शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

दाभोळ प्रकल्पातील बाधितांची फसवणूक

By admin | Updated: January 16, 2016 00:54 IST

खेड तालुका : धनादेशाची केवळ २५ टक्के रक्कम देऊन बोळवण; न्यायालयात लढाई सुरूच

खेड : खेड तालुक्यातील दाभोळ ऊर्जा प्रकल्पातील बाधीत प्रकल्पग्रस्तांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत त्यांना मिळालेल्या धनादेशाची केवळ २५ टक्के रक्कम देऊन त्यांची बोळवण करण्यात आली आहे. याप्रकरणी खेड पोलीस स्थानकात फिर्याद दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर खेड येथील न्यायालयातील निकालानंतर उच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी सध्या सुनावणी सुरू आहे. हे प्रकरण सध्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे असून, यातील दोषींना मोकाट सोडू नये, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे़ अनेक शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन काही ठकसेनानी त्यांना फसवले आहे. दोन वर्षांपूर्वी दाभोळ ऊर्जाप्रकरणी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी दोषी आरोपींबाबत ही कारवाई अपेक्षित आहे़ खेड पोलीस स्थानकात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ त्याच्यासह आणखी काहींचा यामध्ये सामावेश आहे़ या आरोपींची सखोल चौकशी करून त्यांना कडक शासन करण्याची मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे. खाडीपट्ट्यातील काही शेतकऱ्यांच्या जमिनी येथील दाभोळ ऊर्जा प्रकल्पासाठी संपादीत करण्यात आल्या आहेत़ अनेक शेतकऱ्यांची फळझाडे आणि बांधबंदिस्तांचे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्याने त्यांनाही नुकसानभरपाई देण्यात आली आहे. मात्र, भरपाईचे धनादेश थेट शेतकऱ्यांच्या हाती पडले नाहीत, तर ते एजंट म्हणून वावरत असलेल्या दोघांच्या हाती पडल्याने या शेतकऱ्यांना अक्षरश: लुबाडण्यात आले. पूर्णपणे निरक्षर असलेल्या या शेतकऱ्यांचे धनादेश याचा दोघांनी परस्पर वटविले आहेत. धनादेशाच्या केवळ २५ टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या हातात पडल्याचे या शेतकऱ्यांनी बोलून दाखवले. उर्वरित ७५ टक्के रक्कम या दोघा एजंटांनी घेतल्याची माहिती येथील शेतकरी सांगत आहेत.विशेष म्हणजे या दोघांकडील चार चाकी गाड्या आणि त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी आता होत आहे, एवढा पैसा या दोघांनी आणला कोठून, याविषयी पोलीसही अनभिज्ञ होते. मात्र, या दोघांविरोधात पोलीस ब्रदेखील काढायला तयार नव्हते, तर काही दिवसांनी हे प्रकरण रत्नागिरीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आल्यांनतर या प्रकरणाला खऱ्या अर्थाने वाचा फुटली़ हे प्रकरण सध्या उच्च न्यायालयात असून, त्याची सुनावणी सुरू असल्याचे समजते. आता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने याप्रकरणी कंबर कसून आरोपींना कडक शिक्षा होण्यास परिश्रम घ्यावेत, अशी मागणी हे शेतकरी करीत आहेत. (प्रतिनिधी)पोलीस स्थानकात एकावर गुन्हा दाखल.धनादेश थेट शेतकऱ्यांच्या हाती नाहीत.कडक कारवाईची मागणी.