शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

दीपक केसरकर लोकसंपर्कात कमी पडले

By admin | Updated: February 24, 2017 23:51 IST

शिवसेनेच्या बालेकिल्ल्याचे बुरूज ढासळले : सक्षम उमेदवारांमुळेच काँग्रेसचा विजय

अनंत जाधव ल्ल सावंतवाडीसावंतवाडी तालुका हा दोन वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता. पण नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेच्या बालेकिल्ल्याच्या बुरूजांना तडे गेले होते. तर जिल्हापरीषद व पंचायत समिती निवडणुकीत हे बुरूज काँग्रेसच्या लाटेत चांगलेच ढासळले आहेत. त्यामुळे विकासकामे करूनही गृहराज्यमंत्री दीपक केसरकर हे लोकसंपर्कात कमी पडल्यानेच काँग्रेसने बाजी मारल्याचे चित्र आहे. त्यात काँग्रेसचा विजय हा एकप्रकारे सक्षम उमेदवारांचाच विजय मानला जात असल्याचे दिसून येत आहे.सावंतवाडी तालुका हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. पण गेल्या पाच वर्षात या मतदार संघात दीपक केसरकर यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य होते. पण केसरकर हे विधानसभा निवडणुकीच्यावेळी शिवसेनेत गेल्याने या बालेकिल्ल्यात शिवसेनेचे प्राबल्य निर्माण झाले होते. पण विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच तीन महिन्यांपूर्वी नगरपालिका निवडणुका झाल्या. त्यात सावंतवाडीत मंत्री केसरकर हे काठावर पास झाले. तर वेंगुर्लेत सपशेल अपयशी ठरले होते. त्यामुळे नगरपालिका निवडणुकीपासूनच शिवसेनेच्या बुरूजाला तडे गेले होते.त्यानंतर झालेल्या या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेची भाजपबरोबर युती होईल, अशी आशा होती. पण आयत्यावेळी युती तुटली आणि दोन्ही पक्ष पुन्हा समोरासमोर उभे ठाकले होते. तर शिवसेना भाजप बरोबर काँग्रेसही निवडणूक रिंगणात असल्याने तालुक्यात तिरंगी लढत होईल, हे उघड होते. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे शिवसेनेच्या माध्यमातून झाली आहेत. पण कार्यकर्त्यांची फळी तयार करण्यात मंत्री केसरकर हे अपयशी ठरले होते. त्यांच्यानंतर काम करण्यासाठी दुसरी कार्यकर्त्यांची फळीच तयार करण्यात आली नव्हती.त्यामुळे गावागावात कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी मंत्री केसरकर यांच्यानंतर कोण नसल्याने त्याचा मोठा फटका जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीत दिसून आला. त्याचाच परिपाक म्हणजे जिल्हा परिषदेत तीन जागा शिवसेनेच्या पदरात पडल्या तर काँग्रेसने पाच जागा पटकाविल्या. तसेच पंचायत समितीवरही निर्विवाद वर्चस्व प्रस्थापितही केले आहे.मंत्री केसरकर यांनी कोलगाव तसेच पंचायत समितीमध्ये मळगाव, न्हावेली व कोलगाव येथे वगळता सर्वत्र आपले समर्थकच उभे केले होते. मात्र , या चार ठिकाणी जुने शिवसैनिक निवडून आले. पण मळेवाड व आंबोली वगळता सर्वत्र केसरकर समर्थकांना जनतेने धडा शिकविल्याचे चित्र आहे. कोलगावमध्ये तर भाजप विरूध्द शिवसेना ही प्रतिष्ठेची लढत होती. त्यात शिवसेनेने बाजी मारली. सुरूवातीपासून मंत्री केसरकर हे महेश सारंग यांना शिवसेनेत आणण्यास उत्सुक होते. पण आयत्यावेळी त्यांना यात यश आले नाही. आणि सारंग यांनी भाजपात जाऊन निवडणूक लढवली आणि ते पराभूत झाले.तर दुसरीकडे काँग्रेसमध्ये ही यावेळी सर्व काही आलबेल असल्याचे चित्र होते. वरिष्ठ पातळीवरून जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांना वाऱ्यावर सोडल्यासारखी स्थिती होती. सर्व उमेदवारांनी स्वत:च्या ताकदीवर निवडणूक लढवली आणि त्यातील काहीजण विजयी झाले आहेत. काँग्रेसने तळवडे तसेच कोलगाव या जागा प्रतिष्ठेच्या केल्या. तळवडेत उत्तम पांढरे स्वत: तर आरोंदा येथे शेखर गावकर यांनी स्वत:च्या ताकदीवर आपले उमेदवार निवडून आणले आहेत. भाजपने जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने बांदा हा बालेकिल्ला राखण्यात यश मिळविले आहे. बांदा म्हटले की भाजप असे समीकरण पूर्वीपासून होते, ते पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. तर पंचायत समितीमध्येही दिग्गजांना पराभूत करीत तीन ठिकाणी भाजपने विजयश्री खेचून आणली. भाजपसाठी ही दिलासादायक गोष्ट मानली जात आहे. सावंतवाडी तालुक्यात सध्या तरी काँग्रेसच अग्रेसर असल्याने शिवसेनेला आपले अस्तित्व टिकविण्यासाठी भविष्यात मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. मतदाराबरोबरच कार्यकर्त्यांशी लोकसंपर्क तसेच सतत मतदारांमध्ये राहणे, लोकांची कामे करणे, विकासकामात स्थानिकांना वाटा देणे यामुळेच भविष्यात शिवसेनेला मोठे यश मिळू शकते. अन्यथा ही वाटचाल अशीच राहिली तर काँग्रेस केव्हा गड सर करेल, हे सुध्दा मंत्री दीपक केसरकर यांना कळणार नाही.