शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

गांधींवर टीका करण्यापूर्वी त्यांचे व्यक्तिमत्त्व जाणून घ्या

By admin | Updated: April 23, 2015 00:40 IST

चंद्रकांत वानखेडे यांचे मत : कणकवली येथे व्याख्यान

कणकवली : देशातील जातिव्यवस्था आणि जातनिहाय कर्मव्यवस्था बदलण्याचा प्रयत्न गांधीजींनी केला. त्यांचे कार्य जाणून न घेता अनेकजण विनाकारण टीका करीत आहेत. मात्र, महात्मा गांधींवर टीका करणाऱ्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक कंगोरे आधी तपासून पाहायला हवेत, असे मत ज्येष्ठ विचारवंत चंद्रकांत वानखेडे यांनी येथे व्यक्त केले. शहरातील टेंबवाडी येथील म्हाळसाबाई भांडारकर हिंद छात्रालयात सत्यशोधक मनोहर कदम प्रागतिक संशोधन केंद्राच्यावतीने सोमवारी ‘गांधी का मरत नाही?’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी चंद्रकांत वानखेडे बोलत होते. संशोधन केंद्राचे अंकुश कदम, प्रा. सोमनाथ कदम, आदी यावेळी उपस्थित होते.चंद्रकांत वानखेडे म्हणाले, महात्मा गांधींना मारण्याचे सात वेळा प्रयत्न झाले. यातील पहिला प्रयत्न १९३५ मध्ये झाला होता. त्यावेळी तर देशाची फाळणी होण्याचा प्रश्नच नव्हता. गांधींचे विचार संपविण्यासाठी त्यांची बदनामी सुरू करण्यात आली आहे. गांधींनी सुभाषचंद्र बोस यांना आपल्याजवळ कधी घेतले नाही, अशी हाकाटी पिटली जात आहे. मात्र, सुभाषचंद्र बोस यांना काँग्रेसचे अध्यक्ष करण्यात गांधींनीच पुढाकार घेतला होता. सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेतील तुकड्यांची नावे गांधी, नेहरू, मौलाना आझाद, अशी होती. महात्मा गांधींनी मुस्लिमातील कडवेपणा कमी करून देश कार्यासाठी त्यांना प्रवृत्त केले. तर हिंदूंमधील जातियता संपविण्यासाठी स्पृश्य व अस्पृश्य यांच्यात रोटी-बेटी व्यवहार सरू केले होते. त्यामुळे देशातील अभिजनवर्गाचे सर्वसामान्यांवर असलेले नियंत्रण सुटण्याची भीती निर्माण झाली होती. दुसरीकडे गांधी मुस्लिमांचा धर्म बदलतात, अशी हाकाटी मुस्लिम मूलतत्त्ववाद्यांनी सुरू केली होती. त्यातून गांधींच्या बदनामीचा प्रयत्न सरू झाला होता. भारतावर मुस्लिम शासकांनी सुमारे ८५० वर्षे राज्य केले; परंतु या कालावधित हिंदू कधीही अल्पसंख्यांक झाला नाही. तर मग स्वातंत्र्यानंतर आताच तशी हाकाटी का पिटली जात आहे? त्याचा शोध प्रत्येक नागरिकांने घेणे आवश्यक आहे. हिंदू आणि हिंदुत्व एक असू शकत नाही. त्यामुळे सध्या देशाला हिंदुत्ववाद्यांचा अधिक धोका आहे. तो बळावल्यास देशाचे निश्चितपणे तुकडे होतील. महात्मा गांधी, डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोविंदराव पानसरे यांच्या खुनामागे संघटित राजकीय गुन्हेगारी आहे. गांधींच्या खुनाची जबाबदारी घेण्यात आली होती. मात्र, पानसरे तसेच दाभोळकर यांचे मारेकरी आणि त्यांना पोसणारी व्यवस्था पळपुटी निघाली आहे, अशी टीकाही वानखेडे यांनी केली. (वार्ताहर)सुभाषचंद्र बोसाना काँग्रेसचे अध्यक्ष करण्यात गांधींनीच पुढाकार घेतला होता. सुभाषचंद्र बोसांच्या आझाद हिंद सेनेतील तुकड्यांची नावे गांधी, नेहरू, मौलाना आझाद अशी होती. महात्मा गांधींनी मुस्लिमातील कडवेपणा कमी करून देश कार्यासाठी त्यांना प्रवृत्त केले.