शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
8
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
9
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
10
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
11
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
12
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
13
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
14
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
15
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
16
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
17
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
18
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
19
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
20
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला

जमीन संपादन प्रक्रिया रद्द करण्याची मागणी

By admin | Updated: July 8, 2014 00:43 IST

रेडी पर्यायी रस्त्याबाबत ग्रामस्थांचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

सावंतवाडी : कनयाळ येथील तेरेखोल रस्ता ते रेडी बंदर पर्यायी रस्त्यामधून घरे व मंदिरे जात असल्याने रेडी बंदर पर्यायी रस्तासाठी करण्यात आलेले जमिनीचे संपादन प्रस्ताव रद्द करणे याबाबत बाधित शेतकऱ्यांनी सोमवारी येथील प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांना निवेदन दिले. जमीन सर्व्हेमध्ये फरक आल्यास पुन्हा सर्व्हे करून,असे आश्वासन यावेळी तहसीलदार इनामदार यांनी दिले.तेरेखोल रस्ता ते रेडी बंदर पर्यायी रस्ता काढल्यावेळी या शेतकऱ्यांचा जमिनीचा सर्व्हे करताना सर्व्हे अधिकारी यांनी प्रत्यक्ष जमिनींवर न जाता आॅफिसमध्ये बसूनच सर्व्हे केला आहे. त्यामुळे सर्व्हे केलेल्या चुकीचा असून शेतकऱ्यांची काही घरे जात आहेत. तसेच काही मंदिरे जात आहेत. रेडी बंदराक डे जाण्यासाठी अन्य रस्तेही असून नवीन रस्त्याची गरज नाही. सध्या अस्तित्त्वात असलेल्या रस्त्याचा वापर करूनच रेडी पोर्ट यांनी गेल्या पाच वर्षात क्षमतेपेक्षा जास्त मालाचा निर्यात केलेली आहे. यावरून रेडी बंदराचा विकास झाला नाही, हे सिध्द होते. परंतु आताच हा पर्यायी रस्ता का, असा प्रश्नही निवेदनात उपस्थित केला आहे. हा पर्यायी रस्ता १५० शेतकऱ्यांच्या जमिनीतून जात असल्याने त्यामध्ये १२ घरे व मंदिरे जात आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या जमिनीचा सर्व्हे करताना त्यांना ज्या नोटिसा बजावल्या होत्या, त्या तारखेला सर्व्हे अधिकारी यांनी अचानक बदल करून शेतकऱ्यांना पुन्हा नोटिसा न बजावता थेट कार्यालयात बसून याबाबत सर्व्हे केला, असे या ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी यादीपेक्षा जास्त गेल्या आहेत. याबाबत पुन्हा सर्व्हे करावा, अशी मागणी रेडी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच जमीन मोजणीची नोटीस द्यावी, अशीही मागणी आहे. उपविभागीय अधिकारी यांना २९ जानेवारी २०१४ रोजी प्रत्यक्ष जागेवर येऊन या सर्व्हे नंबरमध्ये झालेले सीमांकन दाखविण्याची विनंतीही केली होती. यावेळी उपविभागीय अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी व इतर महसूल अधिकारी यांनी पाहणी केली होती. यानुसार उपविभागीय अधिकारी यांनी संपादनात जाणाऱ्या सर्व्हे नंबरचे पुनश्च सीमांकन करून घेण्यासाठी आदेश दिला होता. परंतु आजपर्यंत पुनश्च सीमांकन झालेले नाही. या सर्व बाबी निवेदनात मांडून प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बापू शंभा सातळी, कृष्णा मराठे, प्रमोद राऊळ, दत्तात्रय कामत, पांडुरंग कनयाळकर, मधुकर कांबळी, सरपंच सुरेखा कांबळी आदी उपस्थित होते. गेल्या ५ वर्षात या भागाचा विकास करता आला नाही. मग आता या पर्यायी रस्त्याने विकास होणार काय, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. तसेच माऊली मंदिर ते जेटी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. मात्र, या रस्त्याकडे दुर्लक्ष करता पर्यायी रस्ता का व्हावा, असाही सवाल उपस्थित केला आहे. (वार्ताहर)