शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
5
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
6
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
7
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
8
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
9
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
10
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
11
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
12
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
13
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
14
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
15
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
16
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
17
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
18
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
19
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
20
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल

चर्चा फिस्कटली; रेशन दुकानांचा बंद कायम

By admin | Updated: May 15, 2015 00:03 IST

आंदोलन सुरुच : जिल्हाधिकारी यांच्यासमवेतच्या बैठकीत तोडगा काढण्यात अपयश

रत्नागिरी : जिल्ह्यातील रास्तदर धान्य दुकानदार तसेच केरोसीन विक्रेत्यांनी १ मेपासून रेशनदुकाने बंद ठेवल्याने सामान्य जनतेचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले आहेत. यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी बुधवारी रास्तदर धान्य दुकान चालक - मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. हा प्रश्न राज्याचा असल्याने त्याबाबत आपण वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करू. पण, जनतेचा विचार करून बंदचा निर्णय मागे घ्यावा, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. मात्र, निर्णय होईपर्यंत आपल्या ‘बंद’च्या निर्णयावर ठाम असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.गेल्या दहा वर्षांत रास्तदर धान्य दुकानदारांना दिल्या जाणाऱ्या वाहतुकीच्या कमिशनमध्ये कुठलीही वाढ करण्यात आलेली नाही. पेट्रोल, डिझेलचे दर वाढूनही वाहतुकीचे कमिशन सुमारे दहा वर्षांपूर्वीचे होते, तेवढेच ठेवण्यात आले आहे. शासनाने धान्य दुकानापर्यंत वाहतूक करण्याचे आश्वासन न पाळल्याने या दुकानदारांना पदरमोड करून वाहतूक खर्च भागावावा लागत आहे. या मागणीच्या पूर्ततेसाठी ९७२ दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे अंत्योदय गटातील ४२,३१२ शिधापत्रिकाधारक आणि प्राधान्य गटातील २,३२,४६३ शिधापत्रिकाधारक धान्याच्या प्रतीक्षेत आहेत. दुकाने उघडतील, या आशेवर हे ग्राहक दरदिवशी दुकानात येऊन परत जात आहेत. याबाबत तडजोड करण्यासाठी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी नीता शिंदे - सावंत उपस्थित होत्या. वाहतुकीचा प्रश्न हा राज्यस्तरावर सोडवला जाणार आहे. त्याबाबत जिल्हा प्रशासन पाठपुरावा करेल. मात्र, तोपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय मागे घ्यावा, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी करण्यात आले. मात्र, वाहतुकीच्या कमिशनचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत आपण बंदच्या निर्णयावर कायम असल्याचे या दुकानदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या बैठकीला संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक कदम, जिल्हा सचिव नितीन कांबळे, उपाध्यक्ष शशिकांत दळवी, प्रशांत पाटील, संतोष गुरव आदी उपस्थित होते.दुकानदारांच्या या निर्णयामुळे सध्या तरी दुकाने सुरू होणार नाहीत, असे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे सर्वच ग्राहकांना आता केवळ दुकाने उघडण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.दरम्यान, ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला घास देणारी ही रेशन दुकाने आता बंद असल्याने ग्रामीण जनतेचे चांगलेच हाल होत आहेत. त्यामुळे यावर तोडगा काढण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)संघटना निर्णयावर ठाम असल्याने हालअंंत्योदय योजनेचे ४२,३१२ शिधापत्रिकाधारक आहेत, तर प्राधान्य गटाचे २,३२,४६३ इतके शिधापत्रिकाधारक आहेत. अंत्योदयसाठी १०६६ मेट्रिक टन तांदूळ, तर ४२६ मेट्रिक टन गव्हाचे नियतन मंजूर आहे. प्राधान्य गटासाठी २,९९६ मेट्रिक टन तांदूळ, तर १९९८ मेट्रिक टन गहू पाठविला जातो. सध्या ४०६२ मेट्रिक टन तांदूळ आणि २४२४ मेट्रिक टन गहू गोदामात पडून आहे.जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी रास्तदर धान्य दुकानदारांना बंदचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली असली तरी दुकानदारांची संघटना आपल्या बंदच्या निर्णयावर ठाम आहे. शासनाने वाहतुकीच्या कमिशनचा प्रश्न अजूनही रेंगाळत ठेवला आहे. त्यामुळे आता याबाबत निर्णय होत नाही, तोपर्यंत माघार नाही, असा निर्धार दुकानदारांनी व्यक्त केला आहे.