शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

जिल्ह्यात पावसाची संततधार कायम

By admin | Updated: June 20, 2015 00:37 IST

चैतन्यमय वातावरण : गारठा वाढला

रत्नागिरी : जिल्ह्यात बुधवारपासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. पाऊस नियमित झाल्याने शेतीच्या कामाला आता वेग आला आहे. बुधवारी सकाळपासून पावसाने जिल्हाभर संततधार धरली आहे. त्यामुळे पाऊस लांबणार, या वृत्ताने चिंंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना हायसे वाटले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतीच्या कामाला वेग आला आहे. गेल्या २४ तासात एकूण ६४२.८९ मिलिमीटर म्हणजेच सरासरी ७१.४३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत ३०१२.१४ म्हणजेच सरासरी ३३४.६८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मंडणगड, दापोली, खेड, गुहागर येथे मुसळधार, चिपळूण, रत्नागिरी येथे मध्यम, तर लांजा, राजापूर आणि संगमेश्वर येथे समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे. सगळीकडे शेतात बैलजोड्या नांगरतानाचे दृश्य नजरेस पडत आहे. हाच पाऊस आणखी आठ दिवस उशिाराने आला असता तर खऱ्या अर्थाने शेतीच्या कामाला वेग आला असता, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तरीही शेतीची कामे मार्गी लावण्यात गुंतला आहे.सगळीकडे समाधानकारक पाऊस झाल्याने शेतीच्या कामाला वेग आहे. त्यामुळे तालुक्याच्या सर्वच बाजारपेठांमध्ये ग्राहकांची वर्दळ कमी झाली आहे. सर्व शेतकरी कामात गुंतल्याने याचा परिणाम बाजारपेठांवर झाला आहे.मात्र, या वादळी पावसाने जिल्ह्यात काही ठिकाणी नुकसान केले आहे. दापोली तालुक्यात मौजे कर्दे येथे एका घराचे ४ हजार रुपयांचे, रत्नागिरी तालुक्यात गावखडी व मौजे उमरे येथील घरांवर झाडे पडली आहेत. मौजे नेवरे येथे दोन घरांचे नुकसान झाले आहे. मात्र, जीवितहानी झालेली नाही. पंचनाम्याची कार्यवाही सुरू आहे. गुहागर तालुक्यात मौजे असगोली येथे इंदिरा सोलकर यांच्या घरावर झाड पडल्याने ७६ हजार ३२५ रुपयांचे नुकसान झाले आहे, असे जिल्हा नियंत्रण कक्षाकडून कळवण्यात आले आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यात बुधवारपासून पाऊस बरसायला लागला असून, आज तिसऱ्या दिवशीही संततधार कायमच राहिली आहे. जिल्ह्यात मोठे नुकसान झाले नसले तरी काही ठिकाणी झाडे पडण्याचे प्रकार घडले. तीन दिवस मुसळधार पाऊस पडल्याने ठप्प झालेल्या शेतीच्या कामानी पुन्हा वेग घेतला असून, लवकरच शेतीची कामे पूर्ण करण्याकडे कल असेल, असे मत काहिंनी व्यक्त केले आहे. जिल्ह्यातील सर्व ठिकाणची पाणीटंचाईही संपुष्टात आली आहे.