शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

हक्काबरोबर कर्तव्य पार पाडा : राधाकृष्णन

By admin | Updated: December 11, 2014 00:00 IST

जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त जिल्हाधिकारी अल्पबचत सभागृहात आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते

रत्नागिरी : भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाच्या मानवी हक्कांची जपणूक केली आहे. एक नागरिक म्हणून मानवी हक्काचा विचार करताना त्याअनुषंगाने येणाऱ्या जबाबदाऱ्यांचादेखील सर्वांनी विचार करायला हवा. हक्क मिळवतानाच त्याबरोबर येणारी कर्तव्ये योग्य रितीने पार पाडून इतरांचे हक्कही सुरक्षित करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी आज येथे केले. जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील अल्पबचत सभागृहात आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, अपर जिल्हाधिकारी गोपाळ निगुडकर, निवासी उपजिल्हाधिकारी एस. आर. बर्गे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय आहेर, उपजिल्हाधिकारी नीता शिंंदे, उपजिल्हाधिकारी नितीन राऊत, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिनी रजपूत, विधी अधिकारी पी. एन. जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. आजच्या प्रगतशील समाजात मानवी हक्कांबाबत जागरुकता निर्माण झाली आहे. मानव म्हणून सन्मानाने जगण्याचा हक्क प्रत्येकाला प्राप्त झाला आहे. या हक्काच्या बरोबरीने जबाबदाऱ्यादेखील वाढल्या आहेत. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन वैयक्तिक पातळीवर हक्काचा वापर करताना इतरांचे हक्क जपणूकीसाठीही प्रामाणिकपणे प्रयत्न करायला हवेत. या प्रक्रियेतूनच संपूर्ण समाजाच्या मानवी हक्कांचे संरक्षण आणि संवर्धन होऊ शकेल, असे विचार जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. भावी पिढीला दर्जेदार शिक्षण, उत्तम आरोग्य आणि जगण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)