शहरं
Join us  
Trending Stories
1
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
2
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
3
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
4
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
5
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
6
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
7
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
8
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
9
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
10
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
11
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!
12
चिनी विद्यार्थिनीला युक्रेनियन तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची शिक्षा, विद्यापीठानं उचललं टोकाचं पाऊल
13
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
14
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
15
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
16
वृद्धाला हातपाय बांधून कारमध्ये कोंडले, मग कुटुंब ताजमहाल पाहण्यात रंगले, सुरक्षा रक्षकाने पाहिल्याने अनर्थ टळला   
17
"आमचं शांततापूर्ण जीवन..."; गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने फोन चार्ज झाल्यावर पहिलं काय केलं?
18
केस एवढे गळतात की टक्कल पडण्याचीच वाटते भीती; 'हा' घरगुती उपाय ठरेल रामबाण
19
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
20
2025 Keeway RR300: थेट बीएमडब्लूशी स्पर्धा करणार मोटो वॉल्टची नवी बाईक? दोन लाखांहून कमी किंमतीत लॉन्च!

डेगवेवासियांचा मायनिंगविरोधी एल्गार

By admin | Updated: December 9, 2015 01:11 IST

संघर्ष समितीची निवड : प्राण गेला तरी इंचभरही जागा न देण्याचा विशेष सभेचा निर्धार

बांदा : मायनिंगमुळे संपूर्ण गाव विस्थापित होणार आहे. त्यामुळे गावचा विनाश करणाऱ्या या प्रस्तावित खनिज प्रकल्पाला गावात कोणत्याही परिस्थितीत येऊ देणार नाही. प्रसंगी प्राण देऊ पण कोणत्याही आमिषाला बळी न पडता एक इंचदेखील जमीन विकणार नाही, असा एकमुखी ठराव करत डेगवेवासियांनी विशेष ग्रामसभेत मायनिंगविरोधात एल्गार केला. ग्रामसभेला उपस्थित १५0 ग्रामस्थांनी एकजूूट दाखवत प्रस्तावित खनिज प्रकल्पाला १00 टक्के विरोधाची भूमिका यावेळी कायम ठेवली. यावेळी ग्रामदैवता श्री देवी माऊलीला सार्वजनिक गाऱ्हाणे घालून ग्रामस्थांनी कोणत्याही परिस्थितीत मायनिंगला समर्थन न देण्याची शपथ घेतली. डेगवे गावात होऊ घातलेल्या प्रस्ताविक खनिज प्रकल्पाबाबत ग्रामस्थांची मते जाणून घेण्यासाठी येथील माउली मंदिरात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. खनिज प्रकल्पाविरोधात लढा देण्यासाठी ग्रामसभेत मायनिंगविरोधी संघर्ष समितीची एकमताने निवड करण्यात आली. या समितीच्या मार्गदर्शनाखाली लढा उभारण्याचे ठरवण्यात आले. समितीच्या अध्यक्षपदी उपसरपंच मधुकर देसाई यांची निवड करण्यात आली. यावेळी सरपंच स्वप्नाली आंबेरकर, सोसायटी अध्यक्ष प्रवीण देसाई, भारती देसाई, सुनील देसाई, बाबा देसाई, बाबाजी देसाई, तलाठी किरण गझीनकर, ग्रामसेविका लीना प्रभू, पोलीसपाटील प्रमोद देसाई आदी उपस्थित होते. डेगवे गावात खनिज प्रकल्प मंजूर झाल्याने या प्रकल्पाबाबत ग्रामस्थांनी आपली मते मांडावी, असे शासनातर्फे सुचविण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत मायनिंगविरोधी भूमिका मांडली. जयवंत देसाई व उत्तम देसाई यांनी सर्वप्रथम ग्रामपंचायतीने प्रस्तावित खनिज प्रकल्पाबाबत परीपूर्ण माहिती मिळवावी व ती ग्रामस्थांसमोर मांडावी, असे सुचविले. त्यावर उपसरपंच मधुुकर देसाई यांनी सांगितले की, जिल्हा प्रशासनाकडे अद्यापपर्यंत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. खनिकर्म विभागाच्या संकेतस्थळावर डेगवे गावातील खनिज प्रकल्पाबाबत पूर्ण अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली आहे. त्याची माहिती मिळवण्यात आली असून, त्यासाठीच आजची ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेत ग्रामस्थांनी त्यांची मते आक्रमकपणे मांडली. सर्व ग्रामस्थांनी एकत्रित येऊन याचा सामना करायला हवा, असे यावेळी अनेक ग्रामस्थांनी मत मांडले. त्याचबरोबर भविष्यात एकत्रितपणे हा लढा लढण्याचेही ठरवण्यात आले. (प्रतिनिधी)