शहरं
Join us  
Trending Stories
1
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
2
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
5
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
6
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
7
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
8
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
9
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
10
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
11
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
12
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
13
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
14
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
15
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
16
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
17
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
18
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
19
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
20
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारीचे प्रमाण वाढले

By admin | Updated: December 19, 2014 23:29 IST

हुमरस येथे झालेला युवतीचा खून तसेच देवगड येथील खून प्रकरण उलगडण्यात पोलिसांना यश आले आहे. यावर्षी बलात्काराचेही प्रमाण जिल्ह्यात वाढले

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असले तरी त्या गुन्ह्यांचा उलगडाही त्याच प्रमाणात सुरू आहे. बंद बंगले तसेच शाळा फोडणारी टोळी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वावरत असल्याने या टोळीला आळा कसा घालायचा हा प्रश्न पोलिसांसमोर आहे. या टोळीतील काही जणांना पकडण्यात पोलिसांना यश आले असले तरी अद्याप टोळीच्या म्होरक्याला पकडण्यात पोलिसांना यश आले नाही, ही वस्तुस्थिती आहे.सावंतवाडीत आॅगस्टमध्ये घडलेल्या बहुचर्चित वासनाकांडाने अख्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले होते. तसेच लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जप्त करण्यात आलेल्या बोलेरो गाड्या हाही चर्चेचा विषय ठरला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जुगार, मटका आणि अवैध दारू वाहतूक सुरू आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यात ना पोलीस विभागाला यश आले, ना उत्पादन शुल्क विभागाला. राजरोसपणे हे धंदे सुरू आहेत आणि तेही खाकीच्या आशीर्वादानेच.हुमरस येथे झालेला युवतीचा खून तसेच देवगड येथील खून प्रकरण उलगडण्यात पोलिसांना यश आले आहे. यावर्षी बलात्काराचेही प्रमाण जिल्ह्यात वाढले आहे.जिल्ह्यात शाळा फोडणारी टोळी कार्यरत होती. त्या टोळीतील एका युवकाला आंबोली येथे पकडण्यात आल्यानंतर संपूर्ण टोळी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. तसेच सावंतवाडीतील चराठा भागात बंद बंगले फोडणाऱ्या युवकालाही पोलिसांनी जेरबंद करून चोऱ्यांवर नियंत्रण मिळवले. लाचलुचपत विभागानेही चांगली कामगिरी केली असून अनेक लाचखोरांना रंगेहाथ पकडण्यात यश मिळविले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाळा तसेच बंद घरे फोडणारी टोळी कार्यरत होती. या टोळीला आंबोली पोलिसांच्या चाणाक्षपणामुळे पकडण्यात यश आले. यामध्ये पाचजणांचा समावेश होता. तर मोबाईल शॉपी फोडणाऱ्या चोरट्यालाही पोलिसांनी पकडले. एकाच कुटुंबातील पाच ठारजिल्ह्यात यावर्षी अपघातांचे प्रमाण वाढले. झाराप-पत्रादेवी महामार्गावर छोट्या-मोठ्या गाड्यांचे अपघात झाले. यात गुजरात येथील कारला मळगाव येथे झालेला अपघात धक्कादायक होता. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जण जागीच मृत झाले. तर नांदगाव, आंबोली येथील अपघातही फारच धक्कादायक होते. अपघातांची वेगवेगळी कारणे आहेत. याशिवाय जिल्ह्यात आत्महत्यांचेही प्रमाण वाढले आहे. दोडामार्ग, सावंतवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत. गोव्यातील दोन तरुणांनी सावंतवाडीत आत्महत्या केली होती. अनंत जाधव