शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
5
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
6
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
7
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
8
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
9
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
10
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
11
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
12
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
13
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
14
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
15
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
16
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
17
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
18
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
19
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
20
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा

दाभोळ प्रकल्पातील बाधितांची फसवणूक

By admin | Updated: January 16, 2016 00:54 IST

खेड तालुका : धनादेशाची केवळ २५ टक्के रक्कम देऊन बोळवण; न्यायालयात लढाई सुरूच

खेड : खेड तालुक्यातील दाभोळ ऊर्जा प्रकल्पातील बाधीत प्रकल्पग्रस्तांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत त्यांना मिळालेल्या धनादेशाची केवळ २५ टक्के रक्कम देऊन त्यांची बोळवण करण्यात आली आहे. याप्रकरणी खेड पोलीस स्थानकात फिर्याद दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर खेड येथील न्यायालयातील निकालानंतर उच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी सध्या सुनावणी सुरू आहे. हे प्रकरण सध्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे असून, यातील दोषींना मोकाट सोडू नये, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे़ अनेक शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन काही ठकसेनानी त्यांना फसवले आहे. दोन वर्षांपूर्वी दाभोळ ऊर्जाप्रकरणी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी दोषी आरोपींबाबत ही कारवाई अपेक्षित आहे़ खेड पोलीस स्थानकात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ त्याच्यासह आणखी काहींचा यामध्ये सामावेश आहे़ या आरोपींची सखोल चौकशी करून त्यांना कडक शासन करण्याची मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे. खाडीपट्ट्यातील काही शेतकऱ्यांच्या जमिनी येथील दाभोळ ऊर्जा प्रकल्पासाठी संपादीत करण्यात आल्या आहेत़ अनेक शेतकऱ्यांची फळझाडे आणि बांधबंदिस्तांचे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्याने त्यांनाही नुकसानभरपाई देण्यात आली आहे. मात्र, भरपाईचे धनादेश थेट शेतकऱ्यांच्या हाती पडले नाहीत, तर ते एजंट म्हणून वावरत असलेल्या दोघांच्या हाती पडल्याने या शेतकऱ्यांना अक्षरश: लुबाडण्यात आले. पूर्णपणे निरक्षर असलेल्या या शेतकऱ्यांचे धनादेश याचा दोघांनी परस्पर वटविले आहेत. धनादेशाच्या केवळ २५ टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या हातात पडल्याचे या शेतकऱ्यांनी बोलून दाखवले. उर्वरित ७५ टक्के रक्कम या दोघा एजंटांनी घेतल्याची माहिती येथील शेतकरी सांगत आहेत.विशेष म्हणजे या दोघांकडील चार चाकी गाड्या आणि त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी आता होत आहे, एवढा पैसा या दोघांनी आणला कोठून, याविषयी पोलीसही अनभिज्ञ होते. मात्र, या दोघांविरोधात पोलीस ब्रदेखील काढायला तयार नव्हते, तर काही दिवसांनी हे प्रकरण रत्नागिरीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आल्यांनतर या प्रकरणाला खऱ्या अर्थाने वाचा फुटली़ हे प्रकरण सध्या उच्च न्यायालयात असून, त्याची सुनावणी सुरू असल्याचे समजते. आता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने याप्रकरणी कंबर कसून आरोपींना कडक शिक्षा होण्यास परिश्रम घ्यावेत, अशी मागणी हे शेतकरी करीत आहेत. (प्रतिनिधी)पोलीस स्थानकात एकावर गुन्हा दाखल.धनादेश थेट शेतकऱ्यांच्या हाती नाहीत.कडक कारवाईची मागणी.