शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
4
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
5
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
6
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
7
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
8
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
9
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
10
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
11
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
12
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
13
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
14
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
15
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
16
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
17
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
18
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
19
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
20
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी

धरण दुरुस्तीबाबत अनास्थाच!

By admin | Updated: February 9, 2015 01:22 IST

रत्नागिरी नगरपालिका : फेबु्रवारीअखेर धरणातील पाणीसाठा संपणार

प्रकाश वराडकर - रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पानवल धरणातील पाणीसाठा फेब्रुवारीअखेर पुरेल. त्यानंतर शीळ धरणातूनच शहराला लागणारे पाणी पूर्णत: घ्यावे लागणार आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासूनची ही स्थिती आहे. गाळाने भरलेल्या व खचलेल्या पानवल धरणाच्या दुरुस्तीचा दरवर्षी ठणाणा करणाऱ्या राजकीय पक्षांकडून नव्याने धरण उभारण्याबाबत कोणत्याही हालचाली नसल्याने नाजूक स्थितीत असलेले हे धरण केव्हा कोसळेल, याचा नेम नसल्याच्या प्रतिक्रीयाही व्यक्त होत आहेत. रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारे पानवल हे धरण हातखंब्याजवळ असून ते सर्वाधिक जुने धरण आहे. या धरणावरून नैसर्गिक गुरुत्वाकर्षण शक्तीचा वापर करून रत्नागिरीपर्यंत पाणी आणले जाते. त्यासाठी विजेचा वापर करावा लागत नाही. रत्नागिरीची लोकसंख्या सहा दशकांपूर्वी खूप कमी होती. तरीही त्यावेळच्या पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी शासनाकडे पाठपुरावा करीत पानवल येथे रत्नागिरी पालिकेसाठी जागा घेतली. तेथील नदीवर धरण बांधले गेले. या धरणातून रत्नागिरी शहराला दररोज दीड ते दोन दशलक्ष लीटर्स पाणीपुरवठा केला जातो. सध्या या धरणातून पावणेदोन एमएलडी पाण्याचा पुरवठा शहराला केला जात आहे. मात्र, विजेचा लाखो रुपयांचा खर्च वाचविणाऱ्या या धरणाकडे गेल्या अनेक वर्षांपासून रत्नागिरी पालिकेत येणाऱ्या कोणत्याही कारभाऱ्यांकडून गंभीरपणे लक्ष दिले गेले नाही. सहा वर्षांपूर्वी या धरणातील गाळ उपसा करण्यावर लाखो रुपये खर्च करण्यात आले. उपसा केलेला गाळ धरण पात्राच्या कडेलाच ठेवण्यात आल्याने पावसाळ्यात पुन्हा तो गाळ धरणात गेला. त्यामुळे केलेला खर्च पाण्यात गेला.धरणाची सध्याची स्थिती अत्यंत बिकट आहे. हे धरण पायथ्याला खचलेले असून, केव्हाही कोसळू शकते, अशी स्थिती आहे. वेळोवेळी दुरुस्ती न झाल्याने धरणाची स्थिती अधिकच नाजूक बनली आहे. हे धरण दुरुस्त केल्यास शहराला मोठ्या प्रमाणात पाणी मिळेल व लाखो रुपयांचे वीजबिलही वाचेल. परंतु या धरणाकडे दुर्लक्ष करीत शीळ धरणातील पाणी खेचण्याकडेच पालिकेतील कारभाऱ्यांचा अधिक कल असतो. शीळच्या पाण्यासाठी दर महिन्याला २० लाखांपर्यंत वीजबिल मोजावे लागते. हे वीजबिल कमी करायचे असेल, तर पानवल धरण नव्याने उभारण्याशिवाय कोणताही पर्याय नाही.