शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

धरण दुरुस्तीबाबत अनास्थाच!

By admin | Updated: February 9, 2015 01:22 IST

रत्नागिरी नगरपालिका : फेबु्रवारीअखेर धरणातील पाणीसाठा संपणार

प्रकाश वराडकर - रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पानवल धरणातील पाणीसाठा फेब्रुवारीअखेर पुरेल. त्यानंतर शीळ धरणातूनच शहराला लागणारे पाणी पूर्णत: घ्यावे लागणार आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासूनची ही स्थिती आहे. गाळाने भरलेल्या व खचलेल्या पानवल धरणाच्या दुरुस्तीचा दरवर्षी ठणाणा करणाऱ्या राजकीय पक्षांकडून नव्याने धरण उभारण्याबाबत कोणत्याही हालचाली नसल्याने नाजूक स्थितीत असलेले हे धरण केव्हा कोसळेल, याचा नेम नसल्याच्या प्रतिक्रीयाही व्यक्त होत आहेत. रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारे पानवल हे धरण हातखंब्याजवळ असून ते सर्वाधिक जुने धरण आहे. या धरणावरून नैसर्गिक गुरुत्वाकर्षण शक्तीचा वापर करून रत्नागिरीपर्यंत पाणी आणले जाते. त्यासाठी विजेचा वापर करावा लागत नाही. रत्नागिरीची लोकसंख्या सहा दशकांपूर्वी खूप कमी होती. तरीही त्यावेळच्या पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी शासनाकडे पाठपुरावा करीत पानवल येथे रत्नागिरी पालिकेसाठी जागा घेतली. तेथील नदीवर धरण बांधले गेले. या धरणातून रत्नागिरी शहराला दररोज दीड ते दोन दशलक्ष लीटर्स पाणीपुरवठा केला जातो. सध्या या धरणातून पावणेदोन एमएलडी पाण्याचा पुरवठा शहराला केला जात आहे. मात्र, विजेचा लाखो रुपयांचा खर्च वाचविणाऱ्या या धरणाकडे गेल्या अनेक वर्षांपासून रत्नागिरी पालिकेत येणाऱ्या कोणत्याही कारभाऱ्यांकडून गंभीरपणे लक्ष दिले गेले नाही. सहा वर्षांपूर्वी या धरणातील गाळ उपसा करण्यावर लाखो रुपये खर्च करण्यात आले. उपसा केलेला गाळ धरण पात्राच्या कडेलाच ठेवण्यात आल्याने पावसाळ्यात पुन्हा तो गाळ धरणात गेला. त्यामुळे केलेला खर्च पाण्यात गेला.धरणाची सध्याची स्थिती अत्यंत बिकट आहे. हे धरण पायथ्याला खचलेले असून, केव्हाही कोसळू शकते, अशी स्थिती आहे. वेळोवेळी दुरुस्ती न झाल्याने धरणाची स्थिती अधिकच नाजूक बनली आहे. हे धरण दुरुस्त केल्यास शहराला मोठ्या प्रमाणात पाणी मिळेल व लाखो रुपयांचे वीजबिलही वाचेल. परंतु या धरणाकडे दुर्लक्ष करीत शीळ धरणातील पाणी खेचण्याकडेच पालिकेतील कारभाऱ्यांचा अधिक कल असतो. शीळच्या पाण्यासाठी दर महिन्याला २० लाखांपर्यंत वीजबिल मोजावे लागते. हे वीजबिल कमी करायचे असेल, तर पानवल धरण नव्याने उभारण्याशिवाय कोणताही पर्याय नाही.