शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

अंजनवेलचा गोपाळगड मुक्त करण्याची मागणी

By admin | Updated: February 19, 2015 23:38 IST

तहसीलदारांकडे मागणी : शिवतेज फाऊंडेशनची शिवजयंतीदिनी मोटारसायकल रॅली

गुहागर : तालुक्यातील अंजनवेल येथील गोपाळगड किल्ला राज्यसंरक्षित स्मारक जाहीर करुन काही वर्षे झाली आहेत. हा किल्ला खाजगी मालकीच्या वादात अडकल्याने पुढील कार्यवाही सरकार दरबारी थांबली असून, हा गड खाजगी मालकीमुक्त होऊन सर्वांसाठी खुला व्हावा, यासाठी शिवतेज फाऊंडेशनच्यावतीने रॅली काढण्यात आली. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या नावाचे निवेदन तहसीलदार वैशाली पाटील यांच्याकडे देण्यात आले.दोन वर्षापूर्वी अ‍ॅड. संकेत साळवी यांच्या अध्यक्षतेखाली शिवतेज फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. गेली दोन वर्षे सामाजिक व ऐतिहासिक प्रबोधनात्मक उपक्रम घेत असताना, अंजनवेल येथील गोपाळगड किल्ला खाजगी मालकीतून मुक्त व्हावा यासाठी सातत्यसाने शासन दरबारी पाठपुरावा सुरु आहे. यासाठी शिवप्रेमींची एक मोठी फळी फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात आली असून, दुसऱ्या वर्धापनदिनी १८ हजार सह्यांचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे तहसीलदार वैशाली पाटील यांच्याकडे आज देण्यात आले. याबाबत सर्वांमध्ये जागृती व्हावी, या उद्देशाने शृंगारतळी ते गुहागर तहसील कार्यालयापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देऊन जनजागृती करण्यात आली.या निवेदनात म्हटले आहे की, शिवरायांच्या स्मृतींना उजाळा देणारा हा किल्ला शासनाच्या ताब्यात येण्यासाठी अनेक अयशस्वी प्रयत्न करण्यात आले. परंतु शासनाच्या उदासीनतेमुळे आजही हा किल्ला पारतंत्र्यात आहे. जो किल्ला शिवरायांनी सागरी सुरक्षेसाठी बांधला होता, त्या गोपाळगडची तटबंदी जाणीवपूर्वक तोडण्याचा प्रयत्न चालू आहे. भविष्यात या किल्ल्याचा उपयोग खाजगी मालकाकडून हॉटेल व्यवसाय व व्यापाराकरिता होऊ शकेल, याची भीती निर्माण झाली आहे. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा किल्ला त्वरित शासनाने ताब्यात घ्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अ‍ॅड. संकेत साळवी, राजेंद्र आरेकर निलेश गोयथळे, मनोज बारटक्के, बाळासाहेब ढेरे, अलंकार विखारे आदींसह तालुक्यात ५०० हून अधिक शिवप्रेमी रॅलीमध्ये सहभागी झाले होते. यासाठी परिसरातील शिवभक्त उपस्थित होते. (प्रतिनिधी)गोपाळगड खाजगी मालकीतून मुक्त व्हावा, यासाठी हे पहिले मोठे पाऊल सर्व शिवप्रेमींच्या पाठिंब्यावर शिवतेज फाऊंडेशनने उचलले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या निवेदनानंतर याबाबत सकारात्मक हालचाली होतील अशा अपेक्षा ठेवून पुढील टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन हा विषय तडीस नेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे फाऊंडेशनचे अध्यक्ष अ‍ॅड. संकेत साळवी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.