शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

पावसाळ्यासाठी बेगमीचे साहित्य खरेदीसाठी गर्दी

By admin | Updated: May 11, 2015 23:28 IST

आगोटसाठी सज्ज : अवकाळी पावसाने वाढविली सर्वसामान्यांची लगबग; मोठ्या खरेदीमुळे दरात सवलत

रत्नागिरी : पावसाळा सुरू होण्यास अजून महिनाभराचा अवकाश आहे. परंतु पावसाळ्यासाठी लागणारे बेगमीचे साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची दुकानातून गर्दी करताना दिसून येत आहे. आठवडा बाजारातून कांदे, बटाटे, लसूण, मसाल्याचे पदार्थ शिवाय सुक्या मासळीच्या खरेदीवर सर्वसामान्यांचा विशेष भर आहे. मोठ्या खरेदीमुळे किमतीतही सूट मिळत आहे.अवकाळी पाऊस अधूनमधून हजेरी लावून जात असला तरी हवेतील वाढलेला उष्मा व सकाळच्या वेळेत दाटून येणारे आभाळ शिवाय पावसाळा ७ जूनपासून सुरू होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्याचा धसका घेत ग्राहकांनी तांदूळ, गहू, डाळी, कडधान्ये, तेल, साखर याची घाऊक स्वरूपात खरेदी सुरू केली आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांची संख्या अधिक असल्याने पावसाळ्यात शेतावर कामाला जावे लागते. त्यामुळे किराणा व अन्य साहित्यासाठी ग्रामीण भागातील मंडळींची गर्दी दिसून येत आहे. ग्रामीण भागातून आंबे, फणस, काजू विक्रीस येणाऱ्या महिलावर्ग शहरातून जाताना किराणा साहित्य खरेदी करताना दिसत आहेत.गोडेतेल ६० ते ८८ रूपये लीटर, डालडा ८० ते ९० रूपये किलो दराने विकण्यात येत आहेत. पावसाळ्यात मासेमारी बंद असल्याने खवय्यांना सुक्या माशांचा आस्वाद घ्यावा लागतो. जवला (कोलीम) २४० ते २५० रुपये, बोंबील २०० ते २२० रुपये, काड २०० ते २३० रूपये किलो दराने विकण्यात येत आहे. शिवाय बारीक सुकट १५० ते १७० रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. खारवलेली सुरमई, बांगडे यांनाही मागणी होत आहे. बल्याची सुकटे, शिवाय ढोमी माशांच्या सुकटांना विशेष मागणी होत आहे. १५० ते २०० रूपये शेकडा दराने सुकटांची विक्री सुरू आहे.याशिवाय मसाल्याचे पदार्थ, प्लास्टिकच्या वस्तू, चप्पल यांचा खप वाढला आहे., लवंग ४०० रुपये, काळीमिरी ५५० रुपये, वेलची ११०० रूपये किलो दराने विकण्यात येत आहे. पापड २०० ते ३०० रूपये किलो, तर पापड पीठ १८० ते २०० रूपये किलो दराने विकण्यात येत आहे. कोकणात पावसाळ््यापूर्वी बेगमी करण्याची प्रथा आहे. आगोट नावाने सुरू असलेली प्रथा पाळली जाते. यावेळीही त्यामुळे गर्दी आहे. (प्रतिनिधी)मुलांच्या परीक्षा संपल्यानंतर वर्षभरासाठी लागणारा मसाला घरोघरी केला जातो. दुकानातून विविध प्रकारचे मसाले विक्री उपलब्ध असले तरी तिखट शक्यतो घरीच तयार केले जाते. शिवाय पावसाळ्यासाठी लागणारे कडधान्य खरेदी करून ते वाळवून ठेवण्यात येते. कडकडीत उन्हात वाळवल्यानंतर शक्यतो कीड न धरता टिकून राहाते. याशिवाय वाढत्या दरामुळे पावसाळ्यापूर्वी खरेदी सोयीस्कर ठरत आहे. बाजारातील पापड महाग पडत असल्याने पापड पीठ आणून घरात पापड करणेदेखील सोयीस्कर पडत आहे. सुट्यांमध्ये पापड, फेण्या वाळविण्याचे काम घरोघरी सुरू असलेले दिसून येत आहे. परीक्षांचा हंगाम संपून शाळांचे निकाल लागले आता खरेदीला गती आली आहे.