शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

फळपीक विमा संरक्षण रकमेत कपातीचा निर्णय

By admin | Updated: November 9, 2014 23:36 IST

बागायतदारांना फटका : हप्त्यात घट होण्याची शक्यता

रत्नागिरी : अवेळचा पाऊस व उच्चत्तम तापमान यामुळे आंबा आणि काजू पिकावर परिणाम होत आहे. शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान लक्षात घेता शासनाने कृषी विभागाच्यावतीने हवामानावर आधारित पथदर्शक फळपीक विमा योजना सुरू केली. मात्र, यावर्षी विमा रकमेत २५ ते ५० टक्के कपात केल्यामुळे शेतकरीवर्गाला त्याचा फटका बसणार आहे.अवेळचा पाऊस, कमी तापमान, जास्त तापमान या निकषावर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येते. त्यासाठी फळपीक विमा योजना सुरू केली. सुरूवातीला तापमान मोजमाप यंत्र चुकीच्या ठिकाणी बसविल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा लाभ मिळाला नाही. गतवर्षी राबविलेल्या विमा योजनेबाबत अद्याप नुकसान भरपाई जाहीर करण्यात आलेली नाही. यावर्षी विमा योजना चालू ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र, विमा संरक्षण यंत्रणेत २५ ते ५० टक्के कपात केल्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. आंबा, काजू, द्राक्ष, केळी, संत्री, मोसंबी, डाळिंब या पिकांना विमा संरक्षण देण्यात येणार आहे. आंबा पिकासाठी यावर्षी त्या रकमेत घट करून ७५ हजारावर आणली आहे. काजूला हेक्टरी सुधारित योजनेंतर्गत पूर्वीच्या रकमेत घट करून ती ५६ हजार २५० रूपयांवर आणली आहे. राज्यातील जळगाव, धुळे, बुलडाणा, बीड, वर्धा, नागपूर, उस्मानाबाद, कोल्हापूर, अहमदनगर, लातूर, रायगड तसेच रत्नागिरी जिल्ह्याचा त्यात समावेश आहे. विमा कंपन्यांनी निवडक जिल्ह्यांसाठी पूर्वीीच्या विमा संरक्षित रकमेवर हरकत घेतल्याने विमा कंपनीच्या दबावापुढे झुकत कृषी विभागाने शेतकऱ्यांचा विचार न करता १६ आॅक्टोबरला विमा रकमेत २५ ते ५० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सन २०११-१२ मध्ये १८६६.४७ हेक्टर बाधित क्षेत्रावरील १३६२ लाभार्थींना ३४ लाख ४१ हजार ५०० रूपये नुकसान भरपाई वितरीत करण्यात आली. २०१२-१३ मध्ये ११२० हेक्टर बाधित क्षेत्रासाठी १२८६ लाभार्थींना २ कोटी ३२ लाख ७९ हजार ५०० रूपये नुकसान भरपाई देण्यात आली. सुरूवातीला विम्याचा हप्ता आठ हजार होता. मात्र, गतवर्षी त्या रकमेत वाढ करून ती १२ हजार रूपये करण्यात आली होती. राज्याचे ३०००, केंद्र शासनाचे ३०००, तर शेतकऱ्यांना ६००० रूपये भरावे लागले होते. मात्र, यावर्षी विमा सरंक्षण रकमेतच कपात केल्यामुळे हप्त्यात घट होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी फळपीक विमा योजना सुरू केली आहे की, विमा कंपन्यांच्या रक्षणासाठी? दरवर्षी संबंधित निकषामध्ये बदल केला जातो. हवामनावर आधारित पथदर्शी फळपीक विमा योजना राबवताना भौगोलिक परिस्थितीचाही विचार केला जाणे गरजेचे आहे. मात्र, त्यात अपेक्षित बदल केले जात नसल्यामुळे शेतकऱ्यांनी फळपीक विमा योजनेकडे पाठ फिरविलेली दिसून येते. कर्जदारांना सक्तीची असतानादेखील काही शेतकऱ्यांनी ही योजना नाकारलेली दिसून येते. - ए. एस. शितूत, रत्नागिरी.