शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
3
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
4
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
5
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
6
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
7
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
8
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
9
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
10
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
11
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
12
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
13
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
14
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
15
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
16
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
17
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
18
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
19
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
20
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?

हक्काबरोबर कर्तव्य पार पाडा : राधाकृष्णन

By admin | Updated: December 11, 2014 00:00 IST

जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त जिल्हाधिकारी अल्पबचत सभागृहात आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते

रत्नागिरी : भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाच्या मानवी हक्कांची जपणूक केली आहे. एक नागरिक म्हणून मानवी हक्काचा विचार करताना त्याअनुषंगाने येणाऱ्या जबाबदाऱ्यांचादेखील सर्वांनी विचार करायला हवा. हक्क मिळवतानाच त्याबरोबर येणारी कर्तव्ये योग्य रितीने पार पाडून इतरांचे हक्कही सुरक्षित करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी आज येथे केले. जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील अल्पबचत सभागृहात आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, अपर जिल्हाधिकारी गोपाळ निगुडकर, निवासी उपजिल्हाधिकारी एस. आर. बर्गे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय आहेर, उपजिल्हाधिकारी नीता शिंंदे, उपजिल्हाधिकारी नितीन राऊत, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिनी रजपूत, विधी अधिकारी पी. एन. जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. आजच्या प्रगतशील समाजात मानवी हक्कांबाबत जागरुकता निर्माण झाली आहे. मानव म्हणून सन्मानाने जगण्याचा हक्क प्रत्येकाला प्राप्त झाला आहे. या हक्काच्या बरोबरीने जबाबदाऱ्यादेखील वाढल्या आहेत. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन वैयक्तिक पातळीवर हक्काचा वापर करताना इतरांचे हक्क जपणूकीसाठीही प्रामाणिकपणे प्रयत्न करायला हवेत. या प्रक्रियेतूनच संपूर्ण समाजाच्या मानवी हक्कांचे संरक्षण आणि संवर्धन होऊ शकेल, असे विचार जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. भावी पिढीला दर्जेदार शिक्षण, उत्तम आरोग्य आणि जगण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)