शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

निकृष्ट काम करणारे ठेकेदार काळ््या यादीत, दीपक केसरकरांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 11:38 IST

जे रस्ते यावर्षी करण्यात आले आहेत आणि ते वाहून गेले त्यांची यादी मला द्या. तसेच निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ््या यादीत टाका, अशी सक्त ताकीद पालकमंत्री दीपक केसरकर यांनी बांधकाम अधिकाऱ्यांना दिली. यावेळी आंबोली ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांसमोर बांधकामच्या अधिकाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली. १४ दिवस होऊनही अधिकारी काय करीत होते, असा सवालही ग्रामस्थांनी केला आहे.

ठळक मुद्देनिकृष्ट काम करणारे ठेकेदार काळ््या यादीत, दीपक केसरकरांचे आदेश आंबोलीत आढावा बैठक ; ग्रामस्थांकडून बांधकाम अधिकारी धारेवर

आंबोली : जे रस्ते यावर्षी करण्यात आले आहेत आणि ते वाहून गेले त्यांची यादी मला द्या. तसेच निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ््या यादीत टाका, अशी सक्त ताकीद पालकमंत्री दीपक केसरकर यांनी बांधकाम अधिकाऱ्यांना दिली. यावेळी आंबोली ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांसमोर बांधकामच्या अधिकाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली. १४ दिवस होऊनही अधिकारी काय करीत होते, असा सवालही ग्रामस्थांनी केला आहे.पालकमंत्र्यांनी आंबोली घाटातील खचलेल्या रस्त्याची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, पोलीस निरीक्षक सुनील धनावडे, बांधकाम विभागाचे अभियंता युवराज देसाई, उपविभागीय अभियता अनंत निकम, जिल्हा परिषद सदस्या रोहिणी गावडे, आंबोली सरपंच लीना गावडे, विलास गावडे, आगारप्रमुख शेख यांच्यासह चौकुळ येथील ग्रामस्थ तुकाराम गावडे, रुपेश गावडे, गुलाबराव गावडे, सरपंच रिता गावडे आदी उपस्थित होते.यावेळी पालकमंत्र्यांसमोर ग्रामस्थांनी बांधकामच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. आंबोली घाटात रस्ता खचून १४ दिवस लोटले तरी कोणतीच कारवाई बांधकाम विभागाने केली नसल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप होता. हा संताप ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांसमोर व्यक्त करून दाखविला व बांधकामच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

बांधकाम विभागाने केवळ वेळकाढूपणा केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तर ग्रामस्थ बांधकाम बंद करीत असल्याचा आरोप बांधकामच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवित हा आरोप खोडून काढला. यावेळी पालकमंत्र्यांनी सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यात ज्या-ज्या ठिकाणी नवीन रस्ते झाले होते व जे रस्ते वाहून गेले, अशा निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांची चौकशी करून त्यांना काळ््या यादीत टाकण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.बांधकाम विभागाला ताकीद देऊन दोन दिवसांत आंबोली घाटातील रस्ता सुरळीत करून एसटी बस सुरू होईल याची व्यवस्था करा, असे पालकमंत्र्यांनी खडसावून सांगितले. त्यामुळे बुधवारपर्यंत एसटी सुरू होईल व त्यानंतर अवजड वाहनेही सुरू होतील, असे सांगण्यात आले.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर sindhudurgसिंधुदुर्ग