शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
2
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
3
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
राज ठाकरे यांच्या मविआमधील समावेशाबाबत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचं मोठं विधान, म्हणाले... 
6
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
7
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
8
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
9
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
10
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
11
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
12
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
13
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
14
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
15
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
16
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
17
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
18
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
19
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
20
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?

दहीहंडीचे दीड लाख दिले दुष्काळग्रस्तांना

By admin | Updated: September 6, 2015 20:56 IST

अतुल रावराणे : राष्ट्रवादी, भैरीभवानी फाऊंडेशनने जपले सामाजिक भान

वैभववाडी : विविध मंडळे, संस्था व राजकीय पक्षांकडून दहीहंडीच्या उत्सवाचा ईव्हेंट बनविला गेला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अतुल रावराणे यांनी सामाजिक भान जपण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व भैरीभवानी फांऊडेशनतर्फे वैभववाडी येथे दरवर्षी उभारली जाणारी दहीहंडी यावर्षी रद्द करून हंडीच्या पारितोषिकाची १ लाख ५१ हजार रुपये रक्कम राज्यातील दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून दिली आहे. या आर्थिक मदतीचा धनादेश अतुल रावराणे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीकरिता सिंधुदुर्गचे निवासी जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवळ यांच्याकडे सुपूर्द केला.गोपाळकाल्याच्या उत्सवाचे रूपांतर गेल्या काही वर्षांत ईव्हेंटमध्ये झाले असून, हा ईव्हेंट कॅच करण्यासाठी आॅर्केस्ट्रा, सेलिब्रिटींना आणून पब्लिकला आकर्षित करण्यावर भर वाढला आहे. महानगरांपासून छोट्या शहरांपर्यंत हे चित्र सर्रास पहायला मिळत आहे. मात्र, राज्यात दुष्काळ पडला असल्याने भैरीभवानी फाऊंडेशनने यावर्षी दहीहंडी उत्सवाला फाटा देऊन सामाजिक बांधीलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे. दहीहंडीच्या पारितोषिकाचे १ लाख ५१ हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीकरिता प्रशासनाकडे सुपूर्द करून दुष्काळग्रस्तांसाठी खारीचा वाटा उचलला आहे.युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा भैरीभवानी फाऊंडेशनचे अध्यक्ष अतुल रावराणे यांनी निवासी जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवळ यांच्याकडे १ लाख ५१ हजार रुपये रकमेचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक, देवगडचे सुधीर आंबेकर, कुडाळचे सुनील राऊळ, अवी सापळे, वैभववाडी तालुकाध्यक्ष महेंद्र रावराणे, संतोष बोडके, धीरज पांचाळ, मंदार सावंत, धुळाजी काळे, लवू पवार, आदी उपस्थित होते.मदतीचा धनादेश दिल्यानंतर अतुल रावराणे म्हणाले, महाराष्ट्र दुष्काळात होरपळत आहे, अशा परिस्थितीत आपण दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात पुढे करून माणुसकीचा धर्म जपला पाहिजे. याकरिता यावर्षीची दहीहंडी रद्द केली. या हंडीची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीकरिता दिली आहे. विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना जगण्याची ताकद मिळावी, या हेतूने आम्ही हा निर्णय घेतला. राज्यातील मंडळे, संस्था व राजकीय पक्षांनी दहीहंडी उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करून सांस्कृतिक कार्यक्रमांवरील खर्च दुष्काळग्रस्तांना दिला असता तरी मोठा निधी उभा राहू शकला असता. (प्रतिनिधी)