शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
4
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
5
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
6
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
7
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
8
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
9
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
10
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
11
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
12
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
13
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
14
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
15
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
16
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
17
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
18
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
19
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
20
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका

समस्येवरील उपायासाठी स्वत:चे मॉडेल तयार करा

By admin | Updated: April 4, 2017 20:19 IST

मुनीर सय्यद : एमआयटीएम कॉलेजच्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान

सिंधुदुर्गनगरी : समाजातील समस्या शोधून त्यावर उपाययोजना करण्यासाठी स्वत:चे मॉडेल तयार करा आणि त्यातून येथील जनतेला व्यावसायिक संधी उपलब्ध करून द्या, असे आवाहन रिलायन्स जिओचे जनरल मॅनेजर डॉ. मुनीर सय्यद यांनी एमआयटीएम कॉलेजच्या पदवी प्रदान सोहळ्यात बोलताना केले. यावेळी २३० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.मेट्रो पॉलिटन इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट या महाविद्यालयाचा दुसरा पदवीप्रदान कार्यक्रम रिलायन्स जिओचे जनरल मॅनेजर डॉ. मुनीर सय्यद यांच्या अध्यक्षतेखालीही झाला. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे कार्याध्यक्ष संतोष पाल, सचिव नेहा पाल, शासकीय तंत्रनिकेतन मालवणचे प्राचार्य महाजन, संस्थेचे प्राचार्य डॉ. प्रकाश हुबळी, प्राध्यापक सूर्यकांत नवले, सर्व विभागांचे विभागप्रमुख, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सुरुवातीला पदवीप्राप्त विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात वाजतगाजत स्वागत करण्यात आले. सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात या महाविद्यालयात विविध विषयांच्या पदवीसाठी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदवी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. यावेळी डॉ. मुनीर सय्यद म्हणाले की, आजचे जग हे तंत्रज्ञानावर आधारित आहे. डॉ. अब्दुल कलामांचे ध्येय ‘व्हिजन २०२०’वर आधारित अशी भारताची वाटचाल चालू आहे. स्मार्ट इंडिया, कौशल्य विकास योजना, उन्नत भारत, उन्नत महाराष्ट्र, तसेच डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया यासारखे विविध उपक्रम सरकार राबवित आहे. कुठलेही काम करायला कमीपणा मानू नका, स्वत:ची आवड, ओळख, सामाजिक भान म्हणून समाजात असणाऱ्या समस्या शोधून काढा. त्यावर स्वत: मॉडेल निर्माण करा. यावेळी त्यांनी आपल्याकडे खूप कार्यक्षेत्राची उपलब्धता आहे. आपण स्वत: जर याठिकाणीच व्यावसायिक संधी निर्माण करू शकलो तर निश्चितच येथील समाजासाठी खूप मोलाचे कार्य ठरेल, असे सांगितले. आत्मविश्वास ढळू देऊ नका, स्वत:वर विश्वास ठेवा, कामात सातत्य ठेवा, असा मौलिक संदेश सय्यद यांनी विद्यार्थ्यांना दिला. ते म्हणाले, प्रत्येक विद्यार्थ्याने स्वत:ला ओळखून मला प्राप्त झालेल्या ज्ञानाचा समाजाला कसा उपयोग होईल याकरिता प्रयत्न केले पाहिजेत. त्याचप्रमाणे प्रत्येक मनुष्यप्राणी हा वेगळा असतो. आपली स्वत:ची कौशल्ये ओळखून त्याने सामाजिक भान राखून पुढील वाटचाल केली पाहिजे. स्वत:ला सिद्ध करण्याकरिता कोणताही ताणतणाव न घेता कठोर परिश्रम घेतले पाहिजेत. चुका झाल्यास त्या सुधारून मिळालेल्या प्रत्येक संधीचा फायदा घेता आला पाहिजे, असा बहुमूल्य संदेश दिला. कार्यक्रमाच्या शेवटी पदवीप्राप्त विद्यार्थ्यांनी याठिकाणी शैक्षणिक संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्था व्यवस्थापकांचे आभार मानले.