शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
2
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
3
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
4
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
5
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
6
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
7
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
8
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
9
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
10
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
11
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
12
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
13
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
14
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
15
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
16
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
17
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
18
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
19
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
20
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट

गव्यांकडून बागा उद्ध्वस्त

By admin | Updated: December 17, 2015 01:26 IST

आवाडेतील शेतकरी हवालदिल : वनविभागाचे दुर्लक्ष, भरपाई देण्याची मागणी

कसई दोडामार्ग : सहा गव्यांच्या कळपाने आवाडे-वेळपईवाडी येथील तीन शेतकऱ्यांची सुमारे ७०० केळीची रोपे मंगळवारी रात्री उद्ध्वस्त केली. वनविभागाने आमच्या बागायती ताब्यात घेऊन आम्हाला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी बागायतदार नंदकिशोर दळवी, गुरूनाथ दळवी, संजय दळवी यांनी केली आहे.वेळपईवाडीत गव्यांचा वावर वाढला असून सहा गवे या परिसरात वास्तव्यास असल्याचे समजते. वेळपईवाडीत नंदकिशोर दळवी, गुरूनाथ दळवी, संजय दळवी यांनी सुमारे १५०० केळींची लागवड केली आहे. केळीच्या रोपांना तीन महिने झाले आहेत. बागायतीत गव्यांचा वावर वाढत असल्याने अ‍ॅटमबॉम्ब, फटाक्यांचा आवाज करून हुसकावून लावण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. याबाबत वनविभागालाही कळविण्यात आले आहे. वनविभागाचे कर्मचारी कायद्याच्या चौकटीत राहून तुटपुंजा पंचनामा करत आहेत. यामुळे शेतकरी भरडला जात आहे. शासन नियमानुसार पीक मुळासहीत उन्मळून टाकली, तरच त्या पिकांचा पंचनामा केला जातो. कायद्याच्या नियमाप्रमाणे वनकर्मचारी पंचनामे करीत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. मंगळवारी रात्री सहा गव्यांच्या कळपाने वेळपईवाडीतील केळी, बागायतीत घुसखोरी केली. नंदकिशोर, गुरूनाथ, संजय यांच्या बागायतीतील केळी गव्यांनी पूर्ण फस्त केल्या. वनविभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळवून द्यावी. शिवाय उर्वरित बागायतीच्या संरक्षणासाठी गव्यांचा बंदोबस्त करावा. अन्यथा दोडामार्ग तालुक्यातील शेतकरी २६ जानेवारी रोजी वनविभाग कार्यालयासमोर आंदोलन उपोषण करण्याचा इशारा दोडामार्ग तालुका शेतकरी संघटनेने दिला आहे. (वार्ताहर)न्याय द्या : नंदकिशोर दळवीगवा रेड्यांनी किंवा अन्य वन्य प्राण्यांनी पूर्ण ओरबाडून खालेले पीक जगणे कठीण आहे. वस्तूनिष्ठ परिस्थिती पाहून वन्यप्राण्यांकडून खाल्ले गेलेले पीक जिवंत राहील काय, त्या पिकापासून फळधारणा होईल काय, याचा विचार करून अशा रोपांचा पंचनामा करावा. शिवाय त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी खास बाब म्हणून या प्रश्नावर आवाज उठवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी नंदकिशोर दळवी यांनी केली आहे.