शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चर्चा फिस्कटली; रेशन दुकानांचा बंद कायम

By admin | Updated: May 15, 2015 00:03 IST

आंदोलन सुरुच : जिल्हाधिकारी यांच्यासमवेतच्या बैठकीत तोडगा काढण्यात अपयश

रत्नागिरी : जिल्ह्यातील रास्तदर धान्य दुकानदार तसेच केरोसीन विक्रेत्यांनी १ मेपासून रेशनदुकाने बंद ठेवल्याने सामान्य जनतेचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले आहेत. यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी बुधवारी रास्तदर धान्य दुकान चालक - मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. हा प्रश्न राज्याचा असल्याने त्याबाबत आपण वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करू. पण, जनतेचा विचार करून बंदचा निर्णय मागे घ्यावा, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. मात्र, निर्णय होईपर्यंत आपल्या ‘बंद’च्या निर्णयावर ठाम असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.गेल्या दहा वर्षांत रास्तदर धान्य दुकानदारांना दिल्या जाणाऱ्या वाहतुकीच्या कमिशनमध्ये कुठलीही वाढ करण्यात आलेली नाही. पेट्रोल, डिझेलचे दर वाढूनही वाहतुकीचे कमिशन सुमारे दहा वर्षांपूर्वीचे होते, तेवढेच ठेवण्यात आले आहे. शासनाने धान्य दुकानापर्यंत वाहतूक करण्याचे आश्वासन न पाळल्याने या दुकानदारांना पदरमोड करून वाहतूक खर्च भागावावा लागत आहे. या मागणीच्या पूर्ततेसाठी ९७२ दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे अंत्योदय गटातील ४२,३१२ शिधापत्रिकाधारक आणि प्राधान्य गटातील २,३२,४६३ शिधापत्रिकाधारक धान्याच्या प्रतीक्षेत आहेत. दुकाने उघडतील, या आशेवर हे ग्राहक दरदिवशी दुकानात येऊन परत जात आहेत. याबाबत तडजोड करण्यासाठी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी नीता शिंदे - सावंत उपस्थित होत्या. वाहतुकीचा प्रश्न हा राज्यस्तरावर सोडवला जाणार आहे. त्याबाबत जिल्हा प्रशासन पाठपुरावा करेल. मात्र, तोपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय मागे घ्यावा, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी करण्यात आले. मात्र, वाहतुकीच्या कमिशनचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत आपण बंदच्या निर्णयावर कायम असल्याचे या दुकानदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या बैठकीला संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक कदम, जिल्हा सचिव नितीन कांबळे, उपाध्यक्ष शशिकांत दळवी, प्रशांत पाटील, संतोष गुरव आदी उपस्थित होते.दुकानदारांच्या या निर्णयामुळे सध्या तरी दुकाने सुरू होणार नाहीत, असे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे सर्वच ग्राहकांना आता केवळ दुकाने उघडण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.दरम्यान, ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला घास देणारी ही रेशन दुकाने आता बंद असल्याने ग्रामीण जनतेचे चांगलेच हाल होत आहेत. त्यामुळे यावर तोडगा काढण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)संघटना निर्णयावर ठाम असल्याने हालअंंत्योदय योजनेचे ४२,३१२ शिधापत्रिकाधारक आहेत, तर प्राधान्य गटाचे २,३२,४६३ इतके शिधापत्रिकाधारक आहेत. अंत्योदयसाठी १०६६ मेट्रिक टन तांदूळ, तर ४२६ मेट्रिक टन गव्हाचे नियतन मंजूर आहे. प्राधान्य गटासाठी २,९९६ मेट्रिक टन तांदूळ, तर १९९८ मेट्रिक टन गहू पाठविला जातो. सध्या ४०६२ मेट्रिक टन तांदूळ आणि २४२४ मेट्रिक टन गहू गोदामात पडून आहे.जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी रास्तदर धान्य दुकानदारांना बंदचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली असली तरी दुकानदारांची संघटना आपल्या बंदच्या निर्णयावर ठाम आहे. शासनाने वाहतुकीच्या कमिशनचा प्रश्न अजूनही रेंगाळत ठेवला आहे. त्यामुळे आता याबाबत निर्णय होत नाही, तोपर्यंत माघार नाही, असा निर्धार दुकानदारांनी व्यक्त केला आहे.