शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
निवडणुकीत अजितदादांना शह द्यायला पार्थ पवार प्रकरण मुख्यमंत्र्यांनी बाहेर काढले?; चर्चांना उधाण
5
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
6
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
7
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
8
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
9
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
10
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
11
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
12
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
13
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
14
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
15
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
16
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
17
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
18
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
19
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
20
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."

धनगरवाड्या आजही उपेक्षितच

By admin | Updated: January 11, 2016 00:34 IST

खेड तालुका : पालकमंत्र्यांसह आमदारांकडून पदरी निराशा; संतप्त भावना

खेड : खेड तालुक्यातील धनगर समाजाची पुन्हा एकदा निराशा झाली आहे़ तालुक्यातील ४० धनगरवाड्यांपैकी एकाही धनगरवाडीतील रस्त्याच्या डांबरीकरणासाठी जिल्हा नियोजनातून निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. आमदारांनीही दिलेल्या आश्वासनाला हरताळ फासला आहे़ आता न्यायासाठी जायचे कोठे? असा सवाल धनगर समाजातील लोक उपस्थित करीत आहेत़ येण्या-जाण्याच्या रस्त्याची आता पार दुरवस्था झाली असून, रस्त्याने चालणे देखील कठीण झाले आहे़ पालकमंत्र्यासह आमदारांनीही तालुक्यातील धनगर समाजाची उपेक्षा केल्याने हा समाज आता पोरका झाला आहे़ धनगर समाज आजही विकासापासून वंचित असून, याकामी आता जिल्हाधिकारी यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी समाजातर्फे करण्यात आली आहे़खेड तालुक्यातील ४० धनगरवाड्यांमध्ये बेताचे रस्ते आहेत़ हे रस्ते रामदास कदम आमदार असताना करण्यात आले आहेत. वीजपुरवठा देखील त्यांच्याच काळात झाला आहे़ मात्र, आता त्यावर २५ वर्षे उलटून गेली आहेत़ त्यामुळे हे रस्ते पुरते खराब झाले आहेत़ निधीअभावी या रस्त्यांची कामे रखडली असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र आखाडे यांचेशी चर्चा केली असता त्यांनी पालकमंत्री आणि आमदार संजय कदम यांच्याकडे धनगर वाड्यांतील रस्त्यांचे प्रस्ताव देण्यात आले आहेत, असे सांगितले. मात्र, याकामी कोणीही लक्ष दिले नसल्याची माहिती त्यांनी दिली. पालकमंत्र्यांकडून धनगरवाड्यातील १५ रस्त्यांचे डांबरीकरणाचे प्रस्ताव जिल्हा नियोजनाकडे देण्यात आले आहेत़ मात्र, जिल्हा नियोजनमधून यापैकी एकाही रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळालेली नाही़ आमदार संजय कदम यांच्याकडेही या रस्त्यांबाबत निवेदन देण्यात आले आहे. मात्र, त्यांनीही या धनगरवाड्यांतील रस्त्यांच्या प्रश्नावर लक्ष दिलेले नाही़ एकूणच धनगर वाड्यांतील रस्त्यांची परिस्थिती गंभीर असून, यामुळे धनगरवाड्यातील नागरिकांना आता पुन्हा डोंगरदऱ्यातून उतरावे लागणार आहे़ (प्रतिनिधी)दुर्लक्ष होण्याची भीती : जिल्हा नियोजनमधून निधीचा ठेंगाजिल्हा नियोजनमधून करोडो रूपये खर्च करण्यात आले आहेत़ मात्र, धनगरवाड्यांतील रस्त्यांच्या कामासाठी जिल्हा नियोजनमधून पालकमंत्र्यांनी निधी उपलब्ध केलेला नाही़ आमदारांनीही या प्रश्नाकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. धनगर समाजाची यापेक्षा कुचेष्टा ती काय असू शकते, अशा शब्दात समाजाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत या तथाकथित राजकारणाने समाज पुन्हा वाऱ्यावर येणार असल्याची भीती व्यक्त केली आहे. रामदास कदम आमदार असताना त्यांच्या काळात याच धनगर समाजासाठी रस्ते, पाणी आणि वीज आदी सुविधा देऊन समाजाला नवसंजीवनी देण्यात आली होती़ मात्र, आता येथील वाड्यांवर रस्ते आणि पाणीपुरवठा यांची वानवा आहे़ +नियोजनाच्या कामात असमतोलाची भावनापालकमंत्र्यांनी वाऱ्यावर सोडले असले तरी जिल्हा नियोजनाच्या निधीचे वाटप करताना आमदारांनी किंवा काही लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केल्याने जिल्हा नियोजनच्या एकूणच कामामध्ये असमतोल राहिल्याचे या समाजाच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. पूर्वापार डोंगराळ भागात राहून आपली उपजीविका करणारा हा समाज आता विकासापासून वंचित आहे़ राज्य सरकारने अनेक योजना करूनही या समाजाला उपेक्षित राहावे लागत आहे. याकामी आता जिल्हाधिकारी यांनीच लक्ष घालण्याची मागणी या समाजाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे़