शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
4
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
5
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
6
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
7
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
8
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
9
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
10
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
11
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
12
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
13
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
14
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
15
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
16
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
17
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
18
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
19
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
20
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा

दिंडी चालली, विठुरायाच्या दर्शनाला

By admin | Updated: January 20, 2015 23:34 IST

पांडुरंगाच्या भेटीची ओढ : १६६ वर्षांची परंपरा कोकण दिंडीकडून आजही कायम

चिपळूण : ग्यानबा तुकाराम... ग्यानबा तुकाराम..., ज्ञानोबा माऊली तुकाराम... असे अभंग गात टाळ मृदुंगाच्या गजरात कोकण दिंडी समाज संस्थेची पालखी आज (मंगळवारी) श्री क्षेत्र परशुराम येथून पंढरपूरकडे निघाली आहे. कोकण दिंडी समाज संस्थेतर्फे गेली १६६ वर्षे ही परंपरा जपली जात आहे. ऊन, वारा, पावसाची पर्वा न करता पांडुरंगाच्या भेटीसाठी आतुरलेले भक्त पंढरीकडे सुतासारखे चालत असतात. दरवर्षी माघी एकादशीला ही वारकरी मंडळी पांडुरंगाच्या चरणावर लीन होते. पांडुरंगाचे चरण स्पर्श होताच ते आपले दु:ख विसरतात. ह. भ. प. वै. अन्याबा राजेशिर्के (वेहेळे) यांनी १८५६ मध्ये कोकण दिंडी समाजाची स्थापना केली. त्यानंतर कोकण दिंडी समाज ऊर्फ भार्गवराव दिंडी पालखी सोहळा या नावाने श्री क्षेत्र परशुराम ते श्री क्षेत्र पंढरपूर अशी पायी दिंंडी सुरु झाली. दिंडी मालक प्रतापराव राजेशिर्के यांनी ही पायी दिंडी पुढे चालविली. आता ह. भ. प. रुपेश महाराज राजेशिर्के या तरुणावर या दिंडीची जबाबदारी आहे. १६६ वर्षांची परंपरा असलेली ही दिंडी मोठ्या दिमाखात भालदार, चोपदारांसह पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. या दिंडीत अनेक वयोवृद्ध, तरुण तसेच महिलांचाही समावेश आहे. आज सकाळी परशुरामहून दिंंडी पेठमाप येथे आली असता पेठमाप परीटआळी विठ्ठल मंदिरात अध्यक्ष मनोज शिंदे, माजी अध्यक्ष दीपक कदम, दशरथ पावसकर, पांडुरंग सातारकर, संजय कदम, वैभव कदम, अरुण कदम, गजानन कदम, मनोहर कदम आदी अनेकांनी पालखीचे पूजन केले. त्यानंतर स्वकुळ साळी समाज विठ्ठल मंदिरात पालखीचे पूजन करण्यात आले. तेथून ही पालखी पुढे प्रवासासाठी मार्गस्थ झाली. परशुराम येथून निघालेल्या दिंडीला शेकडो भक्तांनी निरोप दिला आणि ग्यानबा तुकारामच्या गजरात पंढरपूरकडे निघाली असून, माघ वारीचा हा आनंद व परंपरा डोळ्यात साठवण्यासाठी वारकऱ्यांनी आज गर्दी केली होती. पेठमाप परीटआळी विठ्ठल मंदिरात दिंडीसमवेतच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)