शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानतर्फे बियाणे वाटप

By admin | Updated: October 16, 2015 22:39 IST

मदतीचा हात : गंगापूर सोहळ्यात ५२ शेतकऱ्यांना सहाय्य; मराठवाड्यात दुष्काळाची छाया

रत्नागिरी : तालुक्यातील श्रीक्षेत्र नाणीज येथील जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानतर्फे पाऊस झालेल्या भागातील ५२ शेतकऱ्यांना रब्बीसाठी गहू, ज्वारी, हरभऱ्याच्या बियाण्याचे वाटप करण्यात आले. संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळाची गडद छाया असल्याच्या पार्श्वभूमीवर हे वाटप करण्यात आले. स्वामीजींच्या उपस्थितीत विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे, खासदार चंद्रकांत खैरे आदींच्या हस्ते हा कार्यक्रम झाला.गंगापूर येथील लासूर - गंगापूर महामार्गावरील प्रांगणात जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांचा प्रवचन व दर्शन सोहळा झाला. त्यावेळी संस्थानच्या सामाजिक उपक्रमाचा एक भाग म्हणून हे बियाणे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार प्रशांत बंब, माजी आमदार अण्णासाहेब माने, प्रभारी नगराध्यक्ष फैसल चाऊस, जिल्हा परिषदेचे सदस्य संतोष माने, राजेश्वर मुंदडा, नगरसेवक संदेश गंगवाल, किशोर धनायत, बाजार समिती सभापती नंदकुमार गांधीले आदी उपस्थित होते. यावेळी सभापती हरिभाऊ बागडे म्हणाले, समाजाला उपदेश करुन बिघडलेल्या माणसांना घडवण्याचे काम स्वामीजी करत आहेत. पावसाचे पाणी वाचले तरच भविष्यात शेतकरी जगू शकतो. शिवसेना उपनेते व खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले, मराठवाड्यात दुष्काळाची स्थिती भीषण आहे. येथील जनतेला दिलासा व आपल्या आशीर्वादाची गरज आहे. स्वामीजींनी १ लाख ४४ हजार जणांना विधीवत पुन्हा हिंदू धर्मात आणले आहे. त्यांचे हे कार्य मोठे आहे.या सोहळ्यानंतर जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांचे अमृतमय प्रवचन झाले. हिंदू समाज जाती, पंथ व राजकीय गटागटांत विखुरल्याने त्याची वाताहत झाली आहे. हिंंदू धर्म वाचवण्यासाठी राजाश्रयाशिवाय पर्याय नाही. त्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. लालसेपोटी भरकटलेल्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वप्रथम गुरूचे ऐकले पाहिजे. हिंदू धर्मप्रचार, प्रसार व संस्कृती टिकवण्यासाठी स्वतंत्र शाळा, महाविद्यालये सुरू केली पाहिजेत, असे सांगितले. (प्रतिनिधी)पाऊस झालेल्या भागातील शेतकऱ्यांना मदत.सामाजिक उपक्रमांतर्गत संस्थानतर्फे वाटप.विधानसभा सभापती हरिभाऊ बागडे यांची उपस्थिती.हिंदू धर्म वाचविण्यासाठी राजाश्रयाची गरज.