शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
3
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
4
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
5
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
6
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
7
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
8
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
9
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
10
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
11
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
12
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
13
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
14
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
15
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
16
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
17
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
18
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
19
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
20
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'

डिंगणे येथे आगीत सोळाशे एकरांतील काजू कलमे खाक

By admin | Updated: February 2, 2015 23:45 IST

सुमारे एक कोटीचे नुकसान : पंधरा दिवसांत दुसरी घटना

बांदा : डिंगणे-डेगवे गावांच्या सीमेवर सोमवारी दुपारी पेटलेल्या वणव्यात तब्बल सोळाशे एकरमधील काजू बाग जळून खाक झाली. हजारो काजू कलमे जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांचे सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाले. गेल्या पंधरा दिवसांत आगीची या परिसरातील ही दुसरी घटना असून, ऐन काजू हंगामात बाग जळून खाक झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. आगीचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.डिंगणे-डेगवे गावांच्या सीमेवरील टाकवाडी, भोमवाडी व इसवाचे भरड हा परिसर आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. हजारो काजू कलमांबरोबरच माळरानावरील लाखो रुपये किमतीचे गवतही जळून खाक झाले. सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास टाकवाडीलगतच्या डोंगरात आग लागली. दुपारी वारा असल्याने आग मोठ्या प्रमाणात भडकली. या आगीत तब्बल दोन डोंगर जळून खाक झाले. दुपारच्या दरम्यान आगीने रौद्र रुप धारण केले. यामध्ये टाकवाडी, भोमवाडी परिसरातील सोमा सावंत, सखाराम वासुदेव देसाई, एकनाथ अनंत सावंत, रामा शंभा सावंत, बापू अर्जुन सावंत, गणपत शंकर देसाई, भगवान शंकर देसाई, लवू नवसो देसाई, तुकाराम पांडुरंग देसाई, नाना सावंत, चंद्रकांत राजाराम देसाई, सूर्यकांत राजाराम देसाई, चंद्रकांत कुसो देसाई यांच्यासह अनेक शेतकऱ्यांची सुमारे सोळाशे एकरमधील हजारो काजू कलमे व कित्येक गवताची उडवी जळून खाक झाली. डेगवे व डिंगणेवासीय सायंकाळी उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, अग्नितांडवामुळे संपूर्ण परिसर बेचिराख झाला. काजू बागायतीमध्ये गवत असल्याने तसेच दुपारची वेळ असल्याने आग भडकली. स्थानिकांनी पाणी व मातीच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.सायंकाळी उशिरा डेगवे तलाठी किरण गझीनकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पंचनामा करण्याचे काम सुरू असल्याने नुकसानीचा नेमका आकडा समजला नाही. मात्र, शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोळाशे एकर परिसरात सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा प्रश्नडिंगणे व डेगवे गावातील शेतकऱ्यांनी या परिसरात मोठ्या मेहनतीने काजू बागा उभ्या केल्या होत्या. पंधरा दिवसांपूर्वी रात्री लागलेल्या आगीत शेतकऱ्यांची काजू बागाजळून खाक झाली होती. रात्री उशिरापर्यंत शेतकऱ्यांनी जिवावर बेतून ही आग आटोक्यात आणली. मात्र, सोमवारी लागलेल्या आगीमध्ये शेतकऱ्यांनी वाचविलेली काजू बागा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाकडून करण्यात येणाऱ्या पंचनाम्यात नुकसानभरपाई मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक प्रश्न निर्माण झाले आहेत.