शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

‘स्नेहबंध’मुळेच सलोखा : देशमुख

By admin | Updated: November 9, 2014 23:34 IST

ताणतणाव नष्ट व्हावा, या हेतूने व महिला भगिनींना सुरक्षितता मिळावी, यासाठी स्नेहबंध

रत्नागिरी : स्नेहबंधचा उपक्रम स्तुत्य असून, विभागातील सर्व कर्मचारी एकत्र येतात. नियमित काम करताना येणारा ताण तणाव दूर होऊन अशा प्रकारच्या कार्यक्रमामुळे प्रेरणा मिळते. परिणामी प्रशासनात गती येते, असे प्रतिपादन विभाग नियंत्रक के. बी. देशमुख यांनी केले.राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागातील वाहतूक शाखेतर्फे स्नेहबंध कार्यक्रम दरवर्षी राबविण्यात येतो. शनिवारी झालेल्या या कार्यक्रमात महिला कर्मचाऱ्यांनी पुरूष कर्मचाऱ्यांचे पारंपरिक पध्दतीने औक्षण केले. त्यानंतर पुरूष मंडळींनी महिला भगिनींना भाऊबीज म्हणून साड्यांचे वितरण केले. या कार्यक्रमाला मुंबई विभाग वाहतूक नियंत्रक डी. के. कुरतडकर, विभागीय लेखाधिकारी संदीप हरणे, विभागीय सांख्यिकी अधिकारी दीपिका कुंडले, प्रभारी विभागीय वाहतूक अधिकारी एस. एच. सुर्वे, महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेचे विभागीय सचिव शेखर सावंत आदी उपस्थित होते.प्रारंभी एस. व्ही. राजहंस यांनी गाणे सादर केले. त्यानंतर सर्व महिला भगिनींना भाऊबीज वाटप करण्यात आले. प्रभारी विभागीय वाहतूक अधिकारी एस. एच. सुर्वे यांनी मार्गदर्शन करताना डी. के. कुरतडकर यांच्या संकल्पनेतून संबंधित कार्यक्रम राबविण्यात येत असून, महिला कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षितता व सलोख्याचे वातावरण निर्माण व्हावे, हाच उद्देश असल्याचे विशद केले. हा उपक्रम स्तुत्य असून, अन्य विभागामध्येही अशा प्रकारचा उपक्रम सुरु करण्यात यावा, अशी सूचना राजलक्ष्मी सुर्वे यांनी केली. महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेचे विभागीय सचिव शेखर सावंत यांनी शुभेच्छा दिल्या.मुंबई विभाग नियंत्रक डी. के. कुरतडकर यांनी राजापूर आगारापासून या कार्यक्रमाला सुरुवात केली. कोल्हापूर विभागातदेखील या कार्यक्रमाला प्रतिसाद लाभला. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये जवळीक निर्माण होऊन काम सहजसुलभ होते. ताणतणाव नष्ट व्हावा, या हेतूने व महिला भगिनींना सुरक्षितता मिळावी, यासाठी स्नेहबंध सुरु करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजन जोशी यांनी केले. (प्रतिनिधी)