शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

जमीन संपादन प्रक्रिया रद्द करण्याची मागणी

By admin | Updated: July 8, 2014 00:43 IST

रेडी पर्यायी रस्त्याबाबत ग्रामस्थांचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

सावंतवाडी : कनयाळ येथील तेरेखोल रस्ता ते रेडी बंदर पर्यायी रस्त्यामधून घरे व मंदिरे जात असल्याने रेडी बंदर पर्यायी रस्तासाठी करण्यात आलेले जमिनीचे संपादन प्रस्ताव रद्द करणे याबाबत बाधित शेतकऱ्यांनी सोमवारी येथील प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांना निवेदन दिले. जमीन सर्व्हेमध्ये फरक आल्यास पुन्हा सर्व्हे करून,असे आश्वासन यावेळी तहसीलदार इनामदार यांनी दिले.तेरेखोल रस्ता ते रेडी बंदर पर्यायी रस्ता काढल्यावेळी या शेतकऱ्यांचा जमिनीचा सर्व्हे करताना सर्व्हे अधिकारी यांनी प्रत्यक्ष जमिनींवर न जाता आॅफिसमध्ये बसूनच सर्व्हे केला आहे. त्यामुळे सर्व्हे केलेल्या चुकीचा असून शेतकऱ्यांची काही घरे जात आहेत. तसेच काही मंदिरे जात आहेत. रेडी बंदराक डे जाण्यासाठी अन्य रस्तेही असून नवीन रस्त्याची गरज नाही. सध्या अस्तित्त्वात असलेल्या रस्त्याचा वापर करूनच रेडी पोर्ट यांनी गेल्या पाच वर्षात क्षमतेपेक्षा जास्त मालाचा निर्यात केलेली आहे. यावरून रेडी बंदराचा विकास झाला नाही, हे सिध्द होते. परंतु आताच हा पर्यायी रस्ता का, असा प्रश्नही निवेदनात उपस्थित केला आहे. हा पर्यायी रस्ता १५० शेतकऱ्यांच्या जमिनीतून जात असल्याने त्यामध्ये १२ घरे व मंदिरे जात आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या जमिनीचा सर्व्हे करताना त्यांना ज्या नोटिसा बजावल्या होत्या, त्या तारखेला सर्व्हे अधिकारी यांनी अचानक बदल करून शेतकऱ्यांना पुन्हा नोटिसा न बजावता थेट कार्यालयात बसून याबाबत सर्व्हे केला, असे या ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी यादीपेक्षा जास्त गेल्या आहेत. याबाबत पुन्हा सर्व्हे करावा, अशी मागणी रेडी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच जमीन मोजणीची नोटीस द्यावी, अशीही मागणी आहे. उपविभागीय अधिकारी यांना २९ जानेवारी २०१४ रोजी प्रत्यक्ष जागेवर येऊन या सर्व्हे नंबरमध्ये झालेले सीमांकन दाखविण्याची विनंतीही केली होती. यावेळी उपविभागीय अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी व इतर महसूल अधिकारी यांनी पाहणी केली होती. यानुसार उपविभागीय अधिकारी यांनी संपादनात जाणाऱ्या सर्व्हे नंबरचे पुनश्च सीमांकन करून घेण्यासाठी आदेश दिला होता. परंतु आजपर्यंत पुनश्च सीमांकन झालेले नाही. या सर्व बाबी निवेदनात मांडून प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बापू शंभा सातळी, कृष्णा मराठे, प्रमोद राऊळ, दत्तात्रय कामत, पांडुरंग कनयाळकर, मधुकर कांबळी, सरपंच सुरेखा कांबळी आदी उपस्थित होते. गेल्या ५ वर्षात या भागाचा विकास करता आला नाही. मग आता या पर्यायी रस्त्याने विकास होणार काय, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. तसेच माऊली मंदिर ते जेटी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. मात्र, या रस्त्याकडे दुर्लक्ष करता पर्यायी रस्ता का व्हावा, असाही सवाल उपस्थित केला आहे. (वार्ताहर)