शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
5
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
6
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
7
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
8
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
9
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
10
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
11
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
12
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
13
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
14
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
15
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
16
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
17
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
18
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
19
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
20
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा

आंबा उत्पादनाबरोबर निर्यात वाढ हवी : देशमुख

By admin | Updated: February 25, 2015 00:11 IST

युरोपिय देशांनी फळमाशीचे कारण देत काही अटी ठेवत निर्यातीवरील बंदी उठविली असली तरी भाजीपाला निर्यातीवील बंदी कायम ठेवली आहे.

रत्नागिरी : महाराष्ट्रातून ४१ हजार मेट्रिक टनापेक्षा अधिक आंबा निर्यात होतो. रोजगार हमी योजनेंतर्गत १८ लाख हेक्टर क्षेत्रावर आंब्याची लागवड करण्यात आली आहे. जिल्ह्याचे मुख्य पीक भात असले तरी ते उदरनिर्वाहासाठी असून, आंबा हे पैसे मिळवून देणारे पीक आहे. शेतकऱ्यांनी आंबा उत्पादकतेबरोबर निर्यातीसाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन राज्य कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी केले.कृषी विभाग आणि फलोत्पादन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आंबा निर्यातीच्या संधी व आव्हाने’ या विषयावर आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वेंकटश्वरलू, केंद्र शासनाचे प्लँट प्रोटेक्शन अ‍ॅडव्हायजर डॉ. सुशील, अपेडाचे संचालक डॉ. ए. एस. रावत, उपमहाव्यवस्थापक डॉ. सुधांशू, रिजनल प्लँट क्वारंटाईन मुंबईचे डॉ. जे. पी. सिंग, जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार काळम-पाटील, पणन विभागाचे मिलिंद जोशी, पर्णिका बुरांडे, शास्त्रज्ञ डॉ. बुरोणकर, जिल्हा कृषी अधीक्षक सी. एस. गायकवाड उपस्थित होते.  युरोपिय देशांनी फळमाशीचे कारण देत काही अटी ठेवत निर्यातीवरील बंदी उठविली असली तरी भाजीपाला निर्यातीवील बंदी कायम ठेवली आहे. आंब्यावर सुमारे ६० मिनिटे ४० अंश सेल्सिअस उष्णजल प्रक्रिया केल्यावर आंब्याच्या दर्जावर काही परिणाम होईल का, याबाबत संशोधन सुरू आहे. परंतु भविष्यात निर्यात अखंड राहण्यासाठी आंबा लागवड, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, कीटकनाशक फवारणी, फळमाशी नियंत्रणासाठी रक्षक सापळ्यांचा वापर याबाबत शेतकऱ्यांनी सतर्क राहाणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांसाठी फायटोसॅनेटरी प्रमाणपत्राची उपलब्धता करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून वेळोवेळी शास्त्रीयदृष्ट्या माहिती देण्यात येईल, असे देशमुख यांनी सांगितले. यावेळी ‘आंबा निर्यात संधी व आव्हाने’ मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. फलोत्पादन विभागाचे संचालक डॉ. एस. एस. अडसूळ यांनी प्रास्ताविक केले. अपेडाचे संचालक डॉ. ए. एस. रावत यांनी हापूसचा दर्जा टिकवून ठेवण्याचे आवाहन केले.केंद्र शासनाचे वनस्पती संरक्षण सल्लागार सुशील यांनी आंब्याचे एक हजार प्रकार असले तरी निर्यात कमी आहे, असे सांगितले. मँगोनेट प्रमाणपत्र डॉ. विवेक भडे व नरहरी वैद्य यांना वितरीत करण्यात आले. सूत्रसंचालन आरीफ शहा व मनीषा शहा यांनी केले. विभागीय कृषी संचालक जाधव यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)