शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

देशाला बौद्ध धम्माच्या तत्त्वज्ञानाची गरज

By admin | Updated: November 17, 2015 00:04 IST

भन्तेजी प्रज्ञानंद : दोडामार्गात धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा

कसई दोडामार्ग : देशाला स्वातंत्र्य मिळाले, पण या देशातील मानसिक गुलामगिरी नष्ट झालेली नाही. जोपर्यंत मानसिक गुलामी नष्ट होत नाही, तोपर्यंत या देशातील लोक कधीही स्वातंत्र्य उपभोगणार नाहीत. या देशातील मानसिक गुलामी केवळ बौध्द धम्माच्या विचारातून नष्ट होऊ शकते. यासाठी देशाला बौध्द धम्माशिवाय तरणोपाय नाही, असे मत भन्तेजी प्रज्ञानंद यांनी व्यक्त केले.सिंधुदुर्ग बौध्द हितवर्धक महासंघ, मुंबई, दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ले व गोवा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी दोडामार्ग येथील महाराजा हॉलमध्ये ५९ वा ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी प्रज्ञानंद बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाध्यक्ष केंद्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष व्ही. ए. कदम, माजी केंद्रीय कार्यकारिणी अध्यक्ष शंकर जाधव, सचिव विद्या व्ही. कदम, खजिनदार विठ्ठल वजराटकर, सल्लागार रामचंद्र नेमळेकर, सदस्य सुरेश जाधव, तुकाराम कदम, गोपाळ जाधव, सावंतवाडीचे अध्यक्ष शिवाजी जाधव, कुडाळचे अध्यक्ष प्रकाश मुणगेकर, वेंगुर्ले शाखेचे अध्यक्ष भिवा गवस, गोवा विभागाचे अध्यक्ष विजय विरनोडकर, कृष्णा जाधव, रमाकांत जाधव, पांडुरंग कदम, दिगंबर पावसकर, नारायण आरोंदेकर, मिलिंद वेंगुर्लेकर, सुदेश आगरवाडेकर आदी उपस्थित होते.भन्तेजी प्रज्ञानंद यांच्या हस्ते गौतम बुध्दांच्या प्रतिमेला व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी प्रज्ञानंद म्हणाले, डॉ. बाबासाहेबांनी म्हटले आहे की, कुठच्या धर्मात जन्म घेणे माझ्या हातात नव्हते. पण या धर्मात मी मरणार नाही, अशी मी शपथ घेतो. प्रतिज्ञा करतो. या धर्मामध्ये स्वातंत्र्य नाही, बंधुत्व नाही, न्याय नाही, समता नाही. इथे माणसाला साथ कधीही दिली जात नाही. बाबासाहेबांनी जगातील एकही धर्म सोडला नाही. सर्व धर्मांचा अभ्यास केला आणि शेवटी माणसाला माणूस म्हणून बोलण्याची बोलण्याची प्रज्ञा असलेल्या बौध्द धम्माचा स्वीकार केल्याचे त्यांनी सांगितले. या संपूर्ण दिवसभरातील कार्यक्रमातील दुसऱ्या सत्रामध्ये परिसंवाद आयोजित केला. यावेळी बौध्द धम्म धार्मिक चळवळीत तन, मन, धन अर्पूण काम करत धम्म चळवळ पुढे नेणाऱ्या धम्म बांधवांचा यावेळी सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन शाखेच्यावतीने सन्मान करण्यात आला. यावेळी विचामंचावर उपस्थित सर्व मान्यवरांनी मनोगत व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या. (वार्ताहर)