शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

करुळ घाटात साईडपट्टीला भगदाड

By admin | Updated: July 14, 2016 00:30 IST

दरड कोसळलेल्याचा परिणाम : बॅरल ठेवून धोकादायक भाग बंदिस्त

वैभववाडी : करुळ घाटात कोसळलेल्या दरडीमुळे रस्त्याची साईडपट्टी खचून भगदाड पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने त्याठिकाणी बॅरल लावून सार्वजनिक बांधकामने खबरदारीचे पाऊल उचलले आहे. सलग चार दिवस धो-धो कोसळलेल्या पावसाचा जोर बुधवारी काहीसा ओसरला. दरम्यान, अतिवृष्टीमुळे तिथवलीत गोठा जमीनदोस्त झाला असून मंगळवारी तालुक्यात सुमारे पन्नास हजारांचे नुकसान झाले आहे. सोमवारी वैभववाडी तालुक्यात पावसाने रौद्ररुप धारण केल्याने करुळ घाटात दरड कोसळली होती. ती दरड तब्बल चौदा तासांनी हटविली. मात्र, कोसळेल्या दरडीमुळे रस्त्याची साईडपट्टी खचून भगदाड पडायला सुरुवात झाली आहे. पावसामुळे हे भगदाड वाढून रस्त्याचा पृष्ठभाग खचण्याची शक्यता आहे. खचलेल्या साईडपट्टीमुळे वाहतूकीला बाधा होऊ नये, यासाठी खचलेल्या साईडपट्टीभोवती बॅरल लावून तो भाग बंदीस्त केला आहे. त्यामुळे सद्यस्थितीस तेथे वाहतुकीला धोका कमी असला तरी भगदाड भरुन न घेतल्यास पावसामुळे येथील भाग आणखी खचून भगदाड वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, मंगळवारच्या पावसाची १५५ मिलीमीटर एवढी नोंद झाली असून या पावसामुळे तालुक्याच्या विविध भागात घरे व गोठ्यांची पडझड झाली आहे. तिथवली येथील अनंत रोगये याचा गोठा जमीनदोस्त झाला असून त्यांचे सुमारे तीस हजारांचे नुकसान झाले आहे. तसेच अशोक तांबे यांच्या घराच्या छप्पराचे पत्रे फुटले. त्याचप्रमाणे सुनील हरयाण यांच्या गोठ्याचे मोठे नुकसान झाले आहे. नाधवडेतील यांच्या घराच्या पडवीवर झाड पडल्यामुळे दोन हजारांचे नुकसान झाले आहे. बुधवारी पावसाचा जोर ओसरल्यामुळे जनतेला दिलासा मिळाला. मात्र, पाण्यामुळे गगनबावडा कोल्हापूर मार्ग सोमवारपासून बंद असल्याने आठवडा बाजारात भाजी विक्रेत्यांची संख्या कमी होती. त्यामुळे आठवडा बाजारातील भाजीचे दर वाढले होते. या दरवाढीचा फटका बाजाराला आलेल्या ग्राहकांना बसला.(प्रतिनिधी)