंतवाडी यांचा यापूर्वीचा निर्णय कायम केला. त्यामुळे जगजीवन आत्माराम राऊळ यांच्यासह नऊजणांनी ही १०५ एकर जमीन काल्पनिक बक्षीसपत्राआधारे बळकावल्याचे निर्विवाद सिद्ध झाले. यापूर्वीही रमाकांत आत्माराम राऊळ व इतरांनी या मिळकतीला आपली नावे असल्याचा गैरफायदा घेऊन ही मिळकत लाखो रुपयांना विक्रीस काढली होती.