शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने मिराज, जेएफ-१७ सह ५ पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली; ऑपरेशन सिंदूरबाबत खुलासा
2
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
3
COVID 19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोना परतला, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ
4
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना
5
नाशिक महापालिका निवडणूक: महायुतीत शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत, श्रीकांत शिंदे करणार दौरा
6
Gold Rates 16 May : काल स्वस्त झालं, आज सोनं महागलं; १२०० रुपयांपेक्षा अधिक तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
7
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
8
आमिरची विमानतळावर वाट बघत होती गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट, कारमध्ये येताच दोघांनी एकमेकांना...
9
'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
10
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
11
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
12
२ हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
13
साडेसहा महिन्यांच्या गर्भवती तिरंदाजाची कमाल; पोटात बाळाची हालचात तरी अचूक साधला नेम
14
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
15
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
16
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
17
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
18
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
19
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
20
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा

तंटामुक्तीवरूनच तंटे

By admin | Updated: August 5, 2016 01:58 IST

तंटामुक्ती योजना : पुरस्काराच्या रकमेवरून गावागावात वाद

ओरोस : महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेअंतर्गत अनेक गावांनी उत्कृष्ट कामगिरी बजावत गाव तंटामुक्त करून लाखो रूपयांची पारितोषिके पटकावली. आता हीच पारितोषिकांची रक्कम संबंधित ग्रामपंचायतींच्या मनमानी कारभारामुळे तंट्याचे कारण ठरली आहे. जवळपास सर्वच ग्रामपंचायतींमध्ये ही स्थिती आहे. शासनाच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेचे जिल्ह्यात स्वागत करून जिल्ह्यातील सर्वच गावांनी या योजनेत सहभाग नोंदवला. गाव तंटामुक्त समित्या स्थापन होऊन गावातील तंटे गावातच तडजोडीने मिटविण्याचे प्रयत्न होऊ लागले. अनेकवेळा पोलिस स्टेशनला तक्रारी घेऊन जाणारे तंटामुक्त बैठकीतच त्यावर तोडगा काढू लागले. अशा तंट्यांचे निराकरण गावातील बैठकीतच होऊ लागले. गाव समित्यांमार्फत तडजोड करून आपापसात हे तंटे मिटविण्याचे प्रयत्न होऊ लागले. त्यामुळे पोलिस ठाण्यातही त्यांचा ताण कमी होऊ लागला. गावे आनंदाने नांदू लागली. वातावरण शांत झाले. याकरीता गावागावात नियुक्त झालेल्या तंटामुक्त गाव समित्यांच्या पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन आपले गाव तंटामुक्त केले. यासाठी कोणतेही मानधन किंवा फायदा घेतला नाही. आपल्या गावाच्या विकासासाठी हे सर्व सदस्य एकत्र आले. यात सामान्य शेतकरी, शिक्षकवर्ग, नोकरदार, दुकानदार, पोलिस पाटील व ग्रामस्थ या सर्वांची मदत मिळत गेली. याच मदतीच्या जोरावर संबंधितांनी केलेल्या कामाची शासनाने दखल घेत गावांना पुरस्कार व पुरस्काराची रक्कम बहाल केली. गावे तंटामुक्त झाली. आता पुरस्कारापोटी मिळालेली रक्कमच तंटानिर्मितीचे आणि गावात अशांतता निर्माण होण्याचे कारण ठरत आहे. या रकमेचा विनियोग करताना विश्वासात घेतले जात नसल्याच्या तत्कालीन तक्रारी वाढू लागल्या आहेत. परिणामत: नागरिक पुरस्काराच्या विरूद्ध बोलत आहे. (वार्ताहर)जनतेची मागणी : रकमेचे आॅडीट करणार का?गाव तंटामुक्तीच्या माध्यमातून मिळालेल्या पारितोषिकाच्या रकमेचा शासनाच्या निकषानुसार विनियोग होत आहे का? जातीय सलोखा, जनजागृती, शैक्षणिक, आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येतात का? गावातील तंटामुक्तीमध्ये सातत्य ठेवण्यासाठी राबविण्यात आलेले उपक्रम आणि त्यावर झालेला खर्च, गाव सुरक्षा रक्षक व सुरक्षेच्या अनुषंगाने कोणते उपक्रम सुरू ठेवले आहेत. याबाबत जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक स्तरावर मूल्यांकन करण्याची गरज आहे. याचवेळी पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीने आॅडिट करून नियमबाह्य खर्चावर आळा घालावा अशी मागणी ग्रामस्थ व जनतेतून होत आहे.खर्चाचे निकष कोणते ?महात्मा गांधी तंटामुक्त समित्या कोणत्याही राजकीय पक्षाच्या अधिपत्याखाली येत नाहीत. यातील पदाधिकारी व सदस्य हे ग्रामसभेने निवड केलेले असतात. शिवाय या समित्यांवर शासकीय कर्मचारी व प्रतिष्ठीत व्यक्तींचा समावेश असतो. मात्र त्यांना डावलून अधिकार असलेले ग्रामपंचायतीचे सदस्य व राजकीय पक्षाचे पदाधिकारी हा निधी मनमानी पद्धतीने खर्च करताना दिसत आहे. त्यातून गावातील शांतता बिघडत आहे.