शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
4
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
5
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
6
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
7
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
8
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
9
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
10
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
11
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
12
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
13
Video - लेकीच्या जन्मानंतर बाबांचा आनंद गगनात मावेना; ‘धुरंधर’ स्टाईलमध्ये केला भन्नाट डान्स
14
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
15
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
16
अखेर BCCIने मान्य केली चूक, आता बदल होणार! पुढील ३१ दिवसांसाठी घेतला जाणार मोठा निर्णय
17
१५०० लोकसंख्येच्या गावात २७ हजार जन्मांची नोंद! यवतमाळमध्ये 'बर्थ सर्टिफिकेट'चा महाघोटाळा; मुंबई कनेक्शन उघड
18
द मुरुड फाईल्स! शिंदेसेना अन् काँग्रेसची पुन्हा एकदा हातमिळवणी, “आम्ही एकत्र आलोय ते...”
19
राखी सावंत पुन्हा रचणार स्वयंवर? सेलिब्रिटींना नाही तर राजकारण्यांना देणार आमंत्रण
20
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
Daily Top 2Weekly Top 5

गांधींवर टीका करण्यापूर्वी त्यांचे व्यक्तिमत्त्व जाणून घ्या

By admin | Updated: April 23, 2015 00:40 IST

चंद्रकांत वानखेडे यांचे मत : कणकवली येथे व्याख्यान

कणकवली : देशातील जातिव्यवस्था आणि जातनिहाय कर्मव्यवस्था बदलण्याचा प्रयत्न गांधीजींनी केला. त्यांचे कार्य जाणून न घेता अनेकजण विनाकारण टीका करीत आहेत. मात्र, महात्मा गांधींवर टीका करणाऱ्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक कंगोरे आधी तपासून पाहायला हवेत, असे मत ज्येष्ठ विचारवंत चंद्रकांत वानखेडे यांनी येथे व्यक्त केले. शहरातील टेंबवाडी येथील म्हाळसाबाई भांडारकर हिंद छात्रालयात सत्यशोधक मनोहर कदम प्रागतिक संशोधन केंद्राच्यावतीने सोमवारी ‘गांधी का मरत नाही?’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी चंद्रकांत वानखेडे बोलत होते. संशोधन केंद्राचे अंकुश कदम, प्रा. सोमनाथ कदम, आदी यावेळी उपस्थित होते.चंद्रकांत वानखेडे म्हणाले, महात्मा गांधींना मारण्याचे सात वेळा प्रयत्न झाले. यातील पहिला प्रयत्न १९३५ मध्ये झाला होता. त्यावेळी तर देशाची फाळणी होण्याचा प्रश्नच नव्हता. गांधींचे विचार संपविण्यासाठी त्यांची बदनामी सुरू करण्यात आली आहे. गांधींनी सुभाषचंद्र बोस यांना आपल्याजवळ कधी घेतले नाही, अशी हाकाटी पिटली जात आहे. मात्र, सुभाषचंद्र बोस यांना काँग्रेसचे अध्यक्ष करण्यात गांधींनीच पुढाकार घेतला होता. सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेतील तुकड्यांची नावे गांधी, नेहरू, मौलाना आझाद, अशी होती. महात्मा गांधींनी मुस्लिमातील कडवेपणा कमी करून देश कार्यासाठी त्यांना प्रवृत्त केले. तर हिंदूंमधील जातियता संपविण्यासाठी स्पृश्य व अस्पृश्य यांच्यात रोटी-बेटी व्यवहार सरू केले होते. त्यामुळे देशातील अभिजनवर्गाचे सर्वसामान्यांवर असलेले नियंत्रण सुटण्याची भीती निर्माण झाली होती. दुसरीकडे गांधी मुस्लिमांचा धर्म बदलतात, अशी हाकाटी मुस्लिम मूलतत्त्ववाद्यांनी सुरू केली होती. त्यातून गांधींच्या बदनामीचा प्रयत्न सरू झाला होता. भारतावर मुस्लिम शासकांनी सुमारे ८५० वर्षे राज्य केले; परंतु या कालावधित हिंदू कधीही अल्पसंख्यांक झाला नाही. तर मग स्वातंत्र्यानंतर आताच तशी हाकाटी का पिटली जात आहे? त्याचा शोध प्रत्येक नागरिकांने घेणे आवश्यक आहे. हिंदू आणि हिंदुत्व एक असू शकत नाही. त्यामुळे सध्या देशाला हिंदुत्ववाद्यांचा अधिक धोका आहे. तो बळावल्यास देशाचे निश्चितपणे तुकडे होतील. महात्मा गांधी, डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोविंदराव पानसरे यांच्या खुनामागे संघटित राजकीय गुन्हेगारी आहे. गांधींच्या खुनाची जबाबदारी घेण्यात आली होती. मात्र, पानसरे तसेच दाभोळकर यांचे मारेकरी आणि त्यांना पोसणारी व्यवस्था पळपुटी निघाली आहे, अशी टीकाही वानखेडे यांनी केली. (वार्ताहर)सुभाषचंद्र बोसाना काँग्रेसचे अध्यक्ष करण्यात गांधींनीच पुढाकार घेतला होता. सुभाषचंद्र बोसांच्या आझाद हिंद सेनेतील तुकड्यांची नावे गांधी, नेहरू, मौलाना आझाद अशी होती. महात्मा गांधींनी मुस्लिमातील कडवेपणा कमी करून देश कार्यासाठी त्यांना प्रवृत्त केले.