शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
3
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
4
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
5
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
6
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
7
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
8
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
9
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
10
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
11
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
12
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
13
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
14
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
15
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
16
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
17
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
18
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
19
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
20
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?

दाभोळ प्रकल्पातील बाधितांची फसवणूक

By admin | Updated: January 16, 2016 00:54 IST

खेड तालुका : धनादेशाची केवळ २५ टक्के रक्कम देऊन बोळवण; न्यायालयात लढाई सुरूच

खेड : खेड तालुक्यातील दाभोळ ऊर्जा प्रकल्पातील बाधीत प्रकल्पग्रस्तांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत त्यांना मिळालेल्या धनादेशाची केवळ २५ टक्के रक्कम देऊन त्यांची बोळवण करण्यात आली आहे. याप्रकरणी खेड पोलीस स्थानकात फिर्याद दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर खेड येथील न्यायालयातील निकालानंतर उच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी सध्या सुनावणी सुरू आहे. हे प्रकरण सध्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे असून, यातील दोषींना मोकाट सोडू नये, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे़ अनेक शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन काही ठकसेनानी त्यांना फसवले आहे. दोन वर्षांपूर्वी दाभोळ ऊर्जाप्रकरणी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी दोषी आरोपींबाबत ही कारवाई अपेक्षित आहे़ खेड पोलीस स्थानकात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ त्याच्यासह आणखी काहींचा यामध्ये सामावेश आहे़ या आरोपींची सखोल चौकशी करून त्यांना कडक शासन करण्याची मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे. खाडीपट्ट्यातील काही शेतकऱ्यांच्या जमिनी येथील दाभोळ ऊर्जा प्रकल्पासाठी संपादीत करण्यात आल्या आहेत़ अनेक शेतकऱ्यांची फळझाडे आणि बांधबंदिस्तांचे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्याने त्यांनाही नुकसानभरपाई देण्यात आली आहे. मात्र, भरपाईचे धनादेश थेट शेतकऱ्यांच्या हाती पडले नाहीत, तर ते एजंट म्हणून वावरत असलेल्या दोघांच्या हाती पडल्याने या शेतकऱ्यांना अक्षरश: लुबाडण्यात आले. पूर्णपणे निरक्षर असलेल्या या शेतकऱ्यांचे धनादेश याचा दोघांनी परस्पर वटविले आहेत. धनादेशाच्या केवळ २५ टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या हातात पडल्याचे या शेतकऱ्यांनी बोलून दाखवले. उर्वरित ७५ टक्के रक्कम या दोघा एजंटांनी घेतल्याची माहिती येथील शेतकरी सांगत आहेत.विशेष म्हणजे या दोघांकडील चार चाकी गाड्या आणि त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी आता होत आहे, एवढा पैसा या दोघांनी आणला कोठून, याविषयी पोलीसही अनभिज्ञ होते. मात्र, या दोघांविरोधात पोलीस ब्रदेखील काढायला तयार नव्हते, तर काही दिवसांनी हे प्रकरण रत्नागिरीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आल्यांनतर या प्रकरणाला खऱ्या अर्थाने वाचा फुटली़ हे प्रकरण सध्या उच्च न्यायालयात असून, त्याची सुनावणी सुरू असल्याचे समजते. आता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने याप्रकरणी कंबर कसून आरोपींना कडक शिक्षा होण्यास परिश्रम घ्यावेत, अशी मागणी हे शेतकरी करीत आहेत. (प्रतिनिधी)पोलीस स्थानकात एकावर गुन्हा दाखल.धनादेश थेट शेतकऱ्यांच्या हाती नाहीत.कडक कारवाईची मागणी.