शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा विकासातही ‘नंबर वन’ बनवूया

By admin | Updated: October 8, 2016 00:02 IST

दीपक केसरकर : कणकवली येथे दिव्यांगांना साहित्याचे वाटप

कणकवली : कोणीही कितीही टीका केली तरी त्याला शब्दांच्या माध्यमातून नव्हे, तर कृतीतूनच उत्तर द्यायला पाहिजे, असे मी मानतो. दिव्यांगांना नुसते साहित्य वाटप करून न थांबता त्यांच्यासाठी उत्पन्नाचे स्रोत निर्माण झाले पाहिजेत, यासाठी आमचे प्रयत्न आहेत, असे सांगतानाच सिंधुदुर्ग जिल्हा फक्त स्वच्छतेच्या बाबतीतच नव्हे, तर विकासाबाबतीतही एक नंबर बनावा, यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करूया, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे केले.भारत सरकार सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्यावतीने येथील भगवती मंगल कार्यालयात शुक्रवारी दिव्यांग व्यक्तींना साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, भाजप प्रवक्ते माधव भंडारी, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, पंचायत समिती सभापती आस्था सर्पे, उपसभापती महेश गुरव, नगराध्यक्षा माधुरी गायकवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. व्ही. एस. कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, डॉ. श्रीधर जाधव, डॉ. चोपडे, रवींद्र शेट्ये, राजन चिके, सचिन सावंत, आदी उपस्थित होते.खासदार विनायक राऊत म्हणाले, केंद्र तसेच राज्य शासनाची प्रत्येक योजना प्रभावीपणे राबविण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुढच्या टप्प्यात २५०० दिव्यांग व्यक्तींना साहित्य वाटप करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेने विकासाबाबतीत चांगले काम केले आहे. त्यामुळे आम्ही त्यांचा सन्मान केला आहे. वागदे येथील महामार्ग चौपदरीकरणाचा प्रश्न वैभव नाईक यांनी उचलून धरला होता. त्यामुळे शासनाने ६० ऐवजी ४५ मीटर महामार्ग रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. माधव भंडारी म्हणाले, दिव्यांग व्यक्तींना स्वत:च्या पायावर उभे करतानाच त्यांना प्रशासनाने कौशल्य विकास प्रशिक्षण द्यावे. या कामात लोकप्रतिनिधीही सहकार्य करतील. सिंधुदुर्गची जबाबदारी आता वाढली असून, स्वच्छतेच्या बाबतीत सातत्य ठेवणे गरजेचे आहे. वैभव नाईक म्हणाले, अपंगांना शासकीय नोकरीत आरक्षण आहे. या आरक्षणाची शंभर टक्के अंमलबजावणी व्हावी, यासाठी आमचे प्रयत्न राहातील. शासनाच्या योजना जनतेपर्यंत अनेकवेळा पोहोचत नाहीत. मात्र, अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी यांनी एकत्रित काम केले तर योजना यशस्वी होतात. याचे आजचा कार्यक्रम हे उत्तम उदाहरण आहे. प्रास्ताविक डॉ. योगेश साळे तर सूत्रसंचालन सूर्यकांत वारंग यांनी केले. आस्था सर्पे, शेखर सिंह यांनीही मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे १४ रोजी अनावरण !गृहराज्यमंत्री या नात्याने येथील जनतेला सुरक्षित जीवन जगता यावे, यासाठी माझे प्रयत्न आहेत. मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी अशा प्रमुख शहरांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत असून, त्यांचे अनावरण १४ आॅक्टोबरला करण्यात येणार आहे. गावात दारूभट्टी सुरू असेल तर ग्रामस्थांनी फक्त एक फोन पोलिस ठाण्यात करावा, तत्काळ कारवाई करण्यात येईल. युवतींची छेड काढणाऱ्यांसाठीही कडक धोरण ठरविण्यात आले असल्याचे यावेळी मंत्री केसरकर यांनी सांगितले.दाखल्याची प्रक्रिया सुलभ करणार !दिव्यांग व्यक्तींना शासनाकडून सुविधा मिळण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांकडून देण्यात येणाऱ्या दाखल्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येईल. तसेच एकही दिव्यांग व्यक्ती या सुविधांपासून वंचित राहणार नाही, यासाठी आमचे प्रयत्न राहतील, असे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी यावेळी सांगितले.