शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
4
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
5
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
6
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
7
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
8
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
9
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
10
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
11
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
12
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
13
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
14
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
15
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
16
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
17
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
18
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
19
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
20
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?

डेंग्यू सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक वस्तूंना मागणी

By admin | Updated: November 11, 2014 23:17 IST

रत्नागिरी जिल्हा : नागरिकांमध्ये होतेय जागरूकता

रत्नागिरी : संपूर्ण जिल्ह्यात नव्हे; तर अवघ्या राज्यात डेंग्यूने थैमान घातले आहे. शासकीय तसेच खासगी रूग्णालयात डेंग्यूचे रूग्ण उपचार घेत आहेत. डेंग्यूची भीती सर्वसामान्यांमध्ये पसरली आहे. डासांमुळे डेंग्यूचा प्रसार होत असल्यामुळे नागरिकांकडून खबरदारी म्हणून डास प्रतिबंधात्मक वस्तूंना मागणी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेली ‘स्वच्छ व सुंंदर भारत’ संकल्पना राबवण्यासाठी शासकीय, निमशासकीय कार्यालये सरसावली आहेत. त्याच अनुषंगाने डेंग्यूपासून बचावासाठी खबरदारी म्हणून नागरिकदेखील आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी खबरदारी घेत आहेत. नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थादेखील सफाईबरोबर गवतकटाई करीत आहेत. ग्रामीण भागात तर डास प्रतिबंध म्हणून चक्क नारळाची सोडणे, गवऱ्या यांचा धूर करण्यात येत आहे.डास चाऊ नये, यासाठी नागरिकांकडून ओडोमाससारख्या प्रसाधनांचा वापर वाढू लागला आहे. गुडनाईट अ‍ॅडव्हान्सला मागणी वाढू लागली आहे. शिवाय क्वाईलसचाही खप वाढला आहे. मच्छरदाणी हा डासापासून संरक्षणासाठी प्रभावी उपाय पारंपरिक आहे. मात्र, छोट्या घरात मच्छरदाणी लावणे शक्य होत नसल्यामुळे त्याऐवजी ओडोमाससारखी प्रसाधने किंवा गुडनाईटचा वापर वाढला आहे. बालकांसाठी तर आवर्जून मच्छरदाणीचा वापर करण्यात येत आहे. डेंग्यूमुळे शरीरातील प्लेटलेस कमी होतात. प्लेटलेटस वाढण्यासाठी काळा खजूर तसेच अंजीरचा वापर उपयुक्त ठरत असल्याने काळा खजूर व सुक्या अंजीरचा खपही वाढलेला दिसून येत आहे. पपईमुळेदेखील प्लेटलेटस् वाढत असल्यामुळे पपईलाही विशेष मागणी दिसून येत आहे. डेंग्यूची फैलावणारी साथ आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करताना नागरिकांचे प्रबोधनही करण्यात येत आहे. वास्तविक नोव्हेंबरमध्ये हिवाळा असतो. परंतु यावर्षी थंडी गायब असल्यामुळे उकाडा मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. पाणीसाठा असणाऱ्या ठिकाणी डेंग्यूची पैदास होत असल्याने नागरिक जागरूक होत आहेत. (प्रतिनिधी)