शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

धनगरवाड्या आजही उपेक्षितच

By admin | Updated: January 11, 2016 00:34 IST

खेड तालुका : पालकमंत्र्यांसह आमदारांकडून पदरी निराशा; संतप्त भावना

खेड : खेड तालुक्यातील धनगर समाजाची पुन्हा एकदा निराशा झाली आहे़ तालुक्यातील ४० धनगरवाड्यांपैकी एकाही धनगरवाडीतील रस्त्याच्या डांबरीकरणासाठी जिल्हा नियोजनातून निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. आमदारांनीही दिलेल्या आश्वासनाला हरताळ फासला आहे़ आता न्यायासाठी जायचे कोठे? असा सवाल धनगर समाजातील लोक उपस्थित करीत आहेत़ येण्या-जाण्याच्या रस्त्याची आता पार दुरवस्था झाली असून, रस्त्याने चालणे देखील कठीण झाले आहे़ पालकमंत्र्यासह आमदारांनीही तालुक्यातील धनगर समाजाची उपेक्षा केल्याने हा समाज आता पोरका झाला आहे़ धनगर समाज आजही विकासापासून वंचित असून, याकामी आता जिल्हाधिकारी यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी समाजातर्फे करण्यात आली आहे़खेड तालुक्यातील ४० धनगरवाड्यांमध्ये बेताचे रस्ते आहेत़ हे रस्ते रामदास कदम आमदार असताना करण्यात आले आहेत. वीजपुरवठा देखील त्यांच्याच काळात झाला आहे़ मात्र, आता त्यावर २५ वर्षे उलटून गेली आहेत़ त्यामुळे हे रस्ते पुरते खराब झाले आहेत़ निधीअभावी या रस्त्यांची कामे रखडली असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र आखाडे यांचेशी चर्चा केली असता त्यांनी पालकमंत्री आणि आमदार संजय कदम यांच्याकडे धनगर वाड्यांतील रस्त्यांचे प्रस्ताव देण्यात आले आहेत, असे सांगितले. मात्र, याकामी कोणीही लक्ष दिले नसल्याची माहिती त्यांनी दिली. पालकमंत्र्यांकडून धनगरवाड्यातील १५ रस्त्यांचे डांबरीकरणाचे प्रस्ताव जिल्हा नियोजनाकडे देण्यात आले आहेत़ मात्र, जिल्हा नियोजनमधून यापैकी एकाही रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळालेली नाही़ आमदार संजय कदम यांच्याकडेही या रस्त्यांबाबत निवेदन देण्यात आले आहे. मात्र, त्यांनीही या धनगरवाड्यांतील रस्त्यांच्या प्रश्नावर लक्ष दिलेले नाही़ एकूणच धनगर वाड्यांतील रस्त्यांची परिस्थिती गंभीर असून, यामुळे धनगरवाड्यातील नागरिकांना आता पुन्हा डोंगरदऱ्यातून उतरावे लागणार आहे़ (प्रतिनिधी)दुर्लक्ष होण्याची भीती : जिल्हा नियोजनमधून निधीचा ठेंगाजिल्हा नियोजनमधून करोडो रूपये खर्च करण्यात आले आहेत़ मात्र, धनगरवाड्यांतील रस्त्यांच्या कामासाठी जिल्हा नियोजनमधून पालकमंत्र्यांनी निधी उपलब्ध केलेला नाही़ आमदारांनीही या प्रश्नाकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. धनगर समाजाची यापेक्षा कुचेष्टा ती काय असू शकते, अशा शब्दात समाजाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत या तथाकथित राजकारणाने समाज पुन्हा वाऱ्यावर येणार असल्याची भीती व्यक्त केली आहे. रामदास कदम आमदार असताना त्यांच्या काळात याच धनगर समाजासाठी रस्ते, पाणी आणि वीज आदी सुविधा देऊन समाजाला नवसंजीवनी देण्यात आली होती़ मात्र, आता येथील वाड्यांवर रस्ते आणि पाणीपुरवठा यांची वानवा आहे़ +नियोजनाच्या कामात असमतोलाची भावनापालकमंत्र्यांनी वाऱ्यावर सोडले असले तरी जिल्हा नियोजनाच्या निधीचे वाटप करताना आमदारांनी किंवा काही लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केल्याने जिल्हा नियोजनच्या एकूणच कामामध्ये असमतोल राहिल्याचे या समाजाच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. पूर्वापार डोंगराळ भागात राहून आपली उपजीविका करणारा हा समाज आता विकासापासून वंचित आहे़ राज्य सरकारने अनेक योजना करूनही या समाजाला उपेक्षित राहावे लागत आहे. याकामी आता जिल्हाधिकारी यांनीच लक्ष घालण्याची मागणी या समाजाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे़