शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गव्यांकडून बागा उद्ध्वस्त

By admin | Updated: December 17, 2015 01:26 IST

आवाडेतील शेतकरी हवालदिल : वनविभागाचे दुर्लक्ष, भरपाई देण्याची मागणी

कसई दोडामार्ग : सहा गव्यांच्या कळपाने आवाडे-वेळपईवाडी येथील तीन शेतकऱ्यांची सुमारे ७०० केळीची रोपे मंगळवारी रात्री उद्ध्वस्त केली. वनविभागाने आमच्या बागायती ताब्यात घेऊन आम्हाला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी बागायतदार नंदकिशोर दळवी, गुरूनाथ दळवी, संजय दळवी यांनी केली आहे.वेळपईवाडीत गव्यांचा वावर वाढला असून सहा गवे या परिसरात वास्तव्यास असल्याचे समजते. वेळपईवाडीत नंदकिशोर दळवी, गुरूनाथ दळवी, संजय दळवी यांनी सुमारे १५०० केळींची लागवड केली आहे. केळीच्या रोपांना तीन महिने झाले आहेत. बागायतीत गव्यांचा वावर वाढत असल्याने अ‍ॅटमबॉम्ब, फटाक्यांचा आवाज करून हुसकावून लावण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. याबाबत वनविभागालाही कळविण्यात आले आहे. वनविभागाचे कर्मचारी कायद्याच्या चौकटीत राहून तुटपुंजा पंचनामा करत आहेत. यामुळे शेतकरी भरडला जात आहे. शासन नियमानुसार पीक मुळासहीत उन्मळून टाकली, तरच त्या पिकांचा पंचनामा केला जातो. कायद्याच्या नियमाप्रमाणे वनकर्मचारी पंचनामे करीत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. मंगळवारी रात्री सहा गव्यांच्या कळपाने वेळपईवाडीतील केळी, बागायतीत घुसखोरी केली. नंदकिशोर, गुरूनाथ, संजय यांच्या बागायतीतील केळी गव्यांनी पूर्ण फस्त केल्या. वनविभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळवून द्यावी. शिवाय उर्वरित बागायतीच्या संरक्षणासाठी गव्यांचा बंदोबस्त करावा. अन्यथा दोडामार्ग तालुक्यातील शेतकरी २६ जानेवारी रोजी वनविभाग कार्यालयासमोर आंदोलन उपोषण करण्याचा इशारा दोडामार्ग तालुका शेतकरी संघटनेने दिला आहे. (वार्ताहर)न्याय द्या : नंदकिशोर दळवीगवा रेड्यांनी किंवा अन्य वन्य प्राण्यांनी पूर्ण ओरबाडून खालेले पीक जगणे कठीण आहे. वस्तूनिष्ठ परिस्थिती पाहून वन्यप्राण्यांकडून खाल्ले गेलेले पीक जिवंत राहील काय, त्या पिकापासून फळधारणा होईल काय, याचा विचार करून अशा रोपांचा पंचनामा करावा. शिवाय त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी खास बाब म्हणून या प्रश्नावर आवाज उठवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी नंदकिशोर दळवी यांनी केली आहे.