शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

ग्राम पर्यटनानेच विकास शक्य

By admin | Updated: September 28, 2016 00:44 IST

खेमसावंत भोसले : माजगाव येथे जागतिक पर्यटन दिन साजरा

सावंतवाडी : पर्यटन क्षेत्राचा ग्रामीण पर्यटन हा मूळ गाभा असून, ग्रामीण भागातील लोकांना एकत्रित करून कृषी व ग्राम पर्यटनाचा विकास झाला, तरच खऱ्या अर्थाने जिल्हा पर्यटन विकासात आघाडीवर राहील, असे मत राजे खेमसावंत भोसले यांनी व्यक्त केले. माजगाव येथे द्वारका कृष्ण पर्यटन विकास व सेवा सहकारी संस्थेतर्फे जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी राजमाता सत्वशीलादेवी भोसले, नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र फाटक, ‘रात्रीस खेळ चाले’चे दिग्दर्शक राजू सावंत, अभिनेता प्रल्हाद कुडतरकर, अध्यक्ष डी. के. सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्या रेश्मा सावंत, भाई देऊलकर, आबा सावंत, नकुल पार्सेकर, बाळासाहेब परुळेकर, आदी उपस्थित होते.यावेळी खेमसावंत भोसले म्हणाले, ग्रामीण विकास हे पर्यटन क्षेत्राचे मूळ आहे. पर्यटनाचा विकास हा गावातूनच झाला पाहिजे. तरच नवनवीन पर्यटन क्षेत्रे तयार होतील. रोजगारांची साधने उपलब्ध होणार असून, ‘मामाचा गाव’ हा खरा चांगला उपक्रम पुन्हा एकदा सुरू व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे. गावातील रस्ते चांगले असतील तरच पर्यटक येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. ४0 रिक्षास्वारांचा सत्कारअध्यक्ष डी. के. सावंत म्हणाले, २० वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला. मात्र, त्याचा प्रत्यक्षात आराखडाच कुठे दिसत नाही. आजही महत्त्वाच्या ठिकाणी शौचालये नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने सावंतवाडीतील ४० रिक्षास्वारांचा सत्कार करण्यात आला. तसेच पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या विविध व्यक्तींचा राजमाता सत्वशीलादेवी भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)‘रात्रीस खेळ चाले’मुळे रोजगार मिळाला : प्रल्हाद कुडतरकरअभिनेता प्रल्हाद कुडतरकर म्हणाला, सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेगवेगळ््या चित्रपटांचे, तसेच मालिकांचे चित्रीकरण झाले, तर मोठ्या प्रमाणात अनेक कलाकार जिल्ह्यात येतील. त्यामुळे येथील पर्यटनाची सर्वांना माहिती होईल. आपण ते करणे गरजेचे आहे. येथील पर्यटनाला लागणाऱ्या सुविधा चांगल्या ठेवल्या, तर गावातही चित्रीकरण होईल, असेही त्यांनी सांगितले. ‘रात्रीस खेळ चाले’मुळे अनेकांना रोजगार मिळाला. तसेच या मालिकेमुळे सर्वांना सिंधुदुर्गबद्दल एक वेगळी छाप पडली. त्याचा फायदाही येथील लोकांना होईल. अनेक पर्यटक भविष्यात सिंधुदुर्गमध्ये येतील, असेही यावेळी कुडतरकर म्हणाले.