शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

सावंतवाडीत महाविकास आघाडी होईल : दीपक केसरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 12:17 IST

सावंतवाडीत सर्वच पक्षांनी निवडणूक रिंगणात उडी घेतल्याने आता चुरस निर्माण झाली आहे. मात्र, महाविकास आघाडी झाली तर भाजपविरुद्ध शिवसेना थेट लढत होणार आहे. सध्यातरी महाविकास आघाडीचे भवितव्य अधांतरी असले तरी महाविकास आघाडी निश्चित होईल, असा विश्वास शिवसेनेचे नेते, माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेस नेते दिल्लीत असल्याने चर्चा लांबली आहे.

ठळक मुद्देमहाविकास आघाडी होईल : दीपक केसरकर यांनी व्यक्त केला विश्वासकाँग्रेस नेते दिल्लीत असल्याने चर्चा लांबली

सावंतवाडी : सावंतवाडीत सर्वच पक्षांनी निवडणूक रिंगणात उडी घेतल्याने आता चुरस निर्माण झाली आहे. मात्र, महाविकास आघाडी झाली तर भाजपविरुद्ध शिवसेना थेट लढत होणार आहे. सध्यातरी महाविकास आघाडीचे भवितव्य अधांतरी असले तरी महाविकास आघाडी निश्चित होईल, असा विश्वास शिवसेनेचे नेते, माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेस नेते दिल्लीत असल्याने चर्चा लांबली आहे.सावंतवाडीत काँग्रेसकडून दिलीप नार्वेकर, भाजपकडून संजू परब, शिवसेनेकडून बाबू कुडतरकर आदींनी अर्ज दाखल केले आहेत. तर माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर व उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत.जावेद शेख आणि अमोल साटेलकर यांनीही प्रथमच नगरपालिका निवडणुकीत उडी घेतल्याने मतांची विभागणी मोठ्या प्रमाणात होणार आहे. हे सर्व टाळण्यासाठीच माजी मंत्री केसरकर महाविकास आघाडी व्हावी यासाठी आग्रही दिसत आहेत.भाजपने सध्यातरी प्रचारात आघाडी घेतली असून, शिवसेना व काँग्रेस हे अद्यापही महाविकास आघाडी होईल का? या प्रतीक्षेत आहेत. महाविकास आघाडी होण्यासाठी काँग्रेस व शिवसेना आग्रही आहे. मात्र, अटी अनेक असल्याने अडचणी निर्माण होत आहेत. काँग्रेसकडून पुढील दोन वर्षांसाठी नगराध्यक्ष पद आपणास मिळावे असा आग्रह आहे. तर शिवसेना म्हणते हे पद शिवसेनेचे आहे, मग आम्ही तुम्हांला कसे द्यायचे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार नसला तरी महाविकास आघाडी झाली नाही तर आयत्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस बबन साळगावकर यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे.मात्र, या सर्व घाडामोडीत माजी मंत्री दीपक केसरकर आजही महाविकास आघाडीसाठी आग्रही आहेत. ते थेट काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असून, शनिवारी याबाबत टिळक भवन येथे काँग्रेसच्या नेत्यांसोबत केसरकर यांची बैठक होती. मात्र, काँग्रेसचे वरिष्ठ नेते आंदोलनानिमित्त दिल्ली येथे असल्याने शनिवारी बैठक झाली नाही. मात्र, पुढील दोन ते तीन दिवसांत बैठक होऊन तोडगा निघेल, असा विश्वास केसरकर यांना आहे.आघाडी होण्यासाठी केसरकर यांनी काँग्रेसच्या नेत्यांची मानसिकता तयार केली आहे. जर आघाडी झाली नाही तर राणे पुन्हा सावंतवाडीत येतील आणि आपली ताकद वाढल्याचे सांगतील, अशी भीती काँग्रेस नेत्यांकडे व्यक्त करीत सध्यातरी राष्ट्रवादीचा उमेदवार नाही. पण काँग्रेसचा उमेदवार असल्याने त्याने ती उमेदवारी मागे घ्यावी म्हणून केसरकर जोरदार प्रयत्न करीत आहेत. त्यांना अजूनही महाविकास आघाडी होईल असा विश्वास आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकDeepak Kesarkarदीपक केसरकर sindhudurgसिंधुदुर्ग