शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी अपघातात महिलेचा मृत्यू

By admin | Updated: June 26, 2016 00:31 IST

मुलगा बचावला : बिबवणे मार्गावरील खड्ड्यांमुळे घडली घटना

कुडाळ : बिबवणे येथील महामार्गावरील खड्ड्यांत मोटारसायकल गेल्याने झालेल्या अपघातात रेडी-बोमडोजीचीवाडी येथील कीर्ती कृष्णा बागायतकर (वय ३७) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुदैवाने या अपघातात कीर्ती यांचा एक वर्षाचा मुलगा बचावला, तर मोटारसायकल चालविणारे त्यांचे पती कृष्णा बागायतकर यांना किरकोळ दुखापत झाली. रेडी-बोमडोजीचीवाडी येथील कृष्णा बागायतकर सावंतवाडी येथील काम दुपारी आटोपूून कुडाळला येत होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी कीर्ती व एक वर्षाचा मुलगा गजानन होता. ते बिबवणे येथे आले असता महामार्गावर असलेल्या खड्ड्यामध्ये त्यांची दुचाकी जोराने आदळल्याने मागे बसलेल्या कीर्ती व त्यांचा मुलगा गजानन डांबरी रस्त्यावर फेकले गेले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला. दरम्यान, अपघाताची बातमी कळताच बिबवणे येथील ग्रामस्थांनी तसेच काही युवकांनी तत्काळ अपघातस्थळी पोहोचून तिघांनाही कुडाळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, पण डोक्याला गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्यामुळे उपचार सुरू असताना कीर्ती यांचा मृत्यू झाला. या अपघातात रस्त्यावर पडून देखील गजाननच्या हाताला थोडेफार खरचटण्यापलीकडे अन्य कोणत्याही स्वरूपाची दुखापत झाली नाही. (प्रतिनिधी) चौकट चौकट आईसाठी गजाननचा टाहो.... कुडाळ ग्रामीण रुग्णालयात या तीनही जखमींना उपचारासाठी आणल्यानंतर खूप वेळ झाला, तरी गजाननला त्याची आई दिसली नाही. त्यामुळे आईसाठी त्याने फोडलेला टाहो हा हृदय हेलावणारा होता. त्यामुळे रुग्णालयातील परिसर भावनाविवश झाला होता. ग्रामस्थांचा आधार आणि आपुलकी बिबवणे येथील ग्रामस्थांसह नगरसेवक एजाज नाईक यांनी रुग्णालयात नेण्यासाठी सहकार्य केले. मुख्य मार्गावरील या अपघातावेळी ग्रामस्थांनी तत्काळ केलेली मदत वाहनधारकांना मोठा आधार देणारी ठरली, तर अपघातग्रस्तांना मायेची आपुलकी मिळाली. ...तर प्राण वाचले असते बिबवणे येथील खड्डा डांबरीकरणाने बुजवून टाकावा. जेणेकरून येथे मोठा अपघात होऊ नये, अशी मागणी येथील ग्रामस्थांची वारंवार होती. मात्र, महामार्ग विभाग व बांधकाम विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. कीर्तीचा या खड्ड्यांमुळेच नाहक बळी गेला. या खड्ड्यामुळे आणखी कितीजणांचे प्राण घेतल्यावर प्रशासनाचे डोळे उघडणार आहेत, असा सवाल संतप्त जनतेतून केला जात आहे.