शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
3
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
4
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
5
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
6
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
7
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
8
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
9
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
10
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
11
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
12
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
13
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
14
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
15
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
16
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
17
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
18
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
20
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली

जमीन संपादन प्रक्रिया रद्द करण्याची मागणी

By admin | Updated: July 8, 2014 00:43 IST

रेडी पर्यायी रस्त्याबाबत ग्रामस्थांचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

सावंतवाडी : कनयाळ येथील तेरेखोल रस्ता ते रेडी बंदर पर्यायी रस्त्यामधून घरे व मंदिरे जात असल्याने रेडी बंदर पर्यायी रस्तासाठी करण्यात आलेले जमिनीचे संपादन प्रस्ताव रद्द करणे याबाबत बाधित शेतकऱ्यांनी सोमवारी येथील प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांना निवेदन दिले. जमीन सर्व्हेमध्ये फरक आल्यास पुन्हा सर्व्हे करून,असे आश्वासन यावेळी तहसीलदार इनामदार यांनी दिले.तेरेखोल रस्ता ते रेडी बंदर पर्यायी रस्ता काढल्यावेळी या शेतकऱ्यांचा जमिनीचा सर्व्हे करताना सर्व्हे अधिकारी यांनी प्रत्यक्ष जमिनींवर न जाता आॅफिसमध्ये बसूनच सर्व्हे केला आहे. त्यामुळे सर्व्हे केलेल्या चुकीचा असून शेतकऱ्यांची काही घरे जात आहेत. तसेच काही मंदिरे जात आहेत. रेडी बंदराक डे जाण्यासाठी अन्य रस्तेही असून नवीन रस्त्याची गरज नाही. सध्या अस्तित्त्वात असलेल्या रस्त्याचा वापर करूनच रेडी पोर्ट यांनी गेल्या पाच वर्षात क्षमतेपेक्षा जास्त मालाचा निर्यात केलेली आहे. यावरून रेडी बंदराचा विकास झाला नाही, हे सिध्द होते. परंतु आताच हा पर्यायी रस्ता का, असा प्रश्नही निवेदनात उपस्थित केला आहे. हा पर्यायी रस्ता १५० शेतकऱ्यांच्या जमिनीतून जात असल्याने त्यामध्ये १२ घरे व मंदिरे जात आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या जमिनीचा सर्व्हे करताना त्यांना ज्या नोटिसा बजावल्या होत्या, त्या तारखेला सर्व्हे अधिकारी यांनी अचानक बदल करून शेतकऱ्यांना पुन्हा नोटिसा न बजावता थेट कार्यालयात बसून याबाबत सर्व्हे केला, असे या ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी यादीपेक्षा जास्त गेल्या आहेत. याबाबत पुन्हा सर्व्हे करावा, अशी मागणी रेडी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच जमीन मोजणीची नोटीस द्यावी, अशीही मागणी आहे. उपविभागीय अधिकारी यांना २९ जानेवारी २०१४ रोजी प्रत्यक्ष जागेवर येऊन या सर्व्हे नंबरमध्ये झालेले सीमांकन दाखविण्याची विनंतीही केली होती. यावेळी उपविभागीय अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी व इतर महसूल अधिकारी यांनी पाहणी केली होती. यानुसार उपविभागीय अधिकारी यांनी संपादनात जाणाऱ्या सर्व्हे नंबरचे पुनश्च सीमांकन करून घेण्यासाठी आदेश दिला होता. परंतु आजपर्यंत पुनश्च सीमांकन झालेले नाही. या सर्व बाबी निवेदनात मांडून प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बापू शंभा सातळी, कृष्णा मराठे, प्रमोद राऊळ, दत्तात्रय कामत, पांडुरंग कनयाळकर, मधुकर कांबळी, सरपंच सुरेखा कांबळी आदी उपस्थित होते. गेल्या ५ वर्षात या भागाचा विकास करता आला नाही. मग आता या पर्यायी रस्त्याने विकास होणार काय, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. तसेच माऊली मंदिर ते जेटी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. मात्र, या रस्त्याकडे दुर्लक्ष करता पर्यायी रस्ता का व्हावा, असाही सवाल उपस्थित केला आहे. (वार्ताहर)