शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

सिंधुदुर्गात जांभूळ शेतीला उतरती कळा

By admin | Updated: May 23, 2016 00:18 IST

सिंधुदुर्गात जांभूळ शेतीला उतरती कळा चार वर्षात मोठ्या प्रमाणात घट

सुरेश बागवे -- कडावल  --सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जांभूळ काढण्याचा व्यवसाय या हंगामात मोठ्या प्रमाणात चालतो. पण, अलिकडच्या कालावधीत जांभळाचे उत्पादन कमी झाल्याचे दिसून येते. शेतकऱ्यांनी केलेले दुर्लक्ष आणि प्रशासनाचा जांभूळाच्या बाबतीत नकारार्थी दृष्टीकोन यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जांभूळ शेतीला मोठ्या प्रमाणावर उतरती कळा लागल्याचे दिसून येते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा, काजू उत्पादनाबरोबरच जांभळातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. जांभूळ मधुमेहासारख्या आजारांवर गुणकारी आहे. त्यामुळे या दुर्लक्षित पिकाकडे व्यापारी दृष्टीकोनातून पाहण्याची गरज आहे. मात्र, या पिकावर आता निसर्गानेही आपली वक्रदृष्टी वळविली आहे. गेल्या चार वर्षात जांभळाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. यावर्षी तर जांभळाचे उत्पादन अतिशय कमी झाले आहे. झाडावर जांभळे दिसेनाशी झाली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातून होणारी जांभळाची निर्यात मंदावली आहे. खुद्द आकेरी गावातून जांभळे अल्प्र प्रमाणात निर्यातीसाठी दाखल होत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे गेल्या काही वर्षात जांभूळ या झाडाची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तोड झाल्याचे दिसत आहे. आकेरी गाव जांभळासाठी प्रसिध्द आहे. या ठिकाणाहून जांभळांची महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर निर्यात होते. आता जांभळाच्या नवीन जाती कृषी विद्यापीठाने विकसित केल्या आहेत. त्याचा अभ्यास करून त्याची आंबा, काजूप्रमाणे लागवड करणे आवश्यक आहे. असे झाल्यास जिल्ह्यातील कमी झालेले जांभळाचे उत्पादन पुन्हा वाढेल. त्यातून आर्थिक उलाढाल पुन्हा वाढेल, यासाठी शेतकऱ्यांनी आता निसर्गातील झाडांवरच अवलंबून न राहता त्यांची पुनर्लागवड करून त्याकडे त्यादृष्टीने पाहणे गरजेचे आहे. (वार्ताहर)