शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

‘ड’ वर्ग महापालिकांसाठी समान ‘डीसी रूल’

By admin | Updated: August 12, 2015 22:57 IST

प्रधान सचिवांची बैठक; संचालकांनी सादर केली माहिती.

सागर पाटील- टेंभ्ये  शाळा, शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी यांची माहिती आॅनलाईन पद्धतीने भरण्यासाठी शासनाने ‘सरल’ प्रणाली विकसित केली आहे. सध्या राज्यभरात ही माहिती भरण्याची प्रक्रिया अत्यंत वेगात सुरु आहे. मात्र, इंटरनेट व सर्व्हरची समस्या निर्माण होत असल्याने शिक्षकवर्गाला अक्षरश: रात्रपाळी करावी लागत आहे. शासनाने ही प्रक्रिया आता अत्यंत सोपी केली आहे. मात्र, सर्व्हर जोडणीच्या समस्येमुळे शिक्षक हैराण झाले आहेत. दिवस-रात्र संगणकाच्या समोर बसूनदेखील जोडणी मिळत नसल्याची तक्रार अनेकांकडून ऐकायला मिळत आहे.विद्यार्थ्यांच्या आॅनलाईन भरावयाच्या माहितीमध्ये शासन स्तरावरुन मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला आहे. सध्यातरी विद्यार्थ्यांची सर्व माहिती शाळेच्या जनरल रजिस्टरवरून भरता येणार आहे. आधार क्रमांकाचीदेखील सक्ती करण्यात आलेली नाही. आवश्यक माहितीमध्ये विद्यार्थ्याचे नाव, आईचे नाव, जन्मतारीख, शाळेत प्रवेश घेतल्याची तारीख, प्रवेश घेतल्याची इयत्ता, जनरल रजिस्टर क्रमांक, प्रवेशाचा प्रकार, इयत्ता, तुकडी व माध्यम इतकीच माहिती भरावी लागणार आहे. नेटची सर्व्हीस व्यवस्थित मिळाल्यास एका विद्यार्थ्याची माहिती ३ ते ४ मिनिटात भरुन पूर्ण होत असल्याचे माहिती भरलेल्या शिक्षकांनी सांगितले.ग्रामीण भागातील शाळांसमोर नेटवर्क ची मोठी समस्या निर्माण झाली आहे. विशेष बाब म्हणजे ही माहिती ‘सायबर कॅफे’मध्ये भरता येत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. राज्यभरातून माहिती भरण्याचे काम सुरु असल्याने सर्व्हरवर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. सलग दोन ते तीन तासच जोडणी राहाते. त्यानंतर बराचवेळ सीस्टम बिझी असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे दिवसभर सतत प्रयत्न केल्यानंतर १५ ते २० विद्यार्थ्यांची माहिती भरुन पूर्ण होत असल्याचे ग्रामीण भागातील शिक्षकांकडून सांगण्यात येत आहे. सर्व्हर डाऊन असल्याने विद्यार्थ्यांची माहिती भरुन पूर्ण करावयाची असल्याने शिक्षकांना रात्रपाळी करावी लागत आहे. त्यामुळे शिक्षकवर्ग चांगलाच त्रासून गेला आहे.‘सरल’च्या सर्व्हरवर येणारा भार टाळण्यासाठी शासनाने विभागनिहाय माहिती भरण्याच्या तारखा निश्चित केल्या आहेत. यामध्ये कोल्हापूर विभागासाठी २० ते २३ आॅगस्ट हा कालावधी निश्चित केला आहे. या कालावधीत सर्व शाळांनी विद्यार्थी, शिक्षक व शाळेसंदर्भातील माहिती भरावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी केले आहे.विद्यार्थ्यांच्या आॅनलाईन माहितीमध्ये ‘आधार’ क्रमांक अथवा नोंदणी क्रमांक नोंदविणे सध्या ऐच्छिक करण्यात आले आहे. आधार क्रमांक नाही म्हणून विद्यार्थ्याची नोंदणी थांबू नये. यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्याची नोंदणी झाल्यानंतर आधार क्रमांक नोंदवावा लागणार आहे. सध्यातरी विद्यार्थ्यांची आॅनलाईन माहिती भरताना आधारची आवश्यकता नाही. एखाद्या विद्यार्थ्याचे आधार कार्ड नसले तरीही त्याची नोंदणी करणे आवश्यक आहे. आधारकार्ड मिळाल्यानंतर आधार क्रमांक नोंदवावा लागणार आहे.- किरण लोहार, शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग.सरल प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांच्या भराव्या लागणाऱ्या माहितीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला आहे. सर्व माहिती शाळेच्या जनरल रजिस्टरवरुनच भरता येणार आहे. माहिती अत्यंत कमी असल्याने माहिती भरण्यासाठी फार वेळ लागणार नाही. कुटुंब, बँक खाते, उत्पन्न याबाबतची माहिती भरावी लागणार नसल्याने सरल प्रक्रिया सोपी झाली आहे.- डी. एस. पवार, उपशिक्षणाधिकारी