शहरं
Join us  
Trending Stories
1
"गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार", लष्कर-ए-जिहादीच्या नावाने केलेला मेसेज! आरोपीला पोलिसांनी केली अटक
2
"विश्वासघातकी बदलणार नाहीत...", निवडणुकीपूर्वी भाजपाला धक्का; NDA तून आणखी एक मित्रपक्ष बाहेर पडला
3
'ऑपरेशन सिंदूर'चे ८८ तास... लष्करप्रमुख 'पडद्यामागची गोष्ट' सांगत म्हणाले- "त्या वेळी..."
4
देशभरात एकाच वेळी लागू होणार SIR, वादविवादादरम्यान निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
ट्रम्प टॅरिफमुळे GST मध्ये बदल केला का? अर्थमंत्र्यांचं स्पष्टीकरण; म्हणाल्या, "गेल्या दीड वर्षांपासून..."
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया दुबईत पोहचली; आशियातील किंग होण्यासाठी ICC अकादमीत कसून सराव
7
"हिरोईन मटेरियल तू वाटत नाहीस...", असं म्हणत अभिनेत्रीला मालिकेतून दाखवला बाहेरचा रस्ता
8
उमेश कामत-प्रिया बापटच्या यशस्वी संसाराचं रहस्य काय? म्हणाले, "आम्ही वैयक्तिक स्तरावर..."
9
Anil Chauhan: चीनसोबतचा सीमावाद हे सर्वांत मोठे आव्हान; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे वक्तव्य
10
यमुनेच्या पुराने अर्धी दिल्ली पाण्यात; नोएडा, गाझियाबादमध्ये स्थिती बिकट
11
अल्काराझ-सिनर जोडीसमोर निभाव लागेना! प्रत्येक वेळी दोघांपैकी एक येतोय जोकोच्या आडवा
12
‘सीसीएमपी’ अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना दिलासा, होमिओपॅथी डॉक्टर ‘एमएमसी’मध्ये नोंद करू शकणार
13
Viral Video : पोर्शमध्ये आई तर फॉर्च्युनरमध्ये मुलगा, रस्त्यावर लागली भन्नाट रेस! व्हिडीओ बघून व्हाल थक्क
14
घोड्यांचे रक्त पाजून ब्राझीलच्या फॅक्टरीत दररोज तयार केले जातात कोट्यवधी मच्छर; कारण काय?
15
ते ‘ट्रम्प’ आणि हे ‘पिपाण्या’…एवढाच काय तो फरक; भाजपानं उद्धव ठाकरेंची उडवली खिल्ली
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक कौतुक करताच पंतप्रधान मोदी यांनीही मानले आभार! म्हणाले...
17
"मोदी आणि मी कायम मित्र राहू..."; अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
18
कडेकोट सुरक्षा व्यवस्था भेदली, लाल किल्ल्यात मौल्यवान वस्तूवर चोरट्याचा डल्ला, कोट्यवधीमध्ये आहे किंमत   
19
राष्ट्रसंत मोरारी बापू यांना राज्य सरकारकडून अतिथी दर्जा!
20
OBC Reservation: ओबीसी आरक्षण संपविणारा काळा कागद म्हणजे सरकारचा मराठा जीआर!

जिल्ह्यात डेंग्यूने केलीय शंभरी पार

By admin | Updated: November 22, 2014 00:15 IST

१४ रुग्ण वाढले : आरोग्य विभाग झाला अधिकच सतर्क

रत्नागिरी : जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले असून, आतापर्यंत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या १०२ झाली आहे. मात्र, यामध्ये एकही रुग्ण दगावलेला नाही. सध्या मुंबईसह संपूर्ण राज्यात डेंग्यू या रोगाची लागण मोठ्या प्रमाणात झालेली आहे. त्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरली आहे. या रोगाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात होऊ नये, यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभाग युध्दपातळीवर जनजागृती करीत आहे. तरीही गेल्या चार दिवसांमध्ये जिल्ह्यात डेंग्यूचे १४ रुग्ण वाढल्याने आरोग्य विभाग अधिकच सतर्क झाला आहे. घरोघरी सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र खंडागळे यांनी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना दिले आहेत. डेंग्यू हा आजार दिवसा चावणाऱ्या एडिस ईजिप्ती या डासांपासून होतो. यामध्ये २ ते ७ दिवस तीव्र स्वरुपाचा ताप येतो. त्यानंतर डोके दुखी, सांधेदुखी, कंबरदुखी आदी लक्षणे उद्वतात. सन २०१३ या वर्षात नोव्हेंबर महिन्यापर्यंत जिल्ह्यात ११७ डेंग्यूचे रुग्ण होते. मात्र, चालू आर्थिक वर्षाच्या नोव्हेंबरपर्यंतची स्थिती पाहता आतापर्यंत डेंग्यूचे १०२ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी त्यांच्यावर आरोग्य विभाग, जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्याकडून योग्य उपचार केले जात असल्याने त्यांच्या तब्बेतीमध्ये सुधारणा होऊन ते घरी गेले आहेत. यातील काही रुग्णांवर अजूनही उपचार सुरु आहेत. मात्र, डेंग्यूच्या आजाराने वर्षभरात जिल्ह्यात एकही रुग्ण दगावलेला नाही, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. (शहर वार्ताहर)तालुकाडेंग्यूचे रुग्णमंडणगड०० दापोली०८ खेड०४ चिपळूण१०गुहागर१६संगमेश्वर२०रत्नागिरी३५लांजा०७ राजापूर०२एकूण१०२