शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

आज फैसला !

By admin | Updated: February 22, 2017 22:50 IST

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला : दुपारपर्यंत निकाल अपेक्षित

सिंधुदुर्गनगरी : मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या एकूण १५0 जागांचे निवडणूक निकाल आज, गुरुवारी जाहीर होणार आहेत. सत्ताधारी काँग्रेस, विरोधी गटातील शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी अशा चौरंगी लढतीत कोण बाजी मारणार, याकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर या दोघा दिग्गजांमधील सत्तासंघर्षात कोण बाजी मारणार, हे दुपारी एक वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे.मतदान प्रक्रिया झाल्यानंतर गुरुवारी सकाळी १0 वाजल्यापासून मतमोजणीला त्या-त्या तालुक्यात सुरुवात होणार आहे. जिल्हा परिषद आरक्षणामुळे बदललेली राजकीय समीकरणे, आघाडीत झालेली बिघाडी व युतीत पडलेली फूट यामुळेही राजकीय पातळीवर फार मोठी उलथापालथ झाली होती. त्यामुळे गुरुवारी निकाल काय लागतो, याकडे उमेदवारांसह सर्वसामान्य जनतेचेही लक्ष लागून राहिले आहे.जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यात जिल्हा परिषदेच्या ५0 जागांसाठी १७0, तर पंचायत समितीच्या १00 जागांसाठी ३१५ उमेदवार उभे आहेत. एकूण १५0 जागांसाठी ४८५ उमेदवार आपले राजकीय भवितव्य आजमावणार आहेत. ले राजकीय भवितव्य आजमावणार आहेत. जिल्ह्यातील पाच लाख ६३ हजार ६३२ मतदारांपैकी तीन लाख ८0 हजार ७११ मतदारांनी मतदान केले आहे. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतमोजणी केंद्रावर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पक्षाची कार्यालये, विजयी उमेदवारांच्या रॅलीचे मार्ग यावरही पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. रॅली पूर्व परवानगीशिवाय काढता येणार नाही. बदललेल्या सर्वच राजकीय समीकरणांमधून मतदार कौल कोणाला देतात हे आज, गुरुवारीच समजणार आहे. निकाल काय लागतात, यासाठी उमेदवारांनी देव पाण्यात ठेवले आहेत एवढे मात्र निश्चित.जिल्ह्यात ६७.५५ टक्के मतदान जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्ह्यात ६७.५५ टक्के मतदान झाले असून, तीन लाख ८0 हजार ७११ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यात सर्वाधिक मतदान वेंगुर्ला तालुक्यात, तर सर्वांत कमी मतदान दोडामार्ग तालुक्यात झाले आहे.जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ५0 जागांसाठी १७0, तर पंचायत समित्यांच्या १00 जागांसाठी ३१५ उमेदवार रिंगणात होते. या उमेदवारांचे भवितव्य जिल्ह्यातील पाच लाख ६३ हजार ६३२ मतदारांच्या हाती होते. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या एकूण १५0 जागांसाठी मंगळवारी (दि. २१) जिल्ह्यात मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली.