शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

दहीहंडीचे दीड लाख दिले दुष्काळग्रस्तांना

By admin | Updated: September 6, 2015 20:56 IST

अतुल रावराणे : राष्ट्रवादी, भैरीभवानी फाऊंडेशनने जपले सामाजिक भान

वैभववाडी : विविध मंडळे, संस्था व राजकीय पक्षांकडून दहीहंडीच्या उत्सवाचा ईव्हेंट बनविला गेला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अतुल रावराणे यांनी सामाजिक भान जपण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व भैरीभवानी फांऊडेशनतर्फे वैभववाडी येथे दरवर्षी उभारली जाणारी दहीहंडी यावर्षी रद्द करून हंडीच्या पारितोषिकाची १ लाख ५१ हजार रुपये रक्कम राज्यातील दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून दिली आहे. या आर्थिक मदतीचा धनादेश अतुल रावराणे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीकरिता सिंधुदुर्गचे निवासी जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवळ यांच्याकडे सुपूर्द केला.गोपाळकाल्याच्या उत्सवाचे रूपांतर गेल्या काही वर्षांत ईव्हेंटमध्ये झाले असून, हा ईव्हेंट कॅच करण्यासाठी आॅर्केस्ट्रा, सेलिब्रिटींना आणून पब्लिकला आकर्षित करण्यावर भर वाढला आहे. महानगरांपासून छोट्या शहरांपर्यंत हे चित्र सर्रास पहायला मिळत आहे. मात्र, राज्यात दुष्काळ पडला असल्याने भैरीभवानी फाऊंडेशनने यावर्षी दहीहंडी उत्सवाला फाटा देऊन सामाजिक बांधीलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे. दहीहंडीच्या पारितोषिकाचे १ लाख ५१ हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीकरिता प्रशासनाकडे सुपूर्द करून दुष्काळग्रस्तांसाठी खारीचा वाटा उचलला आहे.युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा भैरीभवानी फाऊंडेशनचे अध्यक्ष अतुल रावराणे यांनी निवासी जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवळ यांच्याकडे १ लाख ५१ हजार रुपये रकमेचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक, देवगडचे सुधीर आंबेकर, कुडाळचे सुनील राऊळ, अवी सापळे, वैभववाडी तालुकाध्यक्ष महेंद्र रावराणे, संतोष बोडके, धीरज पांचाळ, मंदार सावंत, धुळाजी काळे, लवू पवार, आदी उपस्थित होते.मदतीचा धनादेश दिल्यानंतर अतुल रावराणे म्हणाले, महाराष्ट्र दुष्काळात होरपळत आहे, अशा परिस्थितीत आपण दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात पुढे करून माणुसकीचा धर्म जपला पाहिजे. याकरिता यावर्षीची दहीहंडी रद्द केली. या हंडीची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीकरिता दिली आहे. विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना जगण्याची ताकद मिळावी, या हेतूने आम्ही हा निर्णय घेतला. राज्यातील मंडळे, संस्था व राजकीय पक्षांनी दहीहंडी उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करून सांस्कृतिक कार्यक्रमांवरील खर्च दुष्काळग्रस्तांना दिला असता तरी मोठा निधी उभा राहू शकला असता. (प्रतिनिधी)