शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
2
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
3
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
4
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
6
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय
7
BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट!
8
'IIT कानपूरने माझ्या मुलाचा घास घेतला'; इंजिनिअरिंग करणाऱ्या धीरजचा रूममध्ये मिळाला मृतदेह, बापाचा आक्रोश
9
गवार, मटारचा भाव २०० रुपयांवर; पालक ६०, तर मेथी ५० रुपये जुडी, दसऱ्याला भाजीपाल्याला महागाईची फोडणी
10
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
11
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
12
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
13
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
14
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
15
Kantara Chapter 1: प्रदर्शित होताच अख्खं मार्केट खाल्लं! 'कांतारा चॅप्टर १'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
16
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
17
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
18
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
19
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
20
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात

देशाला बौद्ध धम्माच्या तत्त्वज्ञानाची गरज

By admin | Updated: November 17, 2015 00:04 IST

भन्तेजी प्रज्ञानंद : दोडामार्गात धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा

कसई दोडामार्ग : देशाला स्वातंत्र्य मिळाले, पण या देशातील मानसिक गुलामगिरी नष्ट झालेली नाही. जोपर्यंत मानसिक गुलामी नष्ट होत नाही, तोपर्यंत या देशातील लोक कधीही स्वातंत्र्य उपभोगणार नाहीत. या देशातील मानसिक गुलामी केवळ बौध्द धम्माच्या विचारातून नष्ट होऊ शकते. यासाठी देशाला बौध्द धम्माशिवाय तरणोपाय नाही, असे मत भन्तेजी प्रज्ञानंद यांनी व्यक्त केले.सिंधुदुर्ग बौध्द हितवर्धक महासंघ, मुंबई, दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ले व गोवा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी दोडामार्ग येथील महाराजा हॉलमध्ये ५९ वा ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी प्रज्ञानंद बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाध्यक्ष केंद्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष व्ही. ए. कदम, माजी केंद्रीय कार्यकारिणी अध्यक्ष शंकर जाधव, सचिव विद्या व्ही. कदम, खजिनदार विठ्ठल वजराटकर, सल्लागार रामचंद्र नेमळेकर, सदस्य सुरेश जाधव, तुकाराम कदम, गोपाळ जाधव, सावंतवाडीचे अध्यक्ष शिवाजी जाधव, कुडाळचे अध्यक्ष प्रकाश मुणगेकर, वेंगुर्ले शाखेचे अध्यक्ष भिवा गवस, गोवा विभागाचे अध्यक्ष विजय विरनोडकर, कृष्णा जाधव, रमाकांत जाधव, पांडुरंग कदम, दिगंबर पावसकर, नारायण आरोंदेकर, मिलिंद वेंगुर्लेकर, सुदेश आगरवाडेकर आदी उपस्थित होते.भन्तेजी प्रज्ञानंद यांच्या हस्ते गौतम बुध्दांच्या प्रतिमेला व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी प्रज्ञानंद म्हणाले, डॉ. बाबासाहेबांनी म्हटले आहे की, कुठच्या धर्मात जन्म घेणे माझ्या हातात नव्हते. पण या धर्मात मी मरणार नाही, अशी मी शपथ घेतो. प्रतिज्ञा करतो. या धर्मामध्ये स्वातंत्र्य नाही, बंधुत्व नाही, न्याय नाही, समता नाही. इथे माणसाला साथ कधीही दिली जात नाही. बाबासाहेबांनी जगातील एकही धर्म सोडला नाही. सर्व धर्मांचा अभ्यास केला आणि शेवटी माणसाला माणूस म्हणून बोलण्याची बोलण्याची प्रज्ञा असलेल्या बौध्द धम्माचा स्वीकार केल्याचे त्यांनी सांगितले. या संपूर्ण दिवसभरातील कार्यक्रमातील दुसऱ्या सत्रामध्ये परिसंवाद आयोजित केला. यावेळी बौध्द धम्म धार्मिक चळवळीत तन, मन, धन अर्पूण काम करत धम्म चळवळ पुढे नेणाऱ्या धम्म बांधवांचा यावेळी सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन शाखेच्यावतीने सन्मान करण्यात आला. यावेळी विचामंचावर उपस्थित सर्व मान्यवरांनी मनोगत व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या. (वार्ताहर)