शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

अंजनवेलचा गोपाळगड मुक्त करण्याची मागणी

By admin | Updated: February 19, 2015 23:38 IST

तहसीलदारांकडे मागणी : शिवतेज फाऊंडेशनची शिवजयंतीदिनी मोटारसायकल रॅली

गुहागर : तालुक्यातील अंजनवेल येथील गोपाळगड किल्ला राज्यसंरक्षित स्मारक जाहीर करुन काही वर्षे झाली आहेत. हा किल्ला खाजगी मालकीच्या वादात अडकल्याने पुढील कार्यवाही सरकार दरबारी थांबली असून, हा गड खाजगी मालकीमुक्त होऊन सर्वांसाठी खुला व्हावा, यासाठी शिवतेज फाऊंडेशनच्यावतीने रॅली काढण्यात आली. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या नावाचे निवेदन तहसीलदार वैशाली पाटील यांच्याकडे देण्यात आले.दोन वर्षापूर्वी अ‍ॅड. संकेत साळवी यांच्या अध्यक्षतेखाली शिवतेज फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. गेली दोन वर्षे सामाजिक व ऐतिहासिक प्रबोधनात्मक उपक्रम घेत असताना, अंजनवेल येथील गोपाळगड किल्ला खाजगी मालकीतून मुक्त व्हावा यासाठी सातत्यसाने शासन दरबारी पाठपुरावा सुरु आहे. यासाठी शिवप्रेमींची एक मोठी फळी फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात आली असून, दुसऱ्या वर्धापनदिनी १८ हजार सह्यांचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे तहसीलदार वैशाली पाटील यांच्याकडे आज देण्यात आले. याबाबत सर्वांमध्ये जागृती व्हावी, या उद्देशाने शृंगारतळी ते गुहागर तहसील कार्यालयापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देऊन जनजागृती करण्यात आली.या निवेदनात म्हटले आहे की, शिवरायांच्या स्मृतींना उजाळा देणारा हा किल्ला शासनाच्या ताब्यात येण्यासाठी अनेक अयशस्वी प्रयत्न करण्यात आले. परंतु शासनाच्या उदासीनतेमुळे आजही हा किल्ला पारतंत्र्यात आहे. जो किल्ला शिवरायांनी सागरी सुरक्षेसाठी बांधला होता, त्या गोपाळगडची तटबंदी जाणीवपूर्वक तोडण्याचा प्रयत्न चालू आहे. भविष्यात या किल्ल्याचा उपयोग खाजगी मालकाकडून हॉटेल व्यवसाय व व्यापाराकरिता होऊ शकेल, याची भीती निर्माण झाली आहे. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा किल्ला त्वरित शासनाने ताब्यात घ्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अ‍ॅड. संकेत साळवी, राजेंद्र आरेकर निलेश गोयथळे, मनोज बारटक्के, बाळासाहेब ढेरे, अलंकार विखारे आदींसह तालुक्यात ५०० हून अधिक शिवप्रेमी रॅलीमध्ये सहभागी झाले होते. यासाठी परिसरातील शिवभक्त उपस्थित होते. (प्रतिनिधी)गोपाळगड खाजगी मालकीतून मुक्त व्हावा, यासाठी हे पहिले मोठे पाऊल सर्व शिवप्रेमींच्या पाठिंब्यावर शिवतेज फाऊंडेशनने उचलले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या निवेदनानंतर याबाबत सकारात्मक हालचाली होतील अशा अपेक्षा ठेवून पुढील टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन हा विषय तडीस नेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे फाऊंडेशनचे अध्यक्ष अ‍ॅड. संकेत साळवी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.