शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

जिल्हा बॅँक निवडणूक बिनविरोध ?

By admin | Updated: April 13, 2015 00:03 IST

जिल्ह्यात उत्सुकता : उपाध्यक्ष जाधवांची ‘संकटमोचक’ची भूमिका

प्रकाश वराडकर - रत्नागिरी -रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँक निवडणुकीत राष्ट्रवादी, कॉँग्रेस व भाजपचे सहकार पॅनेल आणि शिवसेनाप्रणित शिवसंकल्प पॅनेल आमने-सामने उभे ठाकले आहे. दुसरीकडे निवडणूक अर्ज भरल्यानंतरही ही निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सहकार पॅनेलकडून सुरू आहेत. त्यासाठी बॅँकेचे विद्यमान उपाध्यक्ष बाबाजी जाधव ‘संकटमोचक’ म्हणून भूमिका बजावत असून, शिवसेनेला किती जागा दिल्या तर निवडणूक बिनविरोध होण्याबाबतचे ‘मिरॅकल’ घडेल, याबाबत सर्वांनाच उत्कंठा आहे.  जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक तब्बल आठ वर्षांनंतर येत्या ५ मे रोजी होत आहे. या निवडणुकीची तयारी शिवसेनेने गेल्या दोन महिन्यांपासूून सुरू केली आहे, तर सत्ताधारी सहकार पॅनेलने गेल्या वर्षभरातच या निवडणुकीसाठी आवश्यक व्यूहरचना केली आहे. जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे यांनी प्रथमपासूनच ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केले. पक्षीय पातळीपेक्षाही सर्वपक्षीय म्हणून प्रतिनिधित्व देत निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी चोरगे यांची अपेक्षा होती. मात्र, ४० व ६० टक्के हे जागावाटपाचे सूत्र स्वीकारण्याचा आग्रह सेनेने धरल्याने बिनविरोध निवडणुकीचा मुद्दा मागे पडला होता. आपल्याबरोबर चर्चाच झाली नाही, असा दावा शिवसंकल्प पॅनेल उभे करणारे माजी आमदार सुभाष बने व माजी आमदार गणपत कदम यांनी पत्रकार परिषदेत केला होता. त्यानंतर सर्व २१ जागांवर शिवसेनेच्या पॅनेलने उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र, तांत्रिक कारणाने विलास किंजळे यांचा अर्ज बाद झाला. त्यामुळे आता शिवसेनेच्या शिवसंकल्प पॅनेलचे २० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. बॅँकेची निवडणूक या दोन्ही पॅनेलमध्ये होणार हे निश्चित झालेले असतानाच आता पुन्हा पहिल्या मुद्द्यावर चर्चा सुरू झाली आहे. निवडणुकीची उमेदवारी मागे घेण्याची मुदत २७ एप्रिलपर्यंत आहे. त्यामुळे अजूनही चर्चेतून जागावाटपाचा तिढा सुटू शकतो, संबंधितांना निवडणुकीतून माघार घेता येऊ शकते, असा सहकार पॅनेलमधील काही नेत्यांना विश्वास वाटत आहे. त्यादृष्टीनेच विद्यमान उपाध्यक्ष जाधव हे दोन्ही पॅनेलमधील संकटमोचक म्हणून काम करीत असून, शिष्टाईचे प्रयत्न सुरू आहेत. सहकारावर ‘सहकार’चेच वर्चस्वजिल्ह्यात शिवसेनेने गेल्या अनेक वर्षांत सहकाराकडे फारसे लक्ष दिले नाही. निवडणूक जाहीर झाली की त्यात उतरायचे ही परंपरा शिवसेनेने यावेळीही पाळली आहे. मात्र, सहकार पॅनेलमधील सर्वच विद्यमान संचालक हे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून काम करीत आहेत. त्यामुळेच त्रिपक्षीय सत्ताधारी ‘सहकार’ पॅनेलचे वर्चस्व आहे. तरीही आरोप-प्रत्यारोपात ऊर्जा वाया जाऊ नये, असे डॉ. चोरगे यांच्यासह अनेक संचालकांचे मत आहे. त्यामुळेच बिनविरोधचा हा नवा फंडा पुढे आला आहे.जिल्हा बॅँक निवडणूक अजूनही बिनविरोध होऊ शकते. तसे आमचे प्रयत्न सुरू आहेत. सहकार पॅनेलने याआधीच दिलेल्या प्रस्तावानुसार शिवसेनेच्या नेत्यांनी योग्य विचार करून निर्णय घेतल्यास हे शक्य आहे. आम्ही आशावादी आहोत. जिल्हा बॅँक ही राजकारणविरहित असावी, असे आम्हाला प्रामाणिकपणे वाटते. सहकार पॅनेलमध्ये राष्ट्रवादी, कॉँग्रेस व भाजपचेही उमेदवार आहेत. शिवसेनेनेही त्यात सन्मान्य तोडगा काढत सहभागी व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. - बाबाजी जाधव, उपाध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँक, रत्नागिरी.