शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
3
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
4
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
5
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
6
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
7
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
8
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
9
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
10
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
11
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
12
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
13
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
14
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
15
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
16
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
17
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
18
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
19
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
20
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 

दुचाकी अपघातात महिलेचा मृत्यू

By admin | Updated: June 26, 2016 00:31 IST

मुलगा बचावला : बिबवणे मार्गावरील खड्ड्यांमुळे घडली घटना

कुडाळ : बिबवणे येथील महामार्गावरील खड्ड्यांत मोटारसायकल गेल्याने झालेल्या अपघातात रेडी-बोमडोजीचीवाडी येथील कीर्ती कृष्णा बागायतकर (वय ३७) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुदैवाने या अपघातात कीर्ती यांचा एक वर्षाचा मुलगा बचावला, तर मोटारसायकल चालविणारे त्यांचे पती कृष्णा बागायतकर यांना किरकोळ दुखापत झाली. रेडी-बोमडोजीचीवाडी येथील कृष्णा बागायतकर सावंतवाडी येथील काम दुपारी आटोपूून कुडाळला येत होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी कीर्ती व एक वर्षाचा मुलगा गजानन होता. ते बिबवणे येथे आले असता महामार्गावर असलेल्या खड्ड्यामध्ये त्यांची दुचाकी जोराने आदळल्याने मागे बसलेल्या कीर्ती व त्यांचा मुलगा गजानन डांबरी रस्त्यावर फेकले गेले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला. दरम्यान, अपघाताची बातमी कळताच बिबवणे येथील ग्रामस्थांनी तसेच काही युवकांनी तत्काळ अपघातस्थळी पोहोचून तिघांनाही कुडाळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, पण डोक्याला गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्यामुळे उपचार सुरू असताना कीर्ती यांचा मृत्यू झाला. या अपघातात रस्त्यावर पडून देखील गजाननच्या हाताला थोडेफार खरचटण्यापलीकडे अन्य कोणत्याही स्वरूपाची दुखापत झाली नाही. (प्रतिनिधी) चौकट चौकट आईसाठी गजाननचा टाहो.... कुडाळ ग्रामीण रुग्णालयात या तीनही जखमींना उपचारासाठी आणल्यानंतर खूप वेळ झाला, तरी गजाननला त्याची आई दिसली नाही. त्यामुळे आईसाठी त्याने फोडलेला टाहो हा हृदय हेलावणारा होता. त्यामुळे रुग्णालयातील परिसर भावनाविवश झाला होता. ग्रामस्थांचा आधार आणि आपुलकी बिबवणे येथील ग्रामस्थांसह नगरसेवक एजाज नाईक यांनी रुग्णालयात नेण्यासाठी सहकार्य केले. मुख्य मार्गावरील या अपघातावेळी ग्रामस्थांनी तत्काळ केलेली मदत वाहनधारकांना मोठा आधार देणारी ठरली, तर अपघातग्रस्तांना मायेची आपुलकी मिळाली. ...तर प्राण वाचले असते बिबवणे येथील खड्डा डांबरीकरणाने बुजवून टाकावा. जेणेकरून येथे मोठा अपघात होऊ नये, अशी मागणी येथील ग्रामस्थांची वारंवार होती. मात्र, महामार्ग विभाग व बांधकाम विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. कीर्तीचा या खड्ड्यांमुळेच नाहक बळी गेला. या खड्ड्यामुळे आणखी कितीजणांचे प्राण घेतल्यावर प्रशासनाचे डोळे उघडणार आहेत, असा सवाल संतप्त जनतेतून केला जात आहे.