शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
7
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
8
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
9
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
10
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
11
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
12
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
13
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
14
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
15
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
16
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
17
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय

By admin | Updated: October 31, 2014 00:41 IST

डाटा आॅपरेटर्सचा प्रश्न : वैभव नाईकांसह घेतली सीईओंची भेट

सिंधुदुर्गनगरी : ‘ईगल’ या खासगी कंपनीमार्फत नियुक्त करण्यात आलेल्या एन.आर.एच.एम. येथील डाटा आॅपरेटर कर्मचाऱ्यांना तब्बल ८ महिने मानधन मिळाले नसल्याने त्रस्त झालेल्या डाटा आॅपरेटर कर्मचाऱ्यांनी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. ४७ आॅपरेटर्सच्या मानधनाचे सुमारे ३५ लाख रूपये या कंपनीने दिले नसल्याचे सांगत यावर मार्ग काढावा, अशी मागणी केली. तसेच येत्या दोन दिवसात मानधन न मिळाल्यास ईगल कंपनीविरोधात फसवणुकीची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रासह ग्रामीण रूग्णालयामध्ये काम करणाऱ्या ४७ डाटा आॅपरेटर्सची जिल्हा ग्रामीण आरोग्य यंत्रणेअंतर्गत ईगल या खासगी कंपनीमार्फत भरती करण्यात आली आहे. त्यामुळे या कंत्राटी कामगारांवर नियंत्रण ठेवण्यासह त्यांना वेतन अदा करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदार कंपनीची आहे. मात्र, त्या कंपनीकडून डाटा आॅपरेटर्सना गेले आठ महिने मानधन देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्या सुशिक्षित कामगारांची उपासमार सुरू झाली आहे.याबाबत गुरूवारी जिल्ह्यातील ४७ डाटा आॅपरेटर्सनी शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद भवनावर धडक देत सीईओ दिलीप पांढरपट्टे यांची भेट घेतली. त्यांच्यासमोर आपल्या कैफियत मांडल्या. यावेळी पांढरपट्टे म्हणाले की, खासगी कंपनीमार्फत ही भरती केलेली आहे. हे सर्व कर्मचारी हे कंपनीचे आहेत. तेव्हा मानधन देण्याबाबत ती कंपनी जबाबदार आहे. जिल्हा परिषदेचा कोणताही थेट संबंध येत नाही. मात्र, हे कर्मचारी आमच्या आरोग्य विभागात कंत्राटी काम करीत आहेत. त्यांना मानधन मिळालेच पाहिजे. आपल्याला पगार मिळावा यासाठी शासनाला पत्र पाठवून आपल्या ८ महिन्याच्या मानधनाची रक्कम (३५ लाख रूपये) मिळावी, अशी विनंती करू, असे स्पष्ट केले. आमदार वैभव नाईक यांनी याबाबत आपण येत्या दोन दिवसात संबंधित ईगल कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन योग्य तोडगा काढू, अन्यथा जिल्ह्यातील सुशिक्षित कंत्राटी कामगारांची गेले आठ महिने मानधन न देता सुमारे ३५ लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित कंपनीवर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करू, असे आश्वासन यावेळी दिले. (प्रतिनिधी)सुशिक्षित तरूण-तरूणींची फसवणूकशासनाच्या या खासगी कंपन्यांमार्फत कंत्राटी नोकर भरती करणाच्या धोरणाचा येथील सुशिक्षित तरूण- तरूणींना फटका बसत आहे. या अशा कंपन्यांकडून केवळ काम करून घेतले जात आहे. त्यांना ठरवून देण्यात आलेले मानधन दिले जात नाही. त्यापैकी अर्धाच पगार दिला जातो. तर काहीवेळा सहा- सहा महिने पगार न देता फसवणूक केली जात आहे. तसेच संबंधित कंपनीचा जबाबदार व्यक्तीही जिल्ह्यात राहत नाही. त्यामुळे येथील गरीब कुटुंबातील व सुशिक्षित तरूण-तरूणींची फसवणूक होताना दिसत आहे. एकीकडे तरूण-तरूणींना नोकरी मिळताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यातच नोकरी मिळाल्यानंतर अशी फसवणूक होत असल्याबाबत डाटा आॅपरेटर्समधून नाराजी व्यक्त होत आहे.