शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

दीपक केसरकर लोकसंपर्कात कमी पडले

By admin | Updated: February 24, 2017 23:51 IST

शिवसेनेच्या बालेकिल्ल्याचे बुरूज ढासळले : सक्षम उमेदवारांमुळेच काँग्रेसचा विजय

अनंत जाधव ल्ल सावंतवाडीसावंतवाडी तालुका हा दोन वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता. पण नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेच्या बालेकिल्ल्याच्या बुरूजांना तडे गेले होते. तर जिल्हापरीषद व पंचायत समिती निवडणुकीत हे बुरूज काँग्रेसच्या लाटेत चांगलेच ढासळले आहेत. त्यामुळे विकासकामे करूनही गृहराज्यमंत्री दीपक केसरकर हे लोकसंपर्कात कमी पडल्यानेच काँग्रेसने बाजी मारल्याचे चित्र आहे. त्यात काँग्रेसचा विजय हा एकप्रकारे सक्षम उमेदवारांचाच विजय मानला जात असल्याचे दिसून येत आहे.सावंतवाडी तालुका हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. पण गेल्या पाच वर्षात या मतदार संघात दीपक केसरकर यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य होते. पण केसरकर हे विधानसभा निवडणुकीच्यावेळी शिवसेनेत गेल्याने या बालेकिल्ल्यात शिवसेनेचे प्राबल्य निर्माण झाले होते. पण विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच तीन महिन्यांपूर्वी नगरपालिका निवडणुका झाल्या. त्यात सावंतवाडीत मंत्री केसरकर हे काठावर पास झाले. तर वेंगुर्लेत सपशेल अपयशी ठरले होते. त्यामुळे नगरपालिका निवडणुकीपासूनच शिवसेनेच्या बुरूजाला तडे गेले होते.त्यानंतर झालेल्या या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेची भाजपबरोबर युती होईल, अशी आशा होती. पण आयत्यावेळी युती तुटली आणि दोन्ही पक्ष पुन्हा समोरासमोर उभे ठाकले होते. तर शिवसेना भाजप बरोबर काँग्रेसही निवडणूक रिंगणात असल्याने तालुक्यात तिरंगी लढत होईल, हे उघड होते. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे शिवसेनेच्या माध्यमातून झाली आहेत. पण कार्यकर्त्यांची फळी तयार करण्यात मंत्री केसरकर हे अपयशी ठरले होते. त्यांच्यानंतर काम करण्यासाठी दुसरी कार्यकर्त्यांची फळीच तयार करण्यात आली नव्हती.त्यामुळे गावागावात कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी मंत्री केसरकर यांच्यानंतर कोण नसल्याने त्याचा मोठा फटका जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीत दिसून आला. त्याचाच परिपाक म्हणजे जिल्हा परिषदेत तीन जागा शिवसेनेच्या पदरात पडल्या तर काँग्रेसने पाच जागा पटकाविल्या. तसेच पंचायत समितीवरही निर्विवाद वर्चस्व प्रस्थापितही केले आहे.मंत्री केसरकर यांनी कोलगाव तसेच पंचायत समितीमध्ये मळगाव, न्हावेली व कोलगाव येथे वगळता सर्वत्र आपले समर्थकच उभे केले होते. मात्र , या चार ठिकाणी जुने शिवसैनिक निवडून आले. पण मळेवाड व आंबोली वगळता सर्वत्र केसरकर समर्थकांना जनतेने धडा शिकविल्याचे चित्र आहे. कोलगावमध्ये तर भाजप विरूध्द शिवसेना ही प्रतिष्ठेची लढत होती. त्यात शिवसेनेने बाजी मारली. सुरूवातीपासून मंत्री केसरकर हे महेश सारंग यांना शिवसेनेत आणण्यास उत्सुक होते. पण आयत्यावेळी त्यांना यात यश आले नाही. आणि सारंग यांनी भाजपात जाऊन निवडणूक लढवली आणि ते पराभूत झाले.तर दुसरीकडे काँग्रेसमध्ये ही यावेळी सर्व काही आलबेल असल्याचे चित्र होते. वरिष्ठ पातळीवरून जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांना वाऱ्यावर सोडल्यासारखी स्थिती होती. सर्व उमेदवारांनी स्वत:च्या ताकदीवर निवडणूक लढवली आणि त्यातील काहीजण विजयी झाले आहेत. काँग्रेसने तळवडे तसेच कोलगाव या जागा प्रतिष्ठेच्या केल्या. तळवडेत उत्तम पांढरे स्वत: तर आरोंदा येथे शेखर गावकर यांनी स्वत:च्या ताकदीवर आपले उमेदवार निवडून आणले आहेत. भाजपने जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने बांदा हा बालेकिल्ला राखण्यात यश मिळविले आहे. बांदा म्हटले की भाजप असे समीकरण पूर्वीपासून होते, ते पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. तर पंचायत समितीमध्येही दिग्गजांना पराभूत करीत तीन ठिकाणी भाजपने विजयश्री खेचून आणली. भाजपसाठी ही दिलासादायक गोष्ट मानली जात आहे. सावंतवाडी तालुक्यात सध्या तरी काँग्रेसच अग्रेसर असल्याने शिवसेनेला आपले अस्तित्व टिकविण्यासाठी भविष्यात मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. मतदाराबरोबरच कार्यकर्त्यांशी लोकसंपर्क तसेच सतत मतदारांमध्ये राहणे, लोकांची कामे करणे, विकासकामात स्थानिकांना वाटा देणे यामुळेच भविष्यात शिवसेनेला मोठे यश मिळू शकते. अन्यथा ही वाटचाल अशीच राहिली तर काँग्रेस केव्हा गड सर करेल, हे सुध्दा मंत्री दीपक केसरकर यांना कळणार नाही.