शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

डिंगणे येथे आगीत सोळाशे एकरांतील काजू कलमे खाक

By admin | Updated: February 2, 2015 23:45 IST

सुमारे एक कोटीचे नुकसान : पंधरा दिवसांत दुसरी घटना

बांदा : डिंगणे-डेगवे गावांच्या सीमेवर सोमवारी दुपारी पेटलेल्या वणव्यात तब्बल सोळाशे एकरमधील काजू बाग जळून खाक झाली. हजारो काजू कलमे जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांचे सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाले. गेल्या पंधरा दिवसांत आगीची या परिसरातील ही दुसरी घटना असून, ऐन काजू हंगामात बाग जळून खाक झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. आगीचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.डिंगणे-डेगवे गावांच्या सीमेवरील टाकवाडी, भोमवाडी व इसवाचे भरड हा परिसर आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. हजारो काजू कलमांबरोबरच माळरानावरील लाखो रुपये किमतीचे गवतही जळून खाक झाले. सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास टाकवाडीलगतच्या डोंगरात आग लागली. दुपारी वारा असल्याने आग मोठ्या प्रमाणात भडकली. या आगीत तब्बल दोन डोंगर जळून खाक झाले. दुपारच्या दरम्यान आगीने रौद्र रुप धारण केले. यामध्ये टाकवाडी, भोमवाडी परिसरातील सोमा सावंत, सखाराम वासुदेव देसाई, एकनाथ अनंत सावंत, रामा शंभा सावंत, बापू अर्जुन सावंत, गणपत शंकर देसाई, भगवान शंकर देसाई, लवू नवसो देसाई, तुकाराम पांडुरंग देसाई, नाना सावंत, चंद्रकांत राजाराम देसाई, सूर्यकांत राजाराम देसाई, चंद्रकांत कुसो देसाई यांच्यासह अनेक शेतकऱ्यांची सुमारे सोळाशे एकरमधील हजारो काजू कलमे व कित्येक गवताची उडवी जळून खाक झाली. डेगवे व डिंगणेवासीय सायंकाळी उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, अग्नितांडवामुळे संपूर्ण परिसर बेचिराख झाला. काजू बागायतीमध्ये गवत असल्याने तसेच दुपारची वेळ असल्याने आग भडकली. स्थानिकांनी पाणी व मातीच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.सायंकाळी उशिरा डेगवे तलाठी किरण गझीनकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पंचनामा करण्याचे काम सुरू असल्याने नुकसानीचा नेमका आकडा समजला नाही. मात्र, शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोळाशे एकर परिसरात सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा प्रश्नडिंगणे व डेगवे गावातील शेतकऱ्यांनी या परिसरात मोठ्या मेहनतीने काजू बागा उभ्या केल्या होत्या. पंधरा दिवसांपूर्वी रात्री लागलेल्या आगीत शेतकऱ्यांची काजू बागाजळून खाक झाली होती. रात्री उशिरापर्यंत शेतकऱ्यांनी जिवावर बेतून ही आग आटोक्यात आणली. मात्र, सोमवारी लागलेल्या आगीमध्ये शेतकऱ्यांनी वाचविलेली काजू बागा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाकडून करण्यात येणाऱ्या पंचनाम्यात नुकसानभरपाई मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक प्रश्न निर्माण झाले आहेत.