शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

डिंगणे येथे आगीत सोळाशे एकरांतील काजू कलमे खाक

By admin | Updated: February 2, 2015 23:45 IST

सुमारे एक कोटीचे नुकसान : पंधरा दिवसांत दुसरी घटना

बांदा : डिंगणे-डेगवे गावांच्या सीमेवर सोमवारी दुपारी पेटलेल्या वणव्यात तब्बल सोळाशे एकरमधील काजू बाग जळून खाक झाली. हजारो काजू कलमे जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांचे सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाले. गेल्या पंधरा दिवसांत आगीची या परिसरातील ही दुसरी घटना असून, ऐन काजू हंगामात बाग जळून खाक झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. आगीचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.डिंगणे-डेगवे गावांच्या सीमेवरील टाकवाडी, भोमवाडी व इसवाचे भरड हा परिसर आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. हजारो काजू कलमांबरोबरच माळरानावरील लाखो रुपये किमतीचे गवतही जळून खाक झाले. सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास टाकवाडीलगतच्या डोंगरात आग लागली. दुपारी वारा असल्याने आग मोठ्या प्रमाणात भडकली. या आगीत तब्बल दोन डोंगर जळून खाक झाले. दुपारच्या दरम्यान आगीने रौद्र रुप धारण केले. यामध्ये टाकवाडी, भोमवाडी परिसरातील सोमा सावंत, सखाराम वासुदेव देसाई, एकनाथ अनंत सावंत, रामा शंभा सावंत, बापू अर्जुन सावंत, गणपत शंकर देसाई, भगवान शंकर देसाई, लवू नवसो देसाई, तुकाराम पांडुरंग देसाई, नाना सावंत, चंद्रकांत राजाराम देसाई, सूर्यकांत राजाराम देसाई, चंद्रकांत कुसो देसाई यांच्यासह अनेक शेतकऱ्यांची सुमारे सोळाशे एकरमधील हजारो काजू कलमे व कित्येक गवताची उडवी जळून खाक झाली. डेगवे व डिंगणेवासीय सायंकाळी उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, अग्नितांडवामुळे संपूर्ण परिसर बेचिराख झाला. काजू बागायतीमध्ये गवत असल्याने तसेच दुपारची वेळ असल्याने आग भडकली. स्थानिकांनी पाणी व मातीच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.सायंकाळी उशिरा डेगवे तलाठी किरण गझीनकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पंचनामा करण्याचे काम सुरू असल्याने नुकसानीचा नेमका आकडा समजला नाही. मात्र, शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोळाशे एकर परिसरात सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा प्रश्नडिंगणे व डेगवे गावातील शेतकऱ्यांनी या परिसरात मोठ्या मेहनतीने काजू बागा उभ्या केल्या होत्या. पंधरा दिवसांपूर्वी रात्री लागलेल्या आगीत शेतकऱ्यांची काजू बागाजळून खाक झाली होती. रात्री उशिरापर्यंत शेतकऱ्यांनी जिवावर बेतून ही आग आटोक्यात आणली. मात्र, सोमवारी लागलेल्या आगीमध्ये शेतकऱ्यांनी वाचविलेली काजू बागा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाकडून करण्यात येणाऱ्या पंचनाम्यात नुकसानभरपाई मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक प्रश्न निर्माण झाले आहेत.