शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा विकासातही ‘नंबर वन’ बनवूया

By admin | Updated: October 8, 2016 00:02 IST

दीपक केसरकर : कणकवली येथे दिव्यांगांना साहित्याचे वाटप

कणकवली : कोणीही कितीही टीका केली तरी त्याला शब्दांच्या माध्यमातून नव्हे, तर कृतीतूनच उत्तर द्यायला पाहिजे, असे मी मानतो. दिव्यांगांना नुसते साहित्य वाटप करून न थांबता त्यांच्यासाठी उत्पन्नाचे स्रोत निर्माण झाले पाहिजेत, यासाठी आमचे प्रयत्न आहेत, असे सांगतानाच सिंधुदुर्ग जिल्हा फक्त स्वच्छतेच्या बाबतीतच नव्हे, तर विकासाबाबतीतही एक नंबर बनावा, यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करूया, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे केले.भारत सरकार सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्यावतीने येथील भगवती मंगल कार्यालयात शुक्रवारी दिव्यांग व्यक्तींना साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, भाजप प्रवक्ते माधव भंडारी, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, पंचायत समिती सभापती आस्था सर्पे, उपसभापती महेश गुरव, नगराध्यक्षा माधुरी गायकवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. व्ही. एस. कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, डॉ. श्रीधर जाधव, डॉ. चोपडे, रवींद्र शेट्ये, राजन चिके, सचिन सावंत, आदी उपस्थित होते.खासदार विनायक राऊत म्हणाले, केंद्र तसेच राज्य शासनाची प्रत्येक योजना प्रभावीपणे राबविण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुढच्या टप्प्यात २५०० दिव्यांग व्यक्तींना साहित्य वाटप करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेने विकासाबाबतीत चांगले काम केले आहे. त्यामुळे आम्ही त्यांचा सन्मान केला आहे. वागदे येथील महामार्ग चौपदरीकरणाचा प्रश्न वैभव नाईक यांनी उचलून धरला होता. त्यामुळे शासनाने ६० ऐवजी ४५ मीटर महामार्ग रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. माधव भंडारी म्हणाले, दिव्यांग व्यक्तींना स्वत:च्या पायावर उभे करतानाच त्यांना प्रशासनाने कौशल्य विकास प्रशिक्षण द्यावे. या कामात लोकप्रतिनिधीही सहकार्य करतील. सिंधुदुर्गची जबाबदारी आता वाढली असून, स्वच्छतेच्या बाबतीत सातत्य ठेवणे गरजेचे आहे. वैभव नाईक म्हणाले, अपंगांना शासकीय नोकरीत आरक्षण आहे. या आरक्षणाची शंभर टक्के अंमलबजावणी व्हावी, यासाठी आमचे प्रयत्न राहातील. शासनाच्या योजना जनतेपर्यंत अनेकवेळा पोहोचत नाहीत. मात्र, अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी यांनी एकत्रित काम केले तर योजना यशस्वी होतात. याचे आजचा कार्यक्रम हे उत्तम उदाहरण आहे. प्रास्ताविक डॉ. योगेश साळे तर सूत्रसंचालन सूर्यकांत वारंग यांनी केले. आस्था सर्पे, शेखर सिंह यांनीही मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे १४ रोजी अनावरण !गृहराज्यमंत्री या नात्याने येथील जनतेला सुरक्षित जीवन जगता यावे, यासाठी माझे प्रयत्न आहेत. मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी अशा प्रमुख शहरांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत असून, त्यांचे अनावरण १४ आॅक्टोबरला करण्यात येणार आहे. गावात दारूभट्टी सुरू असेल तर ग्रामस्थांनी फक्त एक फोन पोलिस ठाण्यात करावा, तत्काळ कारवाई करण्यात येईल. युवतींची छेड काढणाऱ्यांसाठीही कडक धोरण ठरविण्यात आले असल्याचे यावेळी मंत्री केसरकर यांनी सांगितले.दाखल्याची प्रक्रिया सुलभ करणार !दिव्यांग व्यक्तींना शासनाकडून सुविधा मिळण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांकडून देण्यात येणाऱ्या दाखल्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येईल. तसेच एकही दिव्यांग व्यक्ती या सुविधांपासून वंचित राहणार नाही, यासाठी आमचे प्रयत्न राहतील, असे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी यावेळी सांगितले.