शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांनी अपील फेटाळले

By admin | Updated: December 26, 2016 22:00 IST

चौकुळ येथील जमीन प्रकरण : नऊजणांनी ग्रामस्थांविरोधात दाखल केले होते अपील

आंबोली : चौकुळ येथील १०५ एकर जमिनीसंदर्भात जगजीवन आत्माराम राऊळ यांच्यासह नऊजणांनी चौकुळ ग्रामस्थांविरोधात दाखल केलेले अपील जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळून लावले. सावंतवाडी उपविभागीय अधिकारी (महसूल) यांनी अपिलावर दिलेला निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी कायम केल्याने गाव नेनेच्या १०५ एकर जमिनीत जगजीवन राऊळ यांच्यासह नऊजणांचा कोणत्याही प्रकारचा हक्कसंबंध नसल्याचे सिद्ध झाल्याचे अ‍ॅड. राजाराम गावडे यांनी स्पष्ट केले.अ‍ॅड. गावडे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, मूळ चौकुळ कबुलायतदार गावकर यांच्या मालकीची चौकु ळ स. नं. ३४१-१ (नेने स.नं. ७४-०) क्षेत्र सुमारे १०५ एकर जमिनीचे आपण बक्षीसपत्राने मालक आहोत, अशी चुकीची वर्दी सन १९३१ मध्ये आत्माराम बाबूराव राऊळ यांनी चौकुळ तलाठ्यांना दिली. महसूल यंत्रणेला हाताशी धरून ही १०५ एकर जमीनच आपल्या नावे करून घेतली. त्यानंतर सोमा धोंडू गावडे यांच्यासह चौकुळच्या ८८ ग्रामस्थांनी या काल्पनिक बक्षीसपत्राविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांकडे १९९९ मध्ये केलेल्या अर्जानुसार सावंतवाडी तहसीलदारांनी पुनर्विलोकन अर्ज क्र. ८४-९८ ही केस चालविली. या केसचा २२ जानेवारी २००० रोजी निर्णय देताना या मिळकतीत आत्माराम बाबूराव राऊळ यांचा अगर त्यांच्या वारसाचा कोणत्याही प्रकारचा मालकी हक्कसंबंध नसल्याने कागदोपत्री असलेली त्यांची नावे कमी करून ही जमीन पुन्हा कबुलायतदार गावकर चौकुळ यांच्या नावे झाली. त्यातच रमाकांत राऊळ यांच्यासह नऊजणांनी या आदेशाविरुद्ध उपविभागीय अधिकारी सावंतवाडी यांच्याकडे दाखल केलेले आर. टी. एस. अपील २००० सन २००४ मध्ये नामंजूर करून चौकुळ कबुलायतदार गावकरांचा मालकी हक्क मान्य करण्यात आला. त्यानंतर या आदेशाविरुद्ध जगजीवन आत्माराम राऊळ यांच्यासह नऊजणांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात दुसरे आर. टी. एस. अपील २०१४ मध्ये केले होते. जिल्हाधिकाऱ्यांकडील अपिलात कबुलायतदार गावकर कृती समिती पदाधिकारी अ‍ॅड. राजाराम गावडे व इतर, तसेच प्रदीप भिकाजी गावडे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरण्यात आला, असेही पत्रकात म्हटले आहे. (वार्ताहर)यापूर्वीचा निर्णय कायमजिल्हाधिकाऱ्यांनी अपील फेटाळून लावत उपविभागीय अधिकारी सावंतवाडी व तहसीलदार सावंतवाडी यांचा यापूर्वीचा निर्णय कायम केला. त्यामुळे जगजीवन आत्माराम राऊळ यांच्यासह नऊजणांनी ही १०५ एकर जमीन काल्पनिक बक्षीसपत्राआधारे बळकावल्याचे निर्विवाद सिद्ध झाले. यापूर्वीही रमाकांत आत्माराम राऊळ व इतरांनी या मिळकतीला आपली नावे असल्याचा गैरफायदा घेऊन ही मिळकत लाखो रुपयांना विक्रीस काढली होती.