शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

सायबर गुन्ह्यांवर अंकुश बसेल

By admin | Updated: August 16, 2016 23:47 IST

दीपक केसरकर : सिंधुदुर्गनगरीत ‘सायबर सेल’चे उद्घाटन

सिंधुदुर्गनगरी : माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे संवादाची अनेक माध्यमे उपलब्ध झाली. संवादाचा वेग वाढला. फेसबुक, वॉट्सअ‍ॅप, व्टीटर, ब्लॉग, अशी अनेक माध्यमे जनमाणसांत चांगलीच रुजली आहेत. तथापि, यांचा गैरवापरही होऊ लागला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून तसेच राज्याचे सायबर व महिला अत्याचार प्रतिबंध विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात ३२ ठिकाणी एकाचवेळी प्रत्येक जिल्हा मुख्यालयात ‘सायबर सेल’ स्थापन होत आहे. यामुळे सायबर गुन्ह्यांवर अंकुश बसेल. जनतेने या सेलकडे आपल्या तक्रारी दाखल कराव्यात, याचबरोबर पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या सायबर सेलचा प्रभावीपणे वापर करून सायबर क्राईम अंतर्गत घडणाऱ्या गुन्ह्यांचा छडा लावावा, असे आवाहन गृहराज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात नव्याने सरू करण्यात आलेल्या सायबर सेलचे उद्घाटन पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी आयोजित समारंभात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, अप्पर जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर, जिल्हा पोलिस अधीक्षक अमोघ गावकर, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक प्रकाश गायकवाड उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविकात जिल्हा पोलिसप्रमुख अमोघ गावकर यांनी सायबर सेलच्या कार्यपद्धतीची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत गिते यांनी केले. समारंभास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी, महावितरणचे अधीक्षक अभियंता निर्मले, निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, तसेच पोलिस विभागातील अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. गृहनिर्माण प्रकल्प राबविणारजनतेच्या रक्षणाबरोबरच तक्रार द्यायला पोलिस ठाण्यात आलेल्या तक्रारदाराला सौजन्यपूर्ण वागणूक देणे ही पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे, असे स्पष्ट करून पालकमंत्री केसरकर म्हणाले की, पोलिस दलात काम करणारे हात आणि त्यांचे मन मजबूत राहिले पाहिजे. या दृष्टिकोनातून पोलिसांचे मनोधैर्य उंचावण्याचाही विभागाकडून सातत्याने प्रयत्न केला जातो. कर्तव्य भावनेने अविश्रांत कार्यरत असणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासाची चांगली सुविधा मिळावी, यासाठी गृह विभागामार्फत पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी वसाहतीचे नूतनीकरण, कायमस्वरूपी वास्तव्यासाठी गृहनिर्माण प्रकल्प, आदी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.