शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

...तर दाभोळ खाडी बनेल रोजगाराचं केंद्र

By admin | Updated: January 1, 2015 00:17 IST

पर्यटकांसाठी अनोखी पर्वणी : बोटिंगसह विविध प्राणी, पक्षी व मगरी पाहण्याचा अनोखा योग

सुभाष कदम - चिपळूण -‘हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट, सांग गो चेडवा दिसता कसो कोकणचो थाट...’ हिरवी शाल पांघरलेला महेंद्र पर्वत, त्याच्या मध्यावरुन जाणारा मुंबई-गोवा महामार्ग व त्याला भेदून गेलेला कोकण रेल्वेचा मार्ग, त्याखाली पायथ्याशी असणारी दुथडी भरुन वाहणारी वाशिष्ठीची दाभोळ खाडी हा परिसर म्हणजे पर्यटकांना पर्वणी असते. सर्वसामान्य लोकांना निसर्गाच्या जवळ घेऊन जाणाऱ्या दाभोळ खाडीतील या सौंदर्याचा प्रसार झाला तर त्यातून इथं पर्यटकांची गर्दी वाढेल आणि त्यातून रोजगाराचं मोठं दालन खुलं होईल.दाभोळ खाडीची विहंगम दृश्य पाहण्यासाठी बोटीतून सफर करायला हवी. खेड, गुहागर आणि चिपळूण या तीन तालुक्यांच्या मध्यावर हे खाडीपात्र विसावले आहे. खाडीकिनारी असणारी उंचच उंच नारळी पोफळीची झाडे, हापूस आंब्याच्या बागा, झुडपाझुडपाने दिसणारी काजूची झाडे याबरोबरच रानटी वेलींनी करकचून आवळलेले जंगल त्यावर फुललेली रंगीबेरंगी फुले पाहताना मन भारावून जाते. दाभोळ खाडीला फार पूर्वीपासून महत्त्व आहे. या खाडीच्या एका बाजूला गोविंदगड किल्ला आहे. गोवळकोटचा गोविंदगड आजही इतिहासाची साक्ष देत उभा आहे. दुसऱ्या बाजूला महेंद्र पर्वतावर भगवान परशुरामाचे मंदिर आहे. लगतच सवतसडा धबधबा पर्यटकांना आकर्षित करतो. आता हा धबधबा कोरडा असतो. परशुराम मंदिराच्या पायथ्याशी धामणदिवी हे हिरवाईने नटलेले गाव वसले आहे. या गावातून कोकण रेल्वेचा बोगदा आहे. पर्यटनदृष्ट्या या गावात प्रवेश केला तर नजरेसमोर दाभोळखाडी व गोविंदगडचे अनोखे दर्शन घडते. पावसाळ्यात रौद्ररुप धारण केलेली दाभोळ खाडी लाल भडक पाण्याने तुडुंब भरुन वाहात असते. मुसळधार पावसातही खाडीचे हे तामसी रुप लक्ष वेधते. आता हिवाळा सुरु असताना खाडीचे हिरवेकंच पाणी, त्यात किनाऱ्यावर असलेली झाडेझुडपे व विविध जातीचे पक्षी मुक्तपणे विहंगम करताना आढळतात. विविध आकाराच्या अनेक लहान- मोठ्या मगरी, बगळे, बदक व उद नावाचा प्राणी या खाडीत स्वच्छंद विहार करीत असतात. पर्यटकांसाठी ही एक पर्वणी असते. या काळात दाभोळ खाडीची सफर म्हणजे वातावरणातील गारव्याप्रमाणे मन समाधानी करणारे ठरते. हल्ली आनंदी आणि समाधानी माणसं दुर्मीळ झाली आहेत. वेळ नाही, पैसे नाहीत, अशा तक्रारींचा पाढा वाचणारी माणसेही दाभोळ खाडीत येऊन हरखून जातात. सूर्योदय आणि सूर्यास्त या काळात खाडीतून भ्रमंती करताना आपण वेगळ्याच विश्वात असल्याचा भास होतो. सूर्योदयाच्या काळात पूर्वेकडून येणारी सोनेरी किरणे अंगावर झेलताना अंग अंग मोहरुन जाते, तर सायंकाळच्या वेळी पश्चिमेकडे समुद्रात डुबणाऱ्या सूर्याचा लाल गोळा पाहताना विलक्षण आनंद होतो.परशुराम विसावा पॉर्इंट येथून संपूर्ण खाडीचे व परिसराचे दर्शन होते. दाभोळ खाडीतून फिरताना परिसरात असणाऱ्या गावातील संस्कृती आणि रुढी, परंपरा पाहण्याचा, तेथील ग्रामीण जीवन अनुभवण्याचा व अभ्यासण्याचा एक योग पर्यटकांना मिळतो. यासाठी एकदा दाभोळ खाडीची भ्रमंती करायलाच हवी. शहरातील झपाट्याने उभी राहणारी सिमेंटची जंगले, औद्योगिकीकरणामुळे होणारा यंत्रांचा खडखड, वाहनांच्या वर्दळीमुळे गोंगाट करणारे आवाज, होणारे ध्वनी प्रदूषण यावर मात करण्यासाठी एखाद दिवस दाभोळ खाडी परिसरात स्वच्छंद विहार करुन मन ताजेतवाने करण्याची संधी इथला निसर्ग पूर्णपणे देतो.गोवळकोट धक्का येथून दाभोळ खाडीच्या प्रवासाला सुरुवात केली की, समोर धामणदिवी, बहिरवली, सोनगाव, जुवाड, मजरेकाशी, कालुस्तेकडे जाणारा पूल, करंजीकर मोहल्ला, चिवेली, बामणोली, दोणवली, केतकी, करंबवणे हा सारा परिसर मनात साठवून ठेवण्यासारखा आहे. नितळ वाहणारी वाशिष्ठी औद्योगिकीकरणामुळे प्रदूषित झाली आहे. त्यामुळे मासे मर्तुकीसारख्या घटना सातत्याने घडत असतात. या किनारपट्टी भागात मच्छिमारीवर उपजीविका करणारा भोई, मच्छिमार व दाल्दी समाज अडचणीत आला आहे. त्यांच्या रोजीरोटीबरोबरच पिण्याचे पाणीही दूषित झाले आहे. माशाच्या दुर्मीळ जाती आता लोप पावल्या आहेत. विशेषकरुन किनारपट्टी भागात मिळणारी कोळंबी नष्ट झाली आहे. परिसरातील वाळू उत्खननामुळेही जलचरांना त्रास होत आहे. त्यामुळे अनेक जलचर प्राणी, पक्षी या भागातून नष्ट झाले आहेत. सध्या मगरी कमालीच्या वाढल्याने या भागाला क्रोकोडाईल पार्क असे संबोधले जाते. त्यामुळे मगरी पाहण्याचा आनंद यातून मिळतो. व्यापारातही बोलबालापूर्वी दाभोळ खाडीत गोवळकोट धक्क्यावर मोठ्या प्रमाणावर व्यापार चाले. पश्चिम महाराष्ट्रातून म्हणजे घाटावरुन कुंभार्लीमार्गे बैलगाडीने माल गोवळकोट बंदरावर आणला जात असे. तेथून तो गलबताने किंवा जहाजाने तो राज्याच्या इतर कानाकोपऱ्यात किंवा परदेशात पाठविला जात असे. इतर राज्यातून मंगलोरी कौले किंवा इतर सामान येथे येत असे. बंदरात ते उतरविले जात असे. जलवाहतुकीसाठीही गोवळकोट धक्का प्रसिद्ध होता. पूर्वी बाहेरुन येणाऱ्या बोटी किंवा लाँच गोवळकोट येथे थांबत असत. तेथून मुंबईकडे सहज जाता येत असे. या बोटी भाऊचा धक्का येथे लागत असत. त्यामुळे मुुंबईहून गावी येण्यासाठी अतिशय सोयीचा व कमी खर्चिक असा हा प्रवास होता. परंतु, काळ बदलला खाडी होरली आणि ही जलवाहतूक कायमची विस्मृतीत गेली. आता ही वाहतूक कालबाह्य झाली आहे. पाहण्यासारखं बरंच काही...दाभोळ खाडी विक एण्डला येणाऱ्या पर्यटकांसाठी अत्यंत सोयीची असल्याची जनजागृती करायला हवी. या भागातील मगरी, जलचर, परिसराती विहंगम दृश्य, बोटीची सफारी याची जनजागृती झाल्यास एक ते दोन दिवसांसाठी पर्यटकांना येथे खिळवून ठेवता येईल. निसर्ग सौदर्याबरोबरच भगवान परशुराम मंदिर, बामणोलीचा मठ, धामणदिवीचे पिंपळेश्वर दत्त मंदिर, दर्गा, गोंधळे येथील पांडवकालीन शिव मंदिर व परिसरातील इतर लहान मोठी मंदिरे ही धार्मिक स्थळेही पर्यटकांना पाहता येतील. गोविंद गडावर भ्रमंती करुन करंजेश्वरीचे दर्शन घेता येईल. येथे येण्यासाठी...मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण एस. टी. स्टॅण्ड येथून येथे जाता येते. कोकण रेल्वेने आल्यास चिपळूण स्टेशनपासून रिक्षाने येथे सहज जाता येते. गुहागरकडून वेलदूर येथून दाभोळ खाडीत जाता येते. दाभोळ धक्क्यावरुन किंवा बहिरवली खेड खाडीपट्ट्यातून येथे येता येते. लोटे औद्योगिक वसाहतीतून सोनगावमार्गे जाता येईल. मुंबई-गोवा महामार्ग व कोकण रेल्वेने येथे जाण्यासाठी सहज सोयी उपलब्ध असल्याने राज्याच्या कोणत्याही भागातून एक ते दोन दिवसांसाठी येथे पर्यटनासाठी येणे सोयीचे होईल. चिपळूण येथे निवास व न्याहरीची उत्तम व्यवस्था आहे.