शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गात जांभूळ शेतीला उतरती कळा

By admin | Updated: May 23, 2016 00:18 IST

सिंधुदुर्गात जांभूळ शेतीला उतरती कळा चार वर्षात मोठ्या प्रमाणात घट

सुरेश बागवे -- कडावल  --सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जांभूळ काढण्याचा व्यवसाय या हंगामात मोठ्या प्रमाणात चालतो. पण, अलिकडच्या कालावधीत जांभळाचे उत्पादन कमी झाल्याचे दिसून येते. शेतकऱ्यांनी केलेले दुर्लक्ष आणि प्रशासनाचा जांभूळाच्या बाबतीत नकारार्थी दृष्टीकोन यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जांभूळ शेतीला मोठ्या प्रमाणावर उतरती कळा लागल्याचे दिसून येते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा, काजू उत्पादनाबरोबरच जांभळातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. जांभूळ मधुमेहासारख्या आजारांवर गुणकारी आहे. त्यामुळे या दुर्लक्षित पिकाकडे व्यापारी दृष्टीकोनातून पाहण्याची गरज आहे. मात्र, या पिकावर आता निसर्गानेही आपली वक्रदृष्टी वळविली आहे. गेल्या चार वर्षात जांभळाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. यावर्षी तर जांभळाचे उत्पादन अतिशय कमी झाले आहे. झाडावर जांभळे दिसेनाशी झाली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातून होणारी जांभळाची निर्यात मंदावली आहे. खुद्द आकेरी गावातून जांभळे अल्प्र प्रमाणात निर्यातीसाठी दाखल होत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे गेल्या काही वर्षात जांभूळ या झाडाची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तोड झाल्याचे दिसत आहे. आकेरी गाव जांभळासाठी प्रसिध्द आहे. या ठिकाणाहून जांभळांची महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर निर्यात होते. आता जांभळाच्या नवीन जाती कृषी विद्यापीठाने विकसित केल्या आहेत. त्याचा अभ्यास करून त्याची आंबा, काजूप्रमाणे लागवड करणे आवश्यक आहे. असे झाल्यास जिल्ह्यातील कमी झालेले जांभळाचे उत्पादन पुन्हा वाढेल. त्यातून आर्थिक उलाढाल पुन्हा वाढेल, यासाठी शेतकऱ्यांनी आता निसर्गातील झाडांवरच अवलंबून न राहता त्यांची पुनर्लागवड करून त्याकडे त्यादृष्टीने पाहणे गरजेचे आहे. (वार्ताहर)