शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

भरपाईदाखल १६ कोटींचे वितरण

By admin | Updated: November 23, 2015 00:31 IST

रत्नागिरी जिल्हा : अद्याप २४ हजार २१८ शेतकरी वंचित

रत्नागिरी : अवेळीच्या पावसामुळे जिल्ह््यातील आंबा, काजूचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले. प्रशासनाकडून पहिल्या टप्यात ७९ कोटी ५३ लाख २५ हजार २५० रूपयांच्या निधी नुकसानभरपाईसाठी जाहीर करण्यात आला होता. केवळ १६ कोटी १ लाख ८८ हजार ६१२ इतक्याच निधीचे वितरण करण्यात आले आहे. जिल्ह््यातील ६४ हजार ८७४ एकूण लाभार्थ्यांपैकी ४० हजार ६५६ लाभार्थ्यांना नुकसानभरपाई वितरीत करण्यात आली असून, अद्याप २४ हजार २१८ शेतकरी प्रत्यक्ष नुकसान भरपाईपासून वंचित राहिल्याने नाराजी व्यक्त होत आहे.फेब्रुवारी व मार्चमध्ये झालेल्या अवेळीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे ७० टक्केपेक्षा अधिक नुकसान झाले होते. जिल्ह््याला अर्थार्जन मिळवून देणाऱ्या आंबा पिकाची जिल्ह््यात एकूण ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. त्यापैकी ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम असून, ४२ हजार ७३५ हेक्टर क्षेत्रावर पावसामुळे परिणाम झाला. जिल्ह््यातील ९१ हजार ५३० हेक्टर क्षेत्रावर काजूची लागवड करण्यात आली असून, यापैकी ८३ हजार २९२ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. त्यापैकी ५० हजार ९७६ हेक्टर क्षेत्र पावसामुळे बाधित झाल्याने पीक धोक्यात आले आहे.याबाबत शासनाकडून पंचनाम्याचे आदेश देण्यात आले होते. ग्रामसेवक, कृषीसेवक व तलाठी यांच्या त्रिसदस्यीय समितीने पंचनामा अहवाल शासनाला सादर केला आहे. ६४ हजार ८७४ शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला. मात्र, ही यादी घाईगडबडीत तयार करण्यात आल्याने अनेक नुकसानग्रस्त शेतकरी यापासून वंचित राहिले होते. जिल्ह््याला ७९ कोटी ५३ लाख ६५ हजार २५० रूपयांचा निधी नुकसानभरपाई म्हणून पहिल्या टप्यात जाहीर झाला. परंतु, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी चुकीच्या पंचनाम्याची बाब पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या निदर्शनास आणून दिली. शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाकडे वंचित शेतकऱ्यांची यादी तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार २४ हजार शेतकऱ्यांना नुकसानग्रस्तांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले असून, १६ कोटींच्या नुकसानभरपाईची वाढीव रक्कम शासनाने जाहीर केली आहे. त्यामुळे जिल्ह््यासाठी एकूण ९५ कोटी ७३ लाख ७५ हजार इतका निधी नुकसानभरपाईसाठी जाहीर झाला आहे. मात्र, यातील १६ कोटी १ लाख ८८ हजार ६१२ इतक्याच निधीचे प्रत्यक्षात वितरण करण्यात आले आहे. सध्या २४ कोटींचे वितरण कागदोपत्री करण्यात आले आहे. सातबारावरील अनेक नावे व त्यांची परवानगी यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे वितरण रखडले असतानाच अद्याप एकेरी सातबारावरील नुकसानभरपाईचे वितरणही रखडले आहे. रत्नागिरी जिल्ह््यातील ६४ हजार ८७४ शेतकरी प्रत्यक्ष लाभार्थी असताना अद्याप ४० हजार ६५६ शेतकरी या लाभापासून वंचित राहिले आहेत. महसूल विभागाकडे नुकसानभरपाई वितरणाचे काम देण्यात आले असून, वितरणाचे काम संथगतीने सुरू आहे. शासनाने प्रत्यक्ष नुकसानीपेक्षा तुटपूंजी नुकसानभरपाई जाहीर केली आहे. ती देखील वेळेवर मिळत नसल्यामुळे शेतकरीवर्ग निराश झाला आहे. शासकीय स्तरावर शेतकऱ्यांची करण्यात येणारी कुचेष्टा थांबवण्याची मागणी नुकसानग्रस्तांकडून करण्यात येत आहे.(प्रतिनिधी)तालुकाएकूणवंचितलाभार्थीलाभार्थीमंडणगड५४६४२८७२दापोली८०७४६७१९खेड६६२७३९७८चिपळूण४५०७३०२०गुहागर३८८६१९२९संगमेश्वर१२४०८७९८८रत्नागिरी१०७७५६२४२लांजा१०२४५६११९राजापूर२८२८१७८९एकूण६४८७४४०६५६रत्नागिरी जिल्ह्यात नुकसानभरपाई वितरणाचे काम संथगतीने सुरु आहे. महसूल विभागाकडे हे काम देण्यात आले असून, अजूनही ४० टक्के लोकांना भरपाईचे वितरण करणे बाकी आहे.