शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

आज फैसला !

By admin | Updated: February 22, 2017 22:50 IST

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला : दुपारपर्यंत निकाल अपेक्षित

सिंधुदुर्गनगरी : मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या एकूण १५0 जागांचे निवडणूक निकाल आज, गुरुवारी जाहीर होणार आहेत. सत्ताधारी काँग्रेस, विरोधी गटातील शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी अशा चौरंगी लढतीत कोण बाजी मारणार, याकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर या दोघा दिग्गजांमधील सत्तासंघर्षात कोण बाजी मारणार, हे दुपारी एक वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे.मतदान प्रक्रिया झाल्यानंतर गुरुवारी सकाळी १0 वाजल्यापासून मतमोजणीला त्या-त्या तालुक्यात सुरुवात होणार आहे. जिल्हा परिषद आरक्षणामुळे बदललेली राजकीय समीकरणे, आघाडीत झालेली बिघाडी व युतीत पडलेली फूट यामुळेही राजकीय पातळीवर फार मोठी उलथापालथ झाली होती. त्यामुळे गुरुवारी निकाल काय लागतो, याकडे उमेदवारांसह सर्वसामान्य जनतेचेही लक्ष लागून राहिले आहे.जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यात जिल्हा परिषदेच्या ५0 जागांसाठी १७0, तर पंचायत समितीच्या १00 जागांसाठी ३१५ उमेदवार उभे आहेत. एकूण १५0 जागांसाठी ४८५ उमेदवार आपले राजकीय भवितव्य आजमावणार आहेत. ले राजकीय भवितव्य आजमावणार आहेत. जिल्ह्यातील पाच लाख ६३ हजार ६३२ मतदारांपैकी तीन लाख ८0 हजार ७११ मतदारांनी मतदान केले आहे. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतमोजणी केंद्रावर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पक्षाची कार्यालये, विजयी उमेदवारांच्या रॅलीचे मार्ग यावरही पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. रॅली पूर्व परवानगीशिवाय काढता येणार नाही. बदललेल्या सर्वच राजकीय समीकरणांमधून मतदार कौल कोणाला देतात हे आज, गुरुवारीच समजणार आहे. निकाल काय लागतात, यासाठी उमेदवारांनी देव पाण्यात ठेवले आहेत एवढे मात्र निश्चित.जिल्ह्यात ६७.५५ टक्के मतदान जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्ह्यात ६७.५५ टक्के मतदान झाले असून, तीन लाख ८0 हजार ७११ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यात सर्वाधिक मतदान वेंगुर्ला तालुक्यात, तर सर्वांत कमी मतदान दोडामार्ग तालुक्यात झाले आहे.जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ५0 जागांसाठी १७0, तर पंचायत समित्यांच्या १00 जागांसाठी ३१५ उमेदवार रिंगणात होते. या उमेदवारांचे भवितव्य जिल्ह्यातील पाच लाख ६३ हजार ६३२ मतदारांच्या हाती होते. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या एकूण १५0 जागांसाठी मंगळवारी (दि. २१) जिल्ह्यात मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली.