शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
3
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
4
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
5
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
7
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
8
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
9
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
10
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
11
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
12
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
13
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
14
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
15
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
16
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
17
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
18
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
19
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
20
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!

कार्यकर्त्यांचा विकास म्हणजे जनतेचा विकास नव्हे

By admin | Updated: July 7, 2016 00:51 IST

वैभव नाईक यांचा टोला : देवगड येथे शिवबंधन कार्यक्रम

देवगड : वडिलांचा जेथे पराभव करायला आम्हाला वेळ लागला नाही तेथे मुलाचा पराभव करण्यासाठी शिवसेनेला कष्ट करावे लागणार नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यादृष्टीने कामाला लागावे, असे आवाहन करतानाच ज्यांना मागील पंचवीस वर्षे जिल्ह्याचा विकास जमला नाही त्यांनी आमच्या दीड वर्षाच्या कालावधीचा आम्हाला हिशेब विचारू नये. कार्यकर्त्यांचा विकास म्हणजे जनतेचा विकास नाही. शिवसेना मात्र जनतेचाच विकास करीत राहणार आहे, असे मत आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केले.शिवसेनेला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल देवगड येथे शिवबंधन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सुभाष मयेकर, शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर, हर्षद गावडे, वर्षा पवार, दादा पडेलकर आदी उपस्थित होते. मेळाव्यात पक्षाची मागील ५० वर्षांतील वाटचालीचा आढावा घेतला. नाईक म्हणाले, युतीशासनाच्या माध्यमातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात विकासकामे होत आहेत. सुवर्णमहोत्सवी वर्षामध्ये संघटनात्मक बांधणीबरोबर ही विकासकामे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवून विश्वास संपादन केला पाहिजे. आगामी काळात हा सर्व भाग शिवसेनामय दिसेल. पक्षातील तरुणांनी नव्या उमेदीने काम करायला हवे. शिवसेनेने आजवर सामान्य कार्यकर्त्यांना मोठे केले आहे. जेथे वडिलांचा पराभव केला तेथे मुलाचा पराभव करायला शिवसेनेला वेळ लागणार नाही. पालकमंत्री, खासदार यांच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास सुरू आहे. पर्यटन, रस्ते विकास यासह मच्छिमारांचे प्रश्न सोडवले जात आहेत. मात्र, मागील पंचवीस वर्षांत काहीही विकास न करणाऱ्यांनी आमच्याकडे दीड वर्षातील हिशोब विचारू नये. शिवसेना लोकांच्या कामासाठी सक्रिय व सक्षम आहे. काँग्रेसची स्थापना कोणी केली हे त्यांच्या तालुकाध्यक्षांना तरी माहिती आहे का? असा प्रश्न विचारत मराठी माणसाने निर्माण केलेल्या संघटनेच्या मागे जनता असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)