शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
3
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
4
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
5
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
6
जातगणना : मॅजिक की मंडल?
7
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
8
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
9
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
10
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
11
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
12
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
13
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
14
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
15
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
16
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
17
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
18
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
19
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
20
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा

समस्येवरील उपायासाठी स्वत:चे मॉडेल तयार करा

By admin | Updated: April 4, 2017 20:19 IST

मुनीर सय्यद : एमआयटीएम कॉलेजच्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान

सिंधुदुर्गनगरी : समाजातील समस्या शोधून त्यावर उपाययोजना करण्यासाठी स्वत:चे मॉडेल तयार करा आणि त्यातून येथील जनतेला व्यावसायिक संधी उपलब्ध करून द्या, असे आवाहन रिलायन्स जिओचे जनरल मॅनेजर डॉ. मुनीर सय्यद यांनी एमआयटीएम कॉलेजच्या पदवी प्रदान सोहळ्यात बोलताना केले. यावेळी २३० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.मेट्रो पॉलिटन इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट या महाविद्यालयाचा दुसरा पदवीप्रदान कार्यक्रम रिलायन्स जिओचे जनरल मॅनेजर डॉ. मुनीर सय्यद यांच्या अध्यक्षतेखालीही झाला. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे कार्याध्यक्ष संतोष पाल, सचिव नेहा पाल, शासकीय तंत्रनिकेतन मालवणचे प्राचार्य महाजन, संस्थेचे प्राचार्य डॉ. प्रकाश हुबळी, प्राध्यापक सूर्यकांत नवले, सर्व विभागांचे विभागप्रमुख, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सुरुवातीला पदवीप्राप्त विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात वाजतगाजत स्वागत करण्यात आले. सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात या महाविद्यालयात विविध विषयांच्या पदवीसाठी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदवी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. यावेळी डॉ. मुनीर सय्यद म्हणाले की, आजचे जग हे तंत्रज्ञानावर आधारित आहे. डॉ. अब्दुल कलामांचे ध्येय ‘व्हिजन २०२०’वर आधारित अशी भारताची वाटचाल चालू आहे. स्मार्ट इंडिया, कौशल्य विकास योजना, उन्नत भारत, उन्नत महाराष्ट्र, तसेच डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया यासारखे विविध उपक्रम सरकार राबवित आहे. कुठलेही काम करायला कमीपणा मानू नका, स्वत:ची आवड, ओळख, सामाजिक भान म्हणून समाजात असणाऱ्या समस्या शोधून काढा. त्यावर स्वत: मॉडेल निर्माण करा. यावेळी त्यांनी आपल्याकडे खूप कार्यक्षेत्राची उपलब्धता आहे. आपण स्वत: जर याठिकाणीच व्यावसायिक संधी निर्माण करू शकलो तर निश्चितच येथील समाजासाठी खूप मोलाचे कार्य ठरेल, असे सांगितले. आत्मविश्वास ढळू देऊ नका, स्वत:वर विश्वास ठेवा, कामात सातत्य ठेवा, असा मौलिक संदेश सय्यद यांनी विद्यार्थ्यांना दिला. ते म्हणाले, प्रत्येक विद्यार्थ्याने स्वत:ला ओळखून मला प्राप्त झालेल्या ज्ञानाचा समाजाला कसा उपयोग होईल याकरिता प्रयत्न केले पाहिजेत. त्याचप्रमाणे प्रत्येक मनुष्यप्राणी हा वेगळा असतो. आपली स्वत:ची कौशल्ये ओळखून त्याने सामाजिक भान राखून पुढील वाटचाल केली पाहिजे. स्वत:ला सिद्ध करण्याकरिता कोणताही ताणतणाव न घेता कठोर परिश्रम घेतले पाहिजेत. चुका झाल्यास त्या सुधारून मिळालेल्या प्रत्येक संधीचा फायदा घेता आला पाहिजे, असा बहुमूल्य संदेश दिला. कार्यक्रमाच्या शेवटी पदवीप्राप्त विद्यार्थ्यांनी याठिकाणी शैक्षणिक संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्था व्यवस्थापकांचे आभार मानले.