शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

‘सौर कुंपण’ योजना राबविण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 00:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढला असून यामुळे येथील शेतकरी हतबल झाले आहेत. हत्ती, गवे, डुक्कर, माकड आदी वन्य प्राणी शेतीबागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. विशेषत: हत्ती व गव्यांचा उपद्रव थांबवावा यासाठी तत्काळ प्रयत्न सुरू केले आहेत. हेवाळे येथे कंपाऊंड वॉल तर मळगाव येथे ८ किलोमीटर ...

लोकमत न्यूज नेटवर्कसिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढला असून यामुळे येथील शेतकरी हतबल झाले आहेत. हत्ती, गवे, डुक्कर, माकड आदी वन्य प्राणी शेतीबागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. विशेषत: हत्ती व गव्यांचा उपद्रव थांबवावा यासाठी तत्काळ प्रयत्न सुरू केले आहेत. हेवाळे येथे कंपाऊंड वॉल तर मळगाव येथे ८ किलोमीटर सौर कुंपण घालण्यात येणार असून गव्यांचा उपद्रव थांबविण्यासाठी शेतकºयांना समूह शेतीच्या माध्यमातून सौर कुंपणाची योजना राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सोमवारच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.जिल्ह्यात वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढला आहे. हा उपद्रव कमी व्हावा यासाठी ठोस निर्णय घेण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख अधिकाºयांच्या उपस्थितीत खासदार विनायक राऊत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीनंतर राऊत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत आमदार वैभव नाईक, अभय शिरसाट, संजय पडते, नागेंद्र परब आदी उपस्थित होते.यावेळी राऊत म्हणाले की, जिल्ह्यात हत्ती, गवे, डुक्कर, माकड आदी वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढला असून हे प्राणी शेती आणि बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. या वन्य प्राण्यांच्या वावरामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याला या संकटातून मुक्त करण्यासाठी काही ठोस निर्णय घेणे आवश्यक आहेत. त्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत याबाबत संबंधित प्रमुख अधिकाºयांची बैठक घेण्यात आली.दोडामार्ग तालुक्यातील हेवाळे या परिसरात हत्तींचा वावर आहे. या परिसरात हे हत्ती मोठ्या प्रमाणात शेती-बागायतींचे नुकसान करीत आहेत. या हत्तींना माणगावप्रमाणेच पकडण्याची मोहीम राबविण्याची तयारी सुरु आहे. तरीही या परिसरात येण्यापासून हत्तींना अडविण्यासाठी ५ कंपाऊंड वॉल बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी पहिला कंपाऊंड वॉल सर्व्हे नं. २८ मध्ये घालण्यात येणार असून हे कंपाऊंड वॉल आॅक्टोबर ते नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर राधानगरी (कोल्हापूर) येथील हत्ती गगनबावडा येथून जिल्ह्यात घुसखोरी करीत आहेत. त्यांना जिल्ह्यात येण्यापासून अटकाव करण्यासाठी कोल्हापूर वनविभागाला सूचना देण्यात आल्या आहेत.जिल्ह्यात ऊस लागवडीचे क्षेत्र वाढू लागले आहे. मात्र उत्पादनात वाढ झालेली नाही. यावर येथील ऊस उत्पादक शेतकºयांना ऊस लागवडीबाबत मार्गदर्शन व्हावे तसेच जिल्ह्यात ऊस संशोधन केंद्र व्हावे यासाठी आपले प्रयत्न आहेत. या केंद्राच्या उभारणीसाठी लागणारी २५ हेक्टर क्षेत्र जमीन देण्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी मान्य केले आहे. हे ऊस संशोधन केंद्र झाल्यास येथील शेतकºयांना योग्य ते मार्गदर्शन मिळून आता ते एकरी ३० टन उत्पादन घेत असलेले पीक ८० टनापर्यंत जाऊ शकते, अशी माहिती राऊत यांनी यावेळी दिली.जिल्ह्यातील बीएसएनएलची स्थिती सुधारण्यासाठी टॉवर होणे आवश्यक आहे. जिल्ह्यात एकूण ९६ टॉवर प्रस्तावित आहेत. यापैकी १२ टॉवर समुद्रकिनारी होणार आहेत. तर जिल्ह्यात ८४ टॉवर आॅक्टोबरपर्यंत कार्यान्वित होणार आहेत. यातील तीन टॉवर हे गणेशोत्सवाच्या कालावधीत सुरू होणार असल्याची माहिती विनायक राऊत यांनी दिली.सीआरझेड संदर्भातील २४ ची सभा चुकीचीसिंधुदुर्ग जिल्ह्यात सीआरझेड, वनसंज्ञा, बीएसएनएल या महत्त्वाच्या विषयांवर निर्णय घेण्यासाठी केंद्रीय समित्या २४ आॅगस्ट रोजी सिंधुदुर्गात येत आहेत अशी माहिती वर्तमानपत्रांच्या माध्यमातून समजली आहे. अधिकृत याबाबत कोणतीही माहिती नाही. जिल्ह्याच्या दृष्टीने हे तिन्ही विषय फार महत्त्वाचे आहेत. मात्र त्यासाठी निवडण्यात आलेली २४ आॅगस्ट ही गणपतीच्या आदल्या दिवसाची स्थानिक सुटीची तारीख योग्य नाही. पण हे विषय जिल्ह्यासाठी महत्त्वाचे असल्याने बैठक झाली तर जिल्हावासीयांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण या बैठकीस उपस्थित राहणार असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी स्पष्ट केले.