शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानतर्फे बियाणे वाटप

By admin | Updated: October 16, 2015 22:39 IST

मदतीचा हात : गंगापूर सोहळ्यात ५२ शेतकऱ्यांना सहाय्य; मराठवाड्यात दुष्काळाची छाया

रत्नागिरी : तालुक्यातील श्रीक्षेत्र नाणीज येथील जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानतर्फे पाऊस झालेल्या भागातील ५२ शेतकऱ्यांना रब्बीसाठी गहू, ज्वारी, हरभऱ्याच्या बियाण्याचे वाटप करण्यात आले. संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळाची गडद छाया असल्याच्या पार्श्वभूमीवर हे वाटप करण्यात आले. स्वामीजींच्या उपस्थितीत विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे, खासदार चंद्रकांत खैरे आदींच्या हस्ते हा कार्यक्रम झाला.गंगापूर येथील लासूर - गंगापूर महामार्गावरील प्रांगणात जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांचा प्रवचन व दर्शन सोहळा झाला. त्यावेळी संस्थानच्या सामाजिक उपक्रमाचा एक भाग म्हणून हे बियाणे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार प्रशांत बंब, माजी आमदार अण्णासाहेब माने, प्रभारी नगराध्यक्ष फैसल चाऊस, जिल्हा परिषदेचे सदस्य संतोष माने, राजेश्वर मुंदडा, नगरसेवक संदेश गंगवाल, किशोर धनायत, बाजार समिती सभापती नंदकुमार गांधीले आदी उपस्थित होते. यावेळी सभापती हरिभाऊ बागडे म्हणाले, समाजाला उपदेश करुन बिघडलेल्या माणसांना घडवण्याचे काम स्वामीजी करत आहेत. पावसाचे पाणी वाचले तरच भविष्यात शेतकरी जगू शकतो. शिवसेना उपनेते व खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले, मराठवाड्यात दुष्काळाची स्थिती भीषण आहे. येथील जनतेला दिलासा व आपल्या आशीर्वादाची गरज आहे. स्वामीजींनी १ लाख ४४ हजार जणांना विधीवत पुन्हा हिंदू धर्मात आणले आहे. त्यांचे हे कार्य मोठे आहे.या सोहळ्यानंतर जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांचे अमृतमय प्रवचन झाले. हिंदू समाज जाती, पंथ व राजकीय गटागटांत विखुरल्याने त्याची वाताहत झाली आहे. हिंंदू धर्म वाचवण्यासाठी राजाश्रयाशिवाय पर्याय नाही. त्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. लालसेपोटी भरकटलेल्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वप्रथम गुरूचे ऐकले पाहिजे. हिंदू धर्मप्रचार, प्रसार व संस्कृती टिकवण्यासाठी स्वतंत्र शाळा, महाविद्यालये सुरू केली पाहिजेत, असे सांगितले. (प्रतिनिधी)पाऊस झालेल्या भागातील शेतकऱ्यांना मदत.सामाजिक उपक्रमांतर्गत संस्थानतर्फे वाटप.विधानसभा सभापती हरिभाऊ बागडे यांची उपस्थिती.हिंदू धर्म वाचविण्यासाठी राजाश्रयाची गरज.