शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

फळपीक विमा संरक्षण रकमेत कपातीचा निर्णय

By admin | Updated: November 9, 2014 23:36 IST

बागायतदारांना फटका : हप्त्यात घट होण्याची शक्यता

रत्नागिरी : अवेळचा पाऊस व उच्चत्तम तापमान यामुळे आंबा आणि काजू पिकावर परिणाम होत आहे. शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान लक्षात घेता शासनाने कृषी विभागाच्यावतीने हवामानावर आधारित पथदर्शक फळपीक विमा योजना सुरू केली. मात्र, यावर्षी विमा रकमेत २५ ते ५० टक्के कपात केल्यामुळे शेतकरीवर्गाला त्याचा फटका बसणार आहे.अवेळचा पाऊस, कमी तापमान, जास्त तापमान या निकषावर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येते. त्यासाठी फळपीक विमा योजना सुरू केली. सुरूवातीला तापमान मोजमाप यंत्र चुकीच्या ठिकाणी बसविल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा लाभ मिळाला नाही. गतवर्षी राबविलेल्या विमा योजनेबाबत अद्याप नुकसान भरपाई जाहीर करण्यात आलेली नाही. यावर्षी विमा योजना चालू ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र, विमा संरक्षण यंत्रणेत २५ ते ५० टक्के कपात केल्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. आंबा, काजू, द्राक्ष, केळी, संत्री, मोसंबी, डाळिंब या पिकांना विमा संरक्षण देण्यात येणार आहे. आंबा पिकासाठी यावर्षी त्या रकमेत घट करून ७५ हजारावर आणली आहे. काजूला हेक्टरी सुधारित योजनेंतर्गत पूर्वीच्या रकमेत घट करून ती ५६ हजार २५० रूपयांवर आणली आहे. राज्यातील जळगाव, धुळे, बुलडाणा, बीड, वर्धा, नागपूर, उस्मानाबाद, कोल्हापूर, अहमदनगर, लातूर, रायगड तसेच रत्नागिरी जिल्ह्याचा त्यात समावेश आहे. विमा कंपन्यांनी निवडक जिल्ह्यांसाठी पूर्वीीच्या विमा संरक्षित रकमेवर हरकत घेतल्याने विमा कंपनीच्या दबावापुढे झुकत कृषी विभागाने शेतकऱ्यांचा विचार न करता १६ आॅक्टोबरला विमा रकमेत २५ ते ५० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सन २०११-१२ मध्ये १८६६.४७ हेक्टर बाधित क्षेत्रावरील १३६२ लाभार्थींना ३४ लाख ४१ हजार ५०० रूपये नुकसान भरपाई वितरीत करण्यात आली. २०१२-१३ मध्ये ११२० हेक्टर बाधित क्षेत्रासाठी १२८६ लाभार्थींना २ कोटी ३२ लाख ७९ हजार ५०० रूपये नुकसान भरपाई देण्यात आली. सुरूवातीला विम्याचा हप्ता आठ हजार होता. मात्र, गतवर्षी त्या रकमेत वाढ करून ती १२ हजार रूपये करण्यात आली होती. राज्याचे ३०००, केंद्र शासनाचे ३०००, तर शेतकऱ्यांना ६००० रूपये भरावे लागले होते. मात्र, यावर्षी विमा सरंक्षण रकमेतच कपात केल्यामुळे हप्त्यात घट होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी फळपीक विमा योजना सुरू केली आहे की, विमा कंपन्यांच्या रक्षणासाठी? दरवर्षी संबंधित निकषामध्ये बदल केला जातो. हवामनावर आधारित पथदर्शी फळपीक विमा योजना राबवताना भौगोलिक परिस्थितीचाही विचार केला जाणे गरजेचे आहे. मात्र, त्यात अपेक्षित बदल केले जात नसल्यामुळे शेतकऱ्यांनी फळपीक विमा योजनेकडे पाठ फिरविलेली दिसून येते. कर्जदारांना सक्तीची असतानादेखील काही शेतकऱ्यांनी ही योजना नाकारलेली दिसून येते. - ए. एस. शितूत, रत्नागिरी.