शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पावसाची संततधार कायम

By admin | Updated: June 20, 2015 00:37 IST

चैतन्यमय वातावरण : गारठा वाढला

रत्नागिरी : जिल्ह्यात बुधवारपासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. पाऊस नियमित झाल्याने शेतीच्या कामाला आता वेग आला आहे. बुधवारी सकाळपासून पावसाने जिल्हाभर संततधार धरली आहे. त्यामुळे पाऊस लांबणार, या वृत्ताने चिंंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना हायसे वाटले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतीच्या कामाला वेग आला आहे. गेल्या २४ तासात एकूण ६४२.८९ मिलिमीटर म्हणजेच सरासरी ७१.४३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत ३०१२.१४ म्हणजेच सरासरी ३३४.६८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मंडणगड, दापोली, खेड, गुहागर येथे मुसळधार, चिपळूण, रत्नागिरी येथे मध्यम, तर लांजा, राजापूर आणि संगमेश्वर येथे समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे. सगळीकडे शेतात बैलजोड्या नांगरतानाचे दृश्य नजरेस पडत आहे. हाच पाऊस आणखी आठ दिवस उशिाराने आला असता तर खऱ्या अर्थाने शेतीच्या कामाला वेग आला असता, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तरीही शेतीची कामे मार्गी लावण्यात गुंतला आहे.सगळीकडे समाधानकारक पाऊस झाल्याने शेतीच्या कामाला वेग आहे. त्यामुळे तालुक्याच्या सर्वच बाजारपेठांमध्ये ग्राहकांची वर्दळ कमी झाली आहे. सर्व शेतकरी कामात गुंतल्याने याचा परिणाम बाजारपेठांवर झाला आहे.मात्र, या वादळी पावसाने जिल्ह्यात काही ठिकाणी नुकसान केले आहे. दापोली तालुक्यात मौजे कर्दे येथे एका घराचे ४ हजार रुपयांचे, रत्नागिरी तालुक्यात गावखडी व मौजे उमरे येथील घरांवर झाडे पडली आहेत. मौजे नेवरे येथे दोन घरांचे नुकसान झाले आहे. मात्र, जीवितहानी झालेली नाही. पंचनाम्याची कार्यवाही सुरू आहे. गुहागर तालुक्यात मौजे असगोली येथे इंदिरा सोलकर यांच्या घरावर झाड पडल्याने ७६ हजार ३२५ रुपयांचे नुकसान झाले आहे, असे जिल्हा नियंत्रण कक्षाकडून कळवण्यात आले आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यात बुधवारपासून पाऊस बरसायला लागला असून, आज तिसऱ्या दिवशीही संततधार कायमच राहिली आहे. जिल्ह्यात मोठे नुकसान झाले नसले तरी काही ठिकाणी झाडे पडण्याचे प्रकार घडले. तीन दिवस मुसळधार पाऊस पडल्याने ठप्प झालेल्या शेतीच्या कामानी पुन्हा वेग घेतला असून, लवकरच शेतीची कामे पूर्ण करण्याकडे कल असेल, असे मत काहिंनी व्यक्त केले आहे. जिल्ह्यातील सर्व ठिकाणची पाणीटंचाईही संपुष्टात आली आहे.