शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
3
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
4
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
5
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
6
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
7
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
8
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
9
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
10
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
11
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
12
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
13
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
14
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
15
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
16
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
17
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
18
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
19
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
20
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?

तेरेखोल नदीपात्रात मगरींचा कळप

By admin | Updated: January 19, 2015 00:24 IST

यातील काही मगरी तर तब्बल १५ फुटांहून अधिक लांबीच्या आहेत. मगरींचा वाढता वावर शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय बनला आहे.

बांदा : इन्सुली-तेरेखोल नदीपात्रात मगरींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आज, रविवारी सायंकाळी धुरीवाडी येथील नदीपात्रात मगरींचा कळपच दृष्टीस पडल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या नदीपात्रातील मगरींची संख्या शेकडोंच्या घरात असून, नदीपात्रात उतरणेदेखील धोकादायक ठरू शकते.तेरेखोल नदीपात्रात गेल्या काही वर्षांमध्ये मगरींच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. इन्सुली, बांदा, ओटवणे, विलवडे, शेर्ले येथे नदीपात्रात मगरींचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. मगरींकडून माणसांवर तसेच पाळीव जनावरांवर हल्ले होण्याच्या घटनादेखील घडल्या आहेत.इन्सुली- धुरीवाडी नदीपात्रात तब्बल ७० ते १०० मोठ्या मगरी आहेत. यातील काही मगरी तर तब्बल १५ फुटांहून अधिक लांबीच्या आहेत. मगरींचा वाढता वावर शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. या नदीपात्रालगत मोठ्या प्रमाणात बागायती करण्यात येते. यासाठी नदीपात्रात शेतीपंप लावून पाण्याचा उपसा करण्यात येतो. दररोज या मगरी दृष्टीस पडत आहेत. आज सायंकाळी तब्बल २० ते २५ मगरी तेरेखोल नदीपात्राच्या मध्यभागी पहुडलेल्या होत्या. या नदीपात्रात शेतीपंपांबरोबरच गावांच्या नळपाणी योजनादेखील आहेत. यामुळे याठिकाणी शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन या नदीपात्रालगत वावरावे लागत आहे. मात्र, नदीपात्रात मगरींचा वावर वाढल्यानेनदीपात्रालगत शेती बागायती करणे शेतकऱ्यांच्या जिवावर बेतणारे ठरत आहे. या भागात मगरींकडून हल्ला होण्याचे प्रकारदेखील घडल्याचे स्थानिकांनी सांगितले.या नदीपात्रात मगरींच्या वास्तव्यामुळे शासनाच्यावतीने ‘मगर पार्क’ उभारण्याचा प्रयत्न होता. यासाठी महसूल विभागाकडून तत्कालीन सावंतवाडीचे तहसीलदार विकास पाटील यांनी सर्वेक्षणदेखील केले होते. मात्र, कालांतराने मगर पार्क संकल्पना बारगळली. (प्रतिनिधी)