शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
2
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
3
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
4
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
5
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
6
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
7
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
8
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
9
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
10
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
11
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
12
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
13
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
14
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
15
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
16
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
17
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
18
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
19
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
20
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस

डी.टी.एड्.ला उतरती कळा

By admin | Updated: June 22, 2016 00:16 IST

नवीन पिढी घडविण्याची क्षमता : अध्यापक विद्यालयांवर शाखा बंद करण्याची नामुष्की

गुरुप्रसाद मांजरेकर -- मिठबाव -बदलते शासन निर्णय, शिक्षक (नवीन) भरतीवरची बंदी आदी कारणांमुळे गेले तीन ते चार वर्षे शिक्षणशास्त्र पदविका अभ्यासक्रम अर्थातच डी.टी.एड्. या शिक्षण शाखेवर एक उतरती कळा आली आहे. अनेक विनाअनुदानित अध्यापक विद्यालयांवर आपल्या शाखा बंद करण्याची नामुष्की ओढावली आहे. भावी पिढी घडविण्याचे काम शिक्षक पार पाडत असतो. ही सर्व मूल्ये शिक्षकांवर कोरण्याचे काम त्यांच्या विद्यार्थीदशेत या शिक्षणशास्त्र अध्यापक विद्यालयांनी केले आहे. शिक्षणशास्त्र पदविका अभ्यासक्रम अर्थातच डी.टी.एड.्ने मागील दोन-तीन दशकात उत्कर्षाचा काळ अनुभवला. शिक्षकी पेशाची आवड असणारे आणि हमखास नोकरीची संधी म्हणून १२वी नंतर विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणावर या शाखेची निवड करायचा. आधुनिक संगणक युगात पारंपरिक शिक्षण पद्धती मागे पडत असली तरी आताची पालकपिढी आपल्या पाल्यांना आपल्या काळातील शिक्षण पद्धती व त्याचे उपयोग बऱ्याचवेळा ऐकवितात. अशावेळी या शिक्षणशास्त्र पदविकेत काही प्रमुख बदल घडविल्यास या शाखेस गतवैभव प्राप्त होण्यास वेळ लागणार नाही. काही बदल सद्य:स्थितीत झालेले आहेत. जिल्हा परिषद व खासगी शाळांमध्ये निवृत्तीनजीक आलेल्या शिक्षकांची संख्या लक्षणीय असून, पुढील काही वर्षांत शिक्षक भरती करणे शासनाला अनिवार्य ठरणार आहे. खासगी क्लासेस हा मोठा अर्थार्जनाचा मार्ग असून, याकडे मुख्यत: डी.एड.् पदविकाधारकांनी आपले लक्ष वळविणे अपेक्षित आहे.अभ्यासक्रमात विविधांगी बदलया शिक्षण अभ्यासक्रमात काही विविधांगी अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. विविध स्पर्धा परीक्षा उदा, बॅँक, पोस्ट, एमपीएससी, युपीएससी या परीक्षांना आवश्यक असणाऱ्या ज्ञानाचा अंतर्भाव या अभ्यासक्रमात केलेला आहे. शिक्षणशास्त्र पदविकेचे शिक्षण घेत असतानाच विविध फी माफी सवलती, शिष्यवृत्ती यांचा फायदाही या अभ्यासक्रमाला लागू आहे. नवीन शासननिर्णयानुसार डी. एड.्नंतर विद्यार्थ्याला एम. एड.्ला ही प्रवेश मिळू शकतो. ‘तो’ निर्णय स्वागतार्हप्राथमिक व पूर्व प्राथमिक शाळांना ५ वी व ८ वी चा वर्ग जोडण्याचा निर्णय शासन विचाराधीन आहे. हा निर्णय स्वागतार्ह असून, यामुळे डी. एड.् बेरोजगार, सद्य:स्थितीत शिक्षण घेणारे व भविष्यातील विद्यार्थ्यांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे.डी.एड. पदवीप्राप्तांना समावून घ्याडी. एड. झालेल्या विद्यार्थ्यांना पदवीच्या थेट शेवटच्या वर्षाला प्रवेश मिळावा. तसेच विविधांगी दृष्टीने विचार करून इतर क्षेत्रातही शासनाने डी. एड. पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना सामावून घेऊन बेरोजगारी कमी करावी. विद्यार्थ्यांनीही शिक्षक नोकरी व डी.एड. यांचा सहसंबंध न जोडता हा अभ्यासक्रम निवडावा, असे आवाहन डी. एड. कॉलेज शिक्षक संघटना व महाराष्ट्र टिचर एज्युकेशन असोशिएशनमार्फत करण्यात आले आहे.