शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

रशियामध्ये हापूसची मागणी वाढतीच

By admin | Updated: May 19, 2017 23:23 IST

रशियामध्ये हापूसची मागणी वाढतीच

मेहरुन नाकाडे । लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : ‘मँगोनेट’ प्रणालीद्वारे जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांचा आंबा आतापर्यंत कुवेत व रशियामध्ये निर्यात झाला आहे. गेल्या आठवड्यापर्यंत ४ हजार ७७३ किलो आंबा निर्यात करण्यात आला होता. शुक्रवारी आणखी १ हजार १२८ मेट्रीक टन आंबा निर्यात झाल्याने आतापर्यंत झालेल्या निर्यातीचा आकडा ५ हजार ९०१ मेट्रीक टन झाला आहे. कुवेत, रशियाकडून हापूसची मागणी वाढतच असून, नियमित पाऊस सुरू होईपर्यत आंबा निर्यात सुरू राहणार आहे.मँगोनेट प्रणालीअंतर्गत जिल्ह्यातील २०४३ आंबा बागांची नोंदणी करण्यात आली आहे. यावर्षी थेट रशिया व कुवेतसाठी हापूसला मागणी आल्याने आंबा निर्यात करण्यात आला आहे. अनिकेत हर्षे (नेवरे, ता. रत्नागिरी), डॉ. खलिफे (राजापूर) आणि सचिन लांजेकर (रत्नागिरी) यांच्या बागेतील आंबा कुवेत व रशियामध्ये निर्यात झाला आहे. रशियामध्ये आंबा निर्यातीसाठी वजनाची अट निश्चित करण्यात आली आहे. २७० ग्रॅमपेक्षा अधिक वजनाचे फळ निर्यातीसाठी ग्राह्य धरण्यात येत आहे. त्यामुळे किलोला चार फळे बसत आहेत. निर्यातीपूर्वी केवळ फायटो सॅनिटरी प्रक्रिया करण्यात येत आहे. आतापर्यंत रत्नागिरीतून प्रथमच कुवेत व रशियामध्ये आंबा निर्यात झाला आहे. सुरळीत निर्यात प्रक्रिया व उच्च दर यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. सध्यातरी बाष्पजल प्रक्रिया निर्यातीच्या आंब्यावर सुरू आहे. ही सुविधा मुंबईत उपलब्ध आहे. रत्नागिरी व जामसंडे (सिंधुदुर्ग) येथे उष्णजल प्रक्रिया केंद्र उभारण्यात आली आहेत. परदेशात आंबा निर्यात करण्यासाठी व्यापारी रत्नागिरीत येत असले तरी त्यांना आंबा खरेदी, बाष्पजल प्रक्रिया, पॅकिंग, वाहतूक खर्च परवडत नसल्यामुळे त्यांची संख्या घटली आहे. व्यापाऱ्यांनी पहिल्यांदा मार्च अखेरीस आंबा खरेदी केला. त्यानंतर टप्याटप्याने चार कन्साईटमेंट कुवेत व चार कन्साईटमेंट रशियासाठी पाठविण्यात आल्या आहेत. कुवेत, रशियाकडून आंब्याला चांगली मागणी आहे. कुवेत येथे २ हजार १५४ मेट्रीक टन, तर रशियामध्ये ३ हजार ४४७ मेट्रीक टन आंबा निर्यात करण्यात आला. पाऊस सुरू होईपर्यंत दोन्ही देशांतून हापूसला मागणी आहे.वाशी मार्केटमधून आंब्याची निर्यात सुरू आहे. निर्यातीपूर्वीच्या सर्व प्रक्रिया मुंबईत एकाच छताखाली होत असल्याने निर्यातदारांना सोपे झाले आहे. कुवेत व रशियाला आंबा निर्यात करण्यासाठी बाष्पजल किंवा उष्णजल प्रक्रिया करावी लागत नसल्यामुळे केवळ फायटो सॅनिटरी प्रक्रिया करण्यात येत आहे. सध्या मुंबई मार्केटमध्ये १०० ते २०० रुपये डझन दराने आंबा विक्री सुरू आहे, तर स्थानिक बाजारपेठेत १२५ ते ३५० रुपये डझने दराने आंबा विकला जात आहे. कुवेत, रशियामध्ये जाणाऱ्या आंब्याला मात्र मोठा भाव मिळाला आहे. पावसाळा तोंडावर असला तरी आंब्याच्या निर्यातीत वाढ होण्याची शक्यता आहे. यावर्षीपासून मँगोनेटद्वारे कुवेत व रशियाची बाजारपेठ खुली झाली आहे. भविष्यात अन्य देशांत निर्यात वाढण्याची शक्यता आहे.उष्णजल प्रक्रिया अजून थंडचयुरोपीय देशांनी फळमाशीचे कारण देत आंबा निर्यातीवर बंदी आणली होती. निर्यात प्रक्रिया सुरू करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू असतानाच उष्णजलचा पर्याय ठेवण्यात आला. विविध तापमानात आंब्याची चाचणी घेण्यात आली. ४७ अंश सेल्सियस तापमानात ५० मिनिटे प्रक्रिया केली तर आंबा खराब होत नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. तसा अहवाल अपेडाकडे सादर करण्यात आला. अपेडाने मान्यता दिली, परंतु त्यानंतर तो अहवाल पुढे फरिदाबाद येथील नॅशनल प्लॅन प्रोटेक्शन आॅर्गनायझेशनकडे पाठविण्यात आला. मात्र, तेथील मान्यता अद्याप रखडली आहे.काय आहे मँगोनेट?दर्जेदार आंब्याची परदेशामध्ये थेट निर्यात होऊन शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा यासाठी २०१५ मध्ये मँगोनेट प्रणाली सुरू करण्यात आली. दोन वर्षे मँगोनेटद्वारे आंबा निर्यात झाला नाही. यावर्षी मँगोनेट अंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांकडे परदेशातील व्यापाऱ्यांनी थेट संपर्क साधून आंबा खरेदी केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना स्थानिक व मुंबई मार्केटपेक्षा चांगला दर उपलब्ध होत आहे.