शहरं
Join us  
Trending Stories
1
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
2
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
3
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
4
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
5
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
6
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
7
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
8
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
9
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
10
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
11
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
12
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
13
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
14
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
15
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
16
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
17
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
18
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
19
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
20
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत

जिल्ह्यात पावसाची संततधार कायम

By admin | Updated: June 20, 2015 00:37 IST

चैतन्यमय वातावरण : गारठा वाढला

रत्नागिरी : जिल्ह्यात बुधवारपासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. पाऊस नियमित झाल्याने शेतीच्या कामाला आता वेग आला आहे. बुधवारी सकाळपासून पावसाने जिल्हाभर संततधार धरली आहे. त्यामुळे पाऊस लांबणार, या वृत्ताने चिंंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना हायसे वाटले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतीच्या कामाला वेग आला आहे. गेल्या २४ तासात एकूण ६४२.८९ मिलिमीटर म्हणजेच सरासरी ७१.४३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत ३०१२.१४ म्हणजेच सरासरी ३३४.६८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मंडणगड, दापोली, खेड, गुहागर येथे मुसळधार, चिपळूण, रत्नागिरी येथे मध्यम, तर लांजा, राजापूर आणि संगमेश्वर येथे समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे. सगळीकडे शेतात बैलजोड्या नांगरतानाचे दृश्य नजरेस पडत आहे. हाच पाऊस आणखी आठ दिवस उशिाराने आला असता तर खऱ्या अर्थाने शेतीच्या कामाला वेग आला असता, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तरीही शेतीची कामे मार्गी लावण्यात गुंतला आहे.सगळीकडे समाधानकारक पाऊस झाल्याने शेतीच्या कामाला वेग आहे. त्यामुळे तालुक्याच्या सर्वच बाजारपेठांमध्ये ग्राहकांची वर्दळ कमी झाली आहे. सर्व शेतकरी कामात गुंतल्याने याचा परिणाम बाजारपेठांवर झाला आहे.मात्र, या वादळी पावसाने जिल्ह्यात काही ठिकाणी नुकसान केले आहे. दापोली तालुक्यात मौजे कर्दे येथे एका घराचे ४ हजार रुपयांचे, रत्नागिरी तालुक्यात गावखडी व मौजे उमरे येथील घरांवर झाडे पडली आहेत. मौजे नेवरे येथे दोन घरांचे नुकसान झाले आहे. मात्र, जीवितहानी झालेली नाही. पंचनाम्याची कार्यवाही सुरू आहे. गुहागर तालुक्यात मौजे असगोली येथे इंदिरा सोलकर यांच्या घरावर झाड पडल्याने ७६ हजार ३२५ रुपयांचे नुकसान झाले आहे, असे जिल्हा नियंत्रण कक्षाकडून कळवण्यात आले आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यात बुधवारपासून पाऊस बरसायला लागला असून, आज तिसऱ्या दिवशीही संततधार कायमच राहिली आहे. जिल्ह्यात मोठे नुकसान झाले नसले तरी काही ठिकाणी झाडे पडण्याचे प्रकार घडले. तीन दिवस मुसळधार पाऊस पडल्याने ठप्प झालेल्या शेतीच्या कामानी पुन्हा वेग घेतला असून, लवकरच शेतीची कामे पूर्ण करण्याकडे कल असेल, असे मत काहिंनी व्यक्त केले आहे. जिल्ह्यातील सर्व ठिकाणची पाणीटंचाईही संपुष्टात आली आहे.