शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

गव्यांकडून बागा उद्ध्वस्त

By admin | Updated: December 17, 2015 01:26 IST

आवाडेतील शेतकरी हवालदिल : वनविभागाचे दुर्लक्ष, भरपाई देण्याची मागणी

कसई दोडामार्ग : सहा गव्यांच्या कळपाने आवाडे-वेळपईवाडी येथील तीन शेतकऱ्यांची सुमारे ७०० केळीची रोपे मंगळवारी रात्री उद्ध्वस्त केली. वनविभागाने आमच्या बागायती ताब्यात घेऊन आम्हाला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी बागायतदार नंदकिशोर दळवी, गुरूनाथ दळवी, संजय दळवी यांनी केली आहे.वेळपईवाडीत गव्यांचा वावर वाढला असून सहा गवे या परिसरात वास्तव्यास असल्याचे समजते. वेळपईवाडीत नंदकिशोर दळवी, गुरूनाथ दळवी, संजय दळवी यांनी सुमारे १५०० केळींची लागवड केली आहे. केळीच्या रोपांना तीन महिने झाले आहेत. बागायतीत गव्यांचा वावर वाढत असल्याने अ‍ॅटमबॉम्ब, फटाक्यांचा आवाज करून हुसकावून लावण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. याबाबत वनविभागालाही कळविण्यात आले आहे. वनविभागाचे कर्मचारी कायद्याच्या चौकटीत राहून तुटपुंजा पंचनामा करत आहेत. यामुळे शेतकरी भरडला जात आहे. शासन नियमानुसार पीक मुळासहीत उन्मळून टाकली, तरच त्या पिकांचा पंचनामा केला जातो. कायद्याच्या नियमाप्रमाणे वनकर्मचारी पंचनामे करीत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. मंगळवारी रात्री सहा गव्यांच्या कळपाने वेळपईवाडीतील केळी, बागायतीत घुसखोरी केली. नंदकिशोर, गुरूनाथ, संजय यांच्या बागायतीतील केळी गव्यांनी पूर्ण फस्त केल्या. वनविभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळवून द्यावी. शिवाय उर्वरित बागायतीच्या संरक्षणासाठी गव्यांचा बंदोबस्त करावा. अन्यथा दोडामार्ग तालुक्यातील शेतकरी २६ जानेवारी रोजी वनविभाग कार्यालयासमोर आंदोलन उपोषण करण्याचा इशारा दोडामार्ग तालुका शेतकरी संघटनेने दिला आहे. (वार्ताहर)न्याय द्या : नंदकिशोर दळवीगवा रेड्यांनी किंवा अन्य वन्य प्राण्यांनी पूर्ण ओरबाडून खालेले पीक जगणे कठीण आहे. वस्तूनिष्ठ परिस्थिती पाहून वन्यप्राण्यांकडून खाल्ले गेलेले पीक जिवंत राहील काय, त्या पिकापासून फळधारणा होईल काय, याचा विचार करून अशा रोपांचा पंचनामा करावा. शिवाय त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी खास बाब म्हणून या प्रश्नावर आवाज उठवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी नंदकिशोर दळवी यांनी केली आहे.