शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

गुन्हेगारीचे प्रमाण वाढले

By admin | Updated: December 19, 2014 23:29 IST

हुमरस येथे झालेला युवतीचा खून तसेच देवगड येथील खून प्रकरण उलगडण्यात पोलिसांना यश आले आहे. यावर्षी बलात्काराचेही प्रमाण जिल्ह्यात वाढले

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असले तरी त्या गुन्ह्यांचा उलगडाही त्याच प्रमाणात सुरू आहे. बंद बंगले तसेच शाळा फोडणारी टोळी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वावरत असल्याने या टोळीला आळा कसा घालायचा हा प्रश्न पोलिसांसमोर आहे. या टोळीतील काही जणांना पकडण्यात पोलिसांना यश आले असले तरी अद्याप टोळीच्या म्होरक्याला पकडण्यात पोलिसांना यश आले नाही, ही वस्तुस्थिती आहे.सावंतवाडीत आॅगस्टमध्ये घडलेल्या बहुचर्चित वासनाकांडाने अख्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले होते. तसेच लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जप्त करण्यात आलेल्या बोलेरो गाड्या हाही चर्चेचा विषय ठरला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जुगार, मटका आणि अवैध दारू वाहतूक सुरू आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यात ना पोलीस विभागाला यश आले, ना उत्पादन शुल्क विभागाला. राजरोसपणे हे धंदे सुरू आहेत आणि तेही खाकीच्या आशीर्वादानेच.हुमरस येथे झालेला युवतीचा खून तसेच देवगड येथील खून प्रकरण उलगडण्यात पोलिसांना यश आले आहे. यावर्षी बलात्काराचेही प्रमाण जिल्ह्यात वाढले आहे.जिल्ह्यात शाळा फोडणारी टोळी कार्यरत होती. त्या टोळीतील एका युवकाला आंबोली येथे पकडण्यात आल्यानंतर संपूर्ण टोळी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. तसेच सावंतवाडीतील चराठा भागात बंद बंगले फोडणाऱ्या युवकालाही पोलिसांनी जेरबंद करून चोऱ्यांवर नियंत्रण मिळवले. लाचलुचपत विभागानेही चांगली कामगिरी केली असून अनेक लाचखोरांना रंगेहाथ पकडण्यात यश मिळविले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाळा तसेच बंद घरे फोडणारी टोळी कार्यरत होती. या टोळीला आंबोली पोलिसांच्या चाणाक्षपणामुळे पकडण्यात यश आले. यामध्ये पाचजणांचा समावेश होता. तर मोबाईल शॉपी फोडणाऱ्या चोरट्यालाही पोलिसांनी पकडले. एकाच कुटुंबातील पाच ठारजिल्ह्यात यावर्षी अपघातांचे प्रमाण वाढले. झाराप-पत्रादेवी महामार्गावर छोट्या-मोठ्या गाड्यांचे अपघात झाले. यात गुजरात येथील कारला मळगाव येथे झालेला अपघात धक्कादायक होता. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जण जागीच मृत झाले. तर नांदगाव, आंबोली येथील अपघातही फारच धक्कादायक होते. अपघातांची वेगवेगळी कारणे आहेत. याशिवाय जिल्ह्यात आत्महत्यांचेही प्रमाण वाढले आहे. दोडामार्ग, सावंतवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत. गोव्यातील दोन तरुणांनी सावंतवाडीत आत्महत्या केली होती. अनंत जाधव