शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

डेगवेवासियांचा मायनिंगविरोधी एल्गार

By admin | Updated: December 9, 2015 01:11 IST

संघर्ष समितीची निवड : प्राण गेला तरी इंचभरही जागा न देण्याचा विशेष सभेचा निर्धार

बांदा : मायनिंगमुळे संपूर्ण गाव विस्थापित होणार आहे. त्यामुळे गावचा विनाश करणाऱ्या या प्रस्तावित खनिज प्रकल्पाला गावात कोणत्याही परिस्थितीत येऊ देणार नाही. प्रसंगी प्राण देऊ पण कोणत्याही आमिषाला बळी न पडता एक इंचदेखील जमीन विकणार नाही, असा एकमुखी ठराव करत डेगवेवासियांनी विशेष ग्रामसभेत मायनिंगविरोधात एल्गार केला. ग्रामसभेला उपस्थित १५0 ग्रामस्थांनी एकजूूट दाखवत प्रस्तावित खनिज प्रकल्पाला १00 टक्के विरोधाची भूमिका यावेळी कायम ठेवली. यावेळी ग्रामदैवता श्री देवी माऊलीला सार्वजनिक गाऱ्हाणे घालून ग्रामस्थांनी कोणत्याही परिस्थितीत मायनिंगला समर्थन न देण्याची शपथ घेतली. डेगवे गावात होऊ घातलेल्या प्रस्ताविक खनिज प्रकल्पाबाबत ग्रामस्थांची मते जाणून घेण्यासाठी येथील माउली मंदिरात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. खनिज प्रकल्पाविरोधात लढा देण्यासाठी ग्रामसभेत मायनिंगविरोधी संघर्ष समितीची एकमताने निवड करण्यात आली. या समितीच्या मार्गदर्शनाखाली लढा उभारण्याचे ठरवण्यात आले. समितीच्या अध्यक्षपदी उपसरपंच मधुकर देसाई यांची निवड करण्यात आली. यावेळी सरपंच स्वप्नाली आंबेरकर, सोसायटी अध्यक्ष प्रवीण देसाई, भारती देसाई, सुनील देसाई, बाबा देसाई, बाबाजी देसाई, तलाठी किरण गझीनकर, ग्रामसेविका लीना प्रभू, पोलीसपाटील प्रमोद देसाई आदी उपस्थित होते. डेगवे गावात खनिज प्रकल्प मंजूर झाल्याने या प्रकल्पाबाबत ग्रामस्थांनी आपली मते मांडावी, असे शासनातर्फे सुचविण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत मायनिंगविरोधी भूमिका मांडली. जयवंत देसाई व उत्तम देसाई यांनी सर्वप्रथम ग्रामपंचायतीने प्रस्तावित खनिज प्रकल्पाबाबत परीपूर्ण माहिती मिळवावी व ती ग्रामस्थांसमोर मांडावी, असे सुचविले. त्यावर उपसरपंच मधुुकर देसाई यांनी सांगितले की, जिल्हा प्रशासनाकडे अद्यापपर्यंत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. खनिकर्म विभागाच्या संकेतस्थळावर डेगवे गावातील खनिज प्रकल्पाबाबत पूर्ण अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली आहे. त्याची माहिती मिळवण्यात आली असून, त्यासाठीच आजची ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेत ग्रामस्थांनी त्यांची मते आक्रमकपणे मांडली. सर्व ग्रामस्थांनी एकत्रित येऊन याचा सामना करायला हवा, असे यावेळी अनेक ग्रामस्थांनी मत मांडले. त्याचबरोबर भविष्यात एकत्रितपणे हा लढा लढण्याचेही ठरवण्यात आले. (प्रतिनिधी)