शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

अंजनवेलचा गोपाळगड मुक्त करण्याची मागणी

By admin | Updated: February 19, 2015 23:38 IST

तहसीलदारांकडे मागणी : शिवतेज फाऊंडेशनची शिवजयंतीदिनी मोटारसायकल रॅली

गुहागर : तालुक्यातील अंजनवेल येथील गोपाळगड किल्ला राज्यसंरक्षित स्मारक जाहीर करुन काही वर्षे झाली आहेत. हा किल्ला खाजगी मालकीच्या वादात अडकल्याने पुढील कार्यवाही सरकार दरबारी थांबली असून, हा गड खाजगी मालकीमुक्त होऊन सर्वांसाठी खुला व्हावा, यासाठी शिवतेज फाऊंडेशनच्यावतीने रॅली काढण्यात आली. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या नावाचे निवेदन तहसीलदार वैशाली पाटील यांच्याकडे देण्यात आले.दोन वर्षापूर्वी अ‍ॅड. संकेत साळवी यांच्या अध्यक्षतेखाली शिवतेज फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. गेली दोन वर्षे सामाजिक व ऐतिहासिक प्रबोधनात्मक उपक्रम घेत असताना, अंजनवेल येथील गोपाळगड किल्ला खाजगी मालकीतून मुक्त व्हावा यासाठी सातत्यसाने शासन दरबारी पाठपुरावा सुरु आहे. यासाठी शिवप्रेमींची एक मोठी फळी फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात आली असून, दुसऱ्या वर्धापनदिनी १८ हजार सह्यांचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे तहसीलदार वैशाली पाटील यांच्याकडे आज देण्यात आले. याबाबत सर्वांमध्ये जागृती व्हावी, या उद्देशाने शृंगारतळी ते गुहागर तहसील कार्यालयापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देऊन जनजागृती करण्यात आली.या निवेदनात म्हटले आहे की, शिवरायांच्या स्मृतींना उजाळा देणारा हा किल्ला शासनाच्या ताब्यात येण्यासाठी अनेक अयशस्वी प्रयत्न करण्यात आले. परंतु शासनाच्या उदासीनतेमुळे आजही हा किल्ला पारतंत्र्यात आहे. जो किल्ला शिवरायांनी सागरी सुरक्षेसाठी बांधला होता, त्या गोपाळगडची तटबंदी जाणीवपूर्वक तोडण्याचा प्रयत्न चालू आहे. भविष्यात या किल्ल्याचा उपयोग खाजगी मालकाकडून हॉटेल व्यवसाय व व्यापाराकरिता होऊ शकेल, याची भीती निर्माण झाली आहे. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा किल्ला त्वरित शासनाने ताब्यात घ्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अ‍ॅड. संकेत साळवी, राजेंद्र आरेकर निलेश गोयथळे, मनोज बारटक्के, बाळासाहेब ढेरे, अलंकार विखारे आदींसह तालुक्यात ५०० हून अधिक शिवप्रेमी रॅलीमध्ये सहभागी झाले होते. यासाठी परिसरातील शिवभक्त उपस्थित होते. (प्रतिनिधी)गोपाळगड खाजगी मालकीतून मुक्त व्हावा, यासाठी हे पहिले मोठे पाऊल सर्व शिवप्रेमींच्या पाठिंब्यावर शिवतेज फाऊंडेशनने उचलले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या निवेदनानंतर याबाबत सकारात्मक हालचाली होतील अशा अपेक्षा ठेवून पुढील टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन हा विषय तडीस नेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे फाऊंडेशनचे अध्यक्ष अ‍ॅड. संकेत साळवी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.