शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दहीहंडीचे दीड लाख दिले दुष्काळग्रस्तांना

By admin | Updated: September 6, 2015 20:56 IST

अतुल रावराणे : राष्ट्रवादी, भैरीभवानी फाऊंडेशनने जपले सामाजिक भान

वैभववाडी : विविध मंडळे, संस्था व राजकीय पक्षांकडून दहीहंडीच्या उत्सवाचा ईव्हेंट बनविला गेला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अतुल रावराणे यांनी सामाजिक भान जपण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व भैरीभवानी फांऊडेशनतर्फे वैभववाडी येथे दरवर्षी उभारली जाणारी दहीहंडी यावर्षी रद्द करून हंडीच्या पारितोषिकाची १ लाख ५१ हजार रुपये रक्कम राज्यातील दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून दिली आहे. या आर्थिक मदतीचा धनादेश अतुल रावराणे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीकरिता सिंधुदुर्गचे निवासी जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवळ यांच्याकडे सुपूर्द केला.गोपाळकाल्याच्या उत्सवाचे रूपांतर गेल्या काही वर्षांत ईव्हेंटमध्ये झाले असून, हा ईव्हेंट कॅच करण्यासाठी आॅर्केस्ट्रा, सेलिब्रिटींना आणून पब्लिकला आकर्षित करण्यावर भर वाढला आहे. महानगरांपासून छोट्या शहरांपर्यंत हे चित्र सर्रास पहायला मिळत आहे. मात्र, राज्यात दुष्काळ पडला असल्याने भैरीभवानी फाऊंडेशनने यावर्षी दहीहंडी उत्सवाला फाटा देऊन सामाजिक बांधीलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे. दहीहंडीच्या पारितोषिकाचे १ लाख ५१ हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीकरिता प्रशासनाकडे सुपूर्द करून दुष्काळग्रस्तांसाठी खारीचा वाटा उचलला आहे.युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा भैरीभवानी फाऊंडेशनचे अध्यक्ष अतुल रावराणे यांनी निवासी जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवळ यांच्याकडे १ लाख ५१ हजार रुपये रकमेचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक, देवगडचे सुधीर आंबेकर, कुडाळचे सुनील राऊळ, अवी सापळे, वैभववाडी तालुकाध्यक्ष महेंद्र रावराणे, संतोष बोडके, धीरज पांचाळ, मंदार सावंत, धुळाजी काळे, लवू पवार, आदी उपस्थित होते.मदतीचा धनादेश दिल्यानंतर अतुल रावराणे म्हणाले, महाराष्ट्र दुष्काळात होरपळत आहे, अशा परिस्थितीत आपण दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात पुढे करून माणुसकीचा धर्म जपला पाहिजे. याकरिता यावर्षीची दहीहंडी रद्द केली. या हंडीची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीकरिता दिली आहे. विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना जगण्याची ताकद मिळावी, या हेतूने आम्ही हा निर्णय घेतला. राज्यातील मंडळे, संस्था व राजकीय पक्षांनी दहीहंडी उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करून सांस्कृतिक कार्यक्रमांवरील खर्च दुष्काळग्रस्तांना दिला असता तरी मोठा निधी उभा राहू शकला असता. (प्रतिनिधी)