शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ बनविणार

By admin | Updated: May 11, 2016 23:59 IST

दीपक केसरकर : आंबोलीच्या विकासाला चालना मिळण्याची आशा

आंबोली : येत्या काही काळात आंबोलीला आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ बनविले जाईल. याचा फायदा येथील घराघरांत होण्याच्या दृष्टीने प्रयत्न राहतील, असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे केले. आंबोली-सतीवाडी येथील जिल्हा परिषद शाळा क्र. पाचमध्ये रविवारी आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. गेल्या काही काळापासून जिल्ह्यातील एकमेव हिलस्टेशन असलेल्या आंबोली येथील पर्यटन विकास मंदावला आहे. येथे मुक्कामाला येणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावल्याने इथल्या अर्थकारणावरही त्याचा परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर केसरकर यांनी चारच दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांसमवेत आंबोलीचा दौरा करत येथे आवश्यक सोयीसुविधांचा आढावा घेतला. येथील धबधब्याच्या विकासासह इतर काही प्रकल्प राबविणार असल्याचे जाहीर केले होते. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी येथे झालेल्या दौऱ्यात त्यांनी आंबोलीच्या पर्यटनाचा चेहरा-मोहरा बदलणार असल्याचे सुतोवाच केले.यावेळी पालकमंत्री केसरकर म्हणाले, येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ झाल्यावर त्याचा फायदा सर्वांना होईल, असे नियोजन केले जाईल. यासाठी ग्रामविकास खात्यातर्फे अत्यल्प व्याजदरात कर्जपुरवठा करण्यात येणार आहे. जूनपर्यंत येथील सात धबधब्यांच्या ठिकाणी विकासात्मक कामे केली जातील. त्यामुळे एकाच धबधब्याच्या ठिकाणी होणारी गर्दी कमी होईल. यातून पर्यटकांचीही संख्या वाढू शकेल, असे पालकमंत्री म्हणाले. जिल्ह्याच्या पर्यटन विकासात आंबोली, चौकूळ आणि गेळे यांचे स्थान महत्त्वाचे असणार आहे. पर्यटन केवळ बाजारपेठेपुरतेच मर्यादित न राहता ते पूर्ण गावात पोहोचले पाहिजे, यासाठी प्रयत्न केले जातील. ग्रामविकास खात्यातर्फे दोन किंवा तीन टक्के व्याजदराने बँकांमार्फत कर्जपुरवठा करण्यात येईल. शाळेच्या सुवर्णमहोत्सवा निमित्त या कार्यक्रमाला त्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यासपीठावर आंबोली हायस्कूलचे अध्यक्ष शशिकांत गावडे, माजी सरपंच जगन्नाथ गावडे, उपसरपंच विलास गावडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष काशिराम गावडे, बाळा गावडे, जयराम गावडे, शाळा व्यवस्थापनाच्या नीलिमा गावडे, आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)हे माझे दुसरे घर :दीपक केसरकरमहादेवगड, कावळेसाद रस्त्याचे नूतनीकरण केले जाईल. सतीचीवाडी येथे पथदीपांची व्यवस्था करू. माझ्या आमदार निधीतून शाळेसाठी दोन संगणक दिले जातील. बसस्थानकावरील स्वच्छतागृहासाठी आमदार निधीतून साडेतीन लाख देणार आहे. आंबोली, चौकुळ, गेळे येथील लोकांचे माझ्याशी ऋणानुबंध आहेत. माझ्यासाठी हे माझे दुसरे घरच आहे.’