शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

नगरसेवकांना अपात्र ठरविण्याची मागणी

By admin | Updated: October 24, 2015 00:55 IST

चिपळूण : लियाकत शहा यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

अडरे : पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आल्यानंतर पक्षाशी फारकत घेऊन राजीनामा न देता स्वतंत्र गट स्थापणाऱ्या राष्ट्रवादीच्या ८ नगरसेवकांना अपात्र ठरवावे, अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष लियाकत शाह यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. सन २०११मध्ये झालेल्या चिपळूण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत २४ पैकी १२ राष्ट्रवादी, ३ काँग्रेस, ४ शिवसेना, ५ शहर विकास आघाडी असे सदस्य निवडून आले. राष्ट्रवादी १२ व काँग्रेस ३ अशी १५ सदस्य संख्या झाल्याने नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची संयुक्त सत्ता स्थापन झाली. सार्वत्रिक निवडणुकीनंतर स्वीकृत सदस्यांच्या निवडीकरिता राष्ट्रवादीच्याच १२ नगरसेवकांपैकी निर्मला चिंगळे, तेजश्री सकपाळ, राजेश केळस्कर, शिल्पा सप्रे-भारमल, आदिती देशपांडे, नगराध्यक्षा सावित्री होमकळस, शहाबुद्दिन सुर्वे व रुक्सार अलवी या ८ जणांनी स्वतंत्रपणे चिपळूण आघाडी या नावाने गट स्थापन केला. या करिता वरिल ८ जणांना कागदोपत्री पक्षातून फारकत घेतल्याचे नमूद करावे लागले तर राष्ट्रवादीचे उर्वरित ४ व काँग्रेसचे ३ मिळून ७ जणांचा राष्ट्रवादी-राष्ट्रीय काँगे्रस आघाडी नावाने गट स्थापण्यात आला. पक्षातून फारकत घेऊन ४ वर्षे होवूनही ८ जणांच्या गटाने आपल्या गटाला राष्ट्रवादी वगळता अन्य कोणत्यातरी पक्षात विलीन करणे गरजेचे होते. मात्र तसे न करता स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडणुकीनंतर ८ जणांचा गट राष्ट्रवादीचाच म्हणून अजूनही कार्यरत आहे. यावर राष्ट्रवादीतून अथवा विरोधी गटातून कोणतीही विचारणा होत नाही. याविरोधात काँग्रेसचे नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष शाह यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिका दाखल केली असून, रत्नागिरी नगर परिषदेतील ४ नगरसेवकांच्या अपात्रतेच्या पार्श्वभूमीवर व तांत्रिक कारणास्तव राष्ट्रवादीतील ८ नगरसेवक अपात्र ठरु शकतात, असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला आहे. याबाबत शाह यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकारी, नेते यांच्याशी चर्चा केली असून, त्यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले. नगर पालिकेच्या सत्तेतील सहकारी असूनही आम्हाला मासिक बैठकीकरिताही व्हीप बजावून आमची गळचेपी करणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई नसल्याचे ते म्हणाले. (वार्ताहर)स्वतंत्र गट : राष्ट्रवादीच्या आठ नगरसेवकांबाबत आक्षेपराष्ट्रवादीचे नगरसेवक म्हणून कार्यरत असताना त्यांनी वेगळा गट स्थापन केला. पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांनी पक्षातून बाहेर पडणे गरजेचे होते. मात्र, तसे न करता स्वीकृत नगरसेवक पदांच्या निवडणुकीनंतर हा गट राष्ट्रवादीचाच गट म्हणून कार्यरत आहे.चार वर्षानंतरही कोणतीच कारवाई नाही.व्हीप बजावूनही गळचेपी धोरण.कोणत्याही पक्षात विलीन नाही.वरिष्ठ स्तरावरही दखल.पक्षाचे नगरसेवकपक्षातून फारकत घेऊन ४ वर्षे होऊनही आठ जणांच्या गटाने आपल्या गटाला राष्ट्रवादीवगळता अन्य कोणत्या तरी पक्षात विलीन करणे गरजेचे होते. मात्र, तसे न करता हे नगरसेवक राष्ट्रवादीचेच म्हणून कार्यरत आहेत. हे चुकीचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.