शहरं
Join us  
Trending Stories
1
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
2
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
3
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
4
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   
5
IND vs AUS : प्रितीच्या मोहऱ्यांची टीम इंडियाकडून हवा! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत कुटल्या ४१३ धावा
6
“मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राहुल गांधींसोबत एकत्र यायला अडचण नाही”: प्रकाश आंबेडकर
7
नोकरीच्या संधी कमी होणार? देशातील उत्पादन वाढ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; 'या' कारणांचा थेट फटका
8
1 लाख 34 हजार रुपयांचा iphone 17 Pro Max बनवण्यासाठी किती खर्च येतो? आकडे ऐकून चक्रावून जाल...
9
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
10
Dussehra 2025: दसऱ्याच्या मुहूर्तावर ११ लवंगांचा 'हा' विधी, दहन करेल तुमच्या आर्थिक अडचणी!
11
दिवाळीनंतर लगेच निवडणुकीचा धुराळा! राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
12
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ
13
समस्त बॉलिवूड हादरले! पैशांची तंगी होती, हा अभिनेता बनला ड्रग स्मगलर; ४० कोटींच्या ड्रगसह पकडले तेव्हा बिंग फुटले...
14
किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये
15
८ दिवसांच्या घसरणीला ब्रेक! RBI च्या घोषणेनंतर बाजारात जोरदार उसळी! टॉप गेनर्स-लूजर्स पाहा
16
भारतावर टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पवर काय वेळ आली, कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे नाहीत; शटडाऊनची नामुष्की
17
जिंकलंस मित्रा! कॉन्स्टेबलने IPS बनून घेतला अपमानाचा बदला; बॅक टू बॅक क्रॅक केली UPSC
18
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
19
गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल!
20
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता

गांधींवर टीका करण्यापूर्वी त्यांचे व्यक्तिमत्त्व जाणून घ्या

By admin | Updated: April 23, 2015 00:40 IST

चंद्रकांत वानखेडे यांचे मत : कणकवली येथे व्याख्यान

कणकवली : देशातील जातिव्यवस्था आणि जातनिहाय कर्मव्यवस्था बदलण्याचा प्रयत्न गांधीजींनी केला. त्यांचे कार्य जाणून न घेता अनेकजण विनाकारण टीका करीत आहेत. मात्र, महात्मा गांधींवर टीका करणाऱ्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक कंगोरे आधी तपासून पाहायला हवेत, असे मत ज्येष्ठ विचारवंत चंद्रकांत वानखेडे यांनी येथे व्यक्त केले. शहरातील टेंबवाडी येथील म्हाळसाबाई भांडारकर हिंद छात्रालयात सत्यशोधक मनोहर कदम प्रागतिक संशोधन केंद्राच्यावतीने सोमवारी ‘गांधी का मरत नाही?’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी चंद्रकांत वानखेडे बोलत होते. संशोधन केंद्राचे अंकुश कदम, प्रा. सोमनाथ कदम, आदी यावेळी उपस्थित होते.चंद्रकांत वानखेडे म्हणाले, महात्मा गांधींना मारण्याचे सात वेळा प्रयत्न झाले. यातील पहिला प्रयत्न १९३५ मध्ये झाला होता. त्यावेळी तर देशाची फाळणी होण्याचा प्रश्नच नव्हता. गांधींचे विचार संपविण्यासाठी त्यांची बदनामी सुरू करण्यात आली आहे. गांधींनी सुभाषचंद्र बोस यांना आपल्याजवळ कधी घेतले नाही, अशी हाकाटी पिटली जात आहे. मात्र, सुभाषचंद्र बोस यांना काँग्रेसचे अध्यक्ष करण्यात गांधींनीच पुढाकार घेतला होता. सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेतील तुकड्यांची नावे गांधी, नेहरू, मौलाना आझाद, अशी होती. महात्मा गांधींनी मुस्लिमातील कडवेपणा कमी करून देश कार्यासाठी त्यांना प्रवृत्त केले. तर हिंदूंमधील जातियता संपविण्यासाठी स्पृश्य व अस्पृश्य यांच्यात रोटी-बेटी व्यवहार सरू केले होते. त्यामुळे देशातील अभिजनवर्गाचे सर्वसामान्यांवर असलेले नियंत्रण सुटण्याची भीती निर्माण झाली होती. दुसरीकडे गांधी मुस्लिमांचा धर्म बदलतात, अशी हाकाटी मुस्लिम मूलतत्त्ववाद्यांनी सुरू केली होती. त्यातून गांधींच्या बदनामीचा प्रयत्न सरू झाला होता. भारतावर मुस्लिम शासकांनी सुमारे ८५० वर्षे राज्य केले; परंतु या कालावधित हिंदू कधीही अल्पसंख्यांक झाला नाही. तर मग स्वातंत्र्यानंतर आताच तशी हाकाटी का पिटली जात आहे? त्याचा शोध प्रत्येक नागरिकांने घेणे आवश्यक आहे. हिंदू आणि हिंदुत्व एक असू शकत नाही. त्यामुळे सध्या देशाला हिंदुत्ववाद्यांचा अधिक धोका आहे. तो बळावल्यास देशाचे निश्चितपणे तुकडे होतील. महात्मा गांधी, डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोविंदराव पानसरे यांच्या खुनामागे संघटित राजकीय गुन्हेगारी आहे. गांधींच्या खुनाची जबाबदारी घेण्यात आली होती. मात्र, पानसरे तसेच दाभोळकर यांचे मारेकरी आणि त्यांना पोसणारी व्यवस्था पळपुटी निघाली आहे, अशी टीकाही वानखेडे यांनी केली. (वार्ताहर)सुभाषचंद्र बोसाना काँग्रेसचे अध्यक्ष करण्यात गांधींनीच पुढाकार घेतला होता. सुभाषचंद्र बोसांच्या आझाद हिंद सेनेतील तुकड्यांची नावे गांधी, नेहरू, मौलाना आझाद अशी होती. महात्मा गांधींनी मुस्लिमातील कडवेपणा कमी करून देश कार्यासाठी त्यांना प्रवृत्त केले.