शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Exam Result 2025 : कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
2
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
3
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
4
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
5
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
6
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
7
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
8
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
9
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
10
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
11
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
12
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
13
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
14
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
15
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
16
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
17
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
18
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
19
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
20
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...

आज फैसला !

By admin | Updated: February 22, 2017 22:50 IST

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला : दुपारपर्यंत निकाल अपेक्षित

सिंधुदुर्गनगरी : मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या एकूण १५0 जागांचे निवडणूक निकाल आज, गुरुवारी जाहीर होणार आहेत. सत्ताधारी काँग्रेस, विरोधी गटातील शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी अशा चौरंगी लढतीत कोण बाजी मारणार, याकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर या दोघा दिग्गजांमधील सत्तासंघर्षात कोण बाजी मारणार, हे दुपारी एक वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे.मतदान प्रक्रिया झाल्यानंतर गुरुवारी सकाळी १0 वाजल्यापासून मतमोजणीला त्या-त्या तालुक्यात सुरुवात होणार आहे. जिल्हा परिषद आरक्षणामुळे बदललेली राजकीय समीकरणे, आघाडीत झालेली बिघाडी व युतीत पडलेली फूट यामुळेही राजकीय पातळीवर फार मोठी उलथापालथ झाली होती. त्यामुळे गुरुवारी निकाल काय लागतो, याकडे उमेदवारांसह सर्वसामान्य जनतेचेही लक्ष लागून राहिले आहे.जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यात जिल्हा परिषदेच्या ५0 जागांसाठी १७0, तर पंचायत समितीच्या १00 जागांसाठी ३१५ उमेदवार उभे आहेत. एकूण १५0 जागांसाठी ४८५ उमेदवार आपले राजकीय भवितव्य आजमावणार आहेत. ले राजकीय भवितव्य आजमावणार आहेत. जिल्ह्यातील पाच लाख ६३ हजार ६३२ मतदारांपैकी तीन लाख ८0 हजार ७११ मतदारांनी मतदान केले आहे. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतमोजणी केंद्रावर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पक्षाची कार्यालये, विजयी उमेदवारांच्या रॅलीचे मार्ग यावरही पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. रॅली पूर्व परवानगीशिवाय काढता येणार नाही. बदललेल्या सर्वच राजकीय समीकरणांमधून मतदार कौल कोणाला देतात हे आज, गुरुवारीच समजणार आहे. निकाल काय लागतात, यासाठी उमेदवारांनी देव पाण्यात ठेवले आहेत एवढे मात्र निश्चित.जिल्ह्यात ६७.५५ टक्के मतदान जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्ह्यात ६७.५५ टक्के मतदान झाले असून, तीन लाख ८0 हजार ७११ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यात सर्वाधिक मतदान वेंगुर्ला तालुक्यात, तर सर्वांत कमी मतदान दोडामार्ग तालुक्यात झाले आहे.जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ५0 जागांसाठी १७0, तर पंचायत समित्यांच्या १00 जागांसाठी ३१५ उमेदवार रिंगणात होते. या उमेदवारांचे भवितव्य जिल्ह्यातील पाच लाख ६३ हजार ६३२ मतदारांच्या हाती होते. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या एकूण १५0 जागांसाठी मंगळवारी (दि. २१) जिल्ह्यात मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली.