शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

युवकाचा शॉक लागून मृत्यू

By admin | Updated: September 2, 2014 23:18 IST

रेंबवली येथील घटना : उलटसुलट चर्चेने संभ्रम

शिरगांव : देवगड तालुक्यातील रेंबवली येथील शांताराम सत्यवान वळंजू (वय २०) या युवकाचा विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाल्याची घटना १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता घडल्याची चर्चा ग्रामस्थांत आहे.रेंबवली येथील शांताराम वळंजू (वय २०) हा सोमवारी सायंकाळी ध्वनिक्षेपकाचा माईक लावत असताना त्याला विजेचा धक्का बसला व त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची चर्चा शिरगांव दशक्रोशीत आहे. शांताराम याला हृदयविकाराचाही आजार होता. सायंकाळी अतिश्रमामुळे त्याला धाप लागली होती असेही तेथील ग्रामस्थात चर्चा होती. त्यामुळे शांतारामचा मृत्यू विजेचा शॉक लागून की हृदयविकाराच्या धक्क्याने झाला याबाबत उलटसुलट चर्चा होत असून त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही. त्याला अधिक उपचारासाठी कणकवली येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी शांतारामचा मृत्यू जागीच झाल्याचे सांगितल्याचे समजते.ऐन गणेशोत्सवात रेंबवली येथे घडलेल्या या घटनेने गावात शोकाकुल वातावरण असून उमेदीत शांतारामचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, बहीण असा परिवार आहे. शोकाकुल वातावरणात शांतारामवर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. (प्रतिनिधी)